शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नक्षल्यांच्या गुहेत गृहमंत्री फडणवीसांचा दाैरा; माओवाद्यांची प्रेसनोट सर्वत्र व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2023 21:04 IST

Nagpur News देशभरातील नक्षल प्रभावित क्षेत्रात सुरक्षा यंत्रणांनी बंदोबस्त अत्यंत कडक केला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस २ मे रोजी नक्षल्यांच्या गुहेत (गडचिरोली जिल्ह्यात) दाैऱ्यावर जाणार आहेत.

नरेश डोंगरेनागपूर : दंतेवाड्यातील जंगलात शक्तीशाली भू-सुरंग स्फोट घडवून ११ जवानांचे बळी घेणारा घातपात नक्सल नेता जगदीश उर्फ बबरा कोरामी आणि त्याच्या साथीदारांनी घडविल्याचे पुढे आले आहे. या संबंधाने माओवाद्यांनी जारी केलेली प्रेसनोट सर्वत्र व्हायरल होत आहे. दरम्यान, या भयावह घटनेमुळे देशभरातील नक्षल प्रभावित क्षेत्रात सुरक्षा यंत्रणांनी बंदोबस्त अत्यंत कडक केला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस २ मे रोजी नक्षल्यांच्या गुहेत (गडचिरोली जिल्ह्यात) दाैऱ्यावर जाणार आहेत.

महाराष्ट्रातील नक्षलवादी चळवळीचा नेता मिलिंद तेलतुंबडे याला पोलिसांनी चकमकीत ठार मारल्यानंतर गडचिरोली-गोंदियातील नक्षल चळवळ बॅकफूटवर गेल्याचा दावा होतो. मात्र, या दोन्ही जिल्ह्यात अधूनमधून नक्षलवाद्यांच्या कुरापती सुरूच असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, २६ एप्रिलला छत्तीसगडमधील अरनपूर (दंतेवाडा) जंगलात नक्षल्यांनी इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी )चा वापर करून शक्तीशाली स्फोट घडवला. यात जोगा सोढी, संतोष तामो, मुन्नाराम कडोती, दुलगो मडावी, जोगा कवासी, हरिराम मडावी, लखमू मडकाम, राजू राम करटम, जयराम पोडियाम, जगदीश कवासी आणि धनिराम यादव हे शहिद झाले. यातील जोगा सोढी, मुन्ना कडोती, हरिराम मडावी, जोगा कवासी आणि राजू करटम हे पाच जवान काही वर्षांपूर्वी शासनाच्या आत्मसमर्पण योजनेत सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्याच्या हेतूने त्यांना पोलीस दलात नक्षल विरोधी अभियानात सहभागी करून घेण्यात आले होते, हे विशेष !

या घातपाती कृत्यामुळे ठिकठिकाणच्या नक्षल प्रभावित क्षेत्रातील सुरक्षा यंत्रणांना जबर हादरा बसला आहे. या पार्श्वभूमीवर, एकीकडे नक्षलवाद्यांच्या दरभा डिविजन कमिटीचा सचिव साईनाथ याने जारी केलेली प्रेसनोट सर्वत्र व्हायरल होत आहे. दुसरीकडे सुरक्षा यंत्रणांनीही नक्षल्यांना धडा शिकविण्यासाठी कंबर कसली आहे. अशा वातावरणात गृहमंत्री फडणवीस २ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात दाैऱ्यावर जाणार असून त्यांचे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सुरक्षा यंत्रणा हायअलर्टदंतेवाडा जिल्ह्यात नक्षल्यांनी घडविलेल्या भयंकर घातपाती घटनेने गडचिरोली -गोंदियाचा नक्षलग्रस्त भागही अस्वस्थ आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे, छत्तीसगड मध्ये घातपाती कृत्य केल्यानंतर तिकडचे नक्षलवादी गडचिरोली गोंदियाच्या जंगलाकडे (रेस्ट झोन मध्ये) धाव घेतात. ते लक्षात घेता गृहमंत्र्यांच्या दाैऱ्याने संपूर्ण राज्याची सुरक्षा यंत्रणा हायअलर्ट मोडवर आली आहे. खबरदारीसाठी आजपासूनच कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस