शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सर्वधर्मीयांमधील कुरितींच्या निर्दालनासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 21:29 IST

Nagpur News स्त्री-पुरुषांना जगण्याचा समान अधिकार देणारा कायदा म्हणजे समान नागरी कायदा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील वकील व ‘दिल्ली रिओट्स २०२० - दी फॅक्ट’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ॲड. मोनिका अरोरा यांनी मंगळवारी व्यक्त केले.

ठळक मुद्दे प्राचीन काळापासून सामाजिक सुधारणांसाठी हिंदूच कायम आग्रही

नागपूर : कुणाच्या प्रथा-परंपरांना नव्हे तर कुरितींना दूर करत सर्वधर्मीय, सर्वपंथीय, सर्वजातीय, स्त्री-पुरुषांना जगण्याचा समान अधिकार देणारा कायदा म्हणजे समान नागरी कायदा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील वकील व ‘दिल्ली रिओट्स २०२० - दी फॅक्ट’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ॲड. मोनिका अरोरा यांनी मंगळवारी व्यक्त केले. मंथनच्या वतीने मंगळवारी सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरच्या मिमोसा हॉलमध्ये आयोजित ‘समान नागरी संहिता : संविधान, गरज आणि विवरण’ या विषयावरील व्याख्यान सत्रात त्या बोलत होत्या. मंथनचे संयोजक सतीश सारडा यांनी त्यांचे स्वागत केले.

शक, हुण आक्रमणासाठी आले आणि येथेच सामावले. मुघल आले आणि त्यांनी अरबस्थानातील कायदे येथील लोकांवर लादले. केवळ सत्तेसाठी आलेल्या इंग्रजांनी येथील समाजव्यवस्थेत लुडबूड न करण्याचा विडा उचलला; परंतु हिंदू समाजातील सुधारकांनी सतीप्रथा, बालविवाह यांच्या विरोधात आवाज पुकारला, विधवा विवाह, महिलांना संपत्तीचा अधिकार आदींसाठी आवाज बुलंद केला आणि पुरातन कायद्यांची घडी पुन्हा नीट बसविण्याचा आग्रह धरला. त्याला हिंदू समाजानेही प्रतिसाद दिला.

मात्र, त्याच काळात मुस्लिमांमधील अनेक सुशिक्षित, बुद्धिजीवी हिंदूंच्या मांडीला मांडी लावून बसत असतानाही त्यांनी त्यांच्या समाजातील कुरितींविरोधात आवाज उचलण्याचे धाडस कधीही दाखवले नाही. त्याचे सोस मुस्लिम महिला सोसत असताना दिसतात. शिवाय, एकाच देशात दोन वेगळ्या धर्मांसाठी सामाजिक कायदे वेगळे का, असा प्रश्न कधीतरी उपस्थित होणारच होता. त्याची सुरुवात १९५२ मध्ये नरसूअप्पा माली विरुद्ध स्टेट ऑफ बॉम्बे या केसने झाली. पुढे शाहबानो, शायरा बानो आदींनी त्याला बळ दिले. तीन तलाक कायदा रद्द करण्यात यशही आले. आता मुस्लिमांमधील हलाला, चार लग्न आदी कुरितीही लवकरच समाप्त होतील. त्यासाठीच समान नागरी कायदा गरजेचा असल्याचे मत ॲड. मोनिका अरोरा यांनी व्यक्त केले.

भारतीय संविधानाने तुमची संस्कृती, तुमच्या परंपरा जपण्याचा अधिकार दिला आहे; परंतु ज्या कु-परंपरा येथील लोकशाही मार्गाला, समाजव्यवस्थेला, स्वातंत्र्याला बाधा पोहोचवत असतील तर त्यांचे निर्दालन म्हणजे समान नागरी कायदा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरी कायद्याचा आग्रह धरला होता; परंतु तत्कालीन सरकारांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि वर्तमानातील संघर्ष दिसून येत असल्याचे मोनिका अरोरा यावेळी म्हणाल्या.

...................

टॅग्स :Socialसामाजिक