शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्मीयांमधील कुरितींच्या निर्दालनासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 21:29 IST

Nagpur News स्त्री-पुरुषांना जगण्याचा समान अधिकार देणारा कायदा म्हणजे समान नागरी कायदा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील वकील व ‘दिल्ली रिओट्स २०२० - दी फॅक्ट’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ॲड. मोनिका अरोरा यांनी मंगळवारी व्यक्त केले.

ठळक मुद्दे प्राचीन काळापासून सामाजिक सुधारणांसाठी हिंदूच कायम आग्रही

नागपूर : कुणाच्या प्रथा-परंपरांना नव्हे तर कुरितींना दूर करत सर्वधर्मीय, सर्वपंथीय, सर्वजातीय, स्त्री-पुरुषांना जगण्याचा समान अधिकार देणारा कायदा म्हणजे समान नागरी कायदा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील वकील व ‘दिल्ली रिओट्स २०२० - दी फॅक्ट’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ॲड. मोनिका अरोरा यांनी मंगळवारी व्यक्त केले. मंथनच्या वतीने मंगळवारी सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरच्या मिमोसा हॉलमध्ये आयोजित ‘समान नागरी संहिता : संविधान, गरज आणि विवरण’ या विषयावरील व्याख्यान सत्रात त्या बोलत होत्या. मंथनचे संयोजक सतीश सारडा यांनी त्यांचे स्वागत केले.

शक, हुण आक्रमणासाठी आले आणि येथेच सामावले. मुघल आले आणि त्यांनी अरबस्थानातील कायदे येथील लोकांवर लादले. केवळ सत्तेसाठी आलेल्या इंग्रजांनी येथील समाजव्यवस्थेत लुडबूड न करण्याचा विडा उचलला; परंतु हिंदू समाजातील सुधारकांनी सतीप्रथा, बालविवाह यांच्या विरोधात आवाज पुकारला, विधवा विवाह, महिलांना संपत्तीचा अधिकार आदींसाठी आवाज बुलंद केला आणि पुरातन कायद्यांची घडी पुन्हा नीट बसविण्याचा आग्रह धरला. त्याला हिंदू समाजानेही प्रतिसाद दिला.

मात्र, त्याच काळात मुस्लिमांमधील अनेक सुशिक्षित, बुद्धिजीवी हिंदूंच्या मांडीला मांडी लावून बसत असतानाही त्यांनी त्यांच्या समाजातील कुरितींविरोधात आवाज उचलण्याचे धाडस कधीही दाखवले नाही. त्याचे सोस मुस्लिम महिला सोसत असताना दिसतात. शिवाय, एकाच देशात दोन वेगळ्या धर्मांसाठी सामाजिक कायदे वेगळे का, असा प्रश्न कधीतरी उपस्थित होणारच होता. त्याची सुरुवात १९५२ मध्ये नरसूअप्पा माली विरुद्ध स्टेट ऑफ बॉम्बे या केसने झाली. पुढे शाहबानो, शायरा बानो आदींनी त्याला बळ दिले. तीन तलाक कायदा रद्द करण्यात यशही आले. आता मुस्लिमांमधील हलाला, चार लग्न आदी कुरितीही लवकरच समाप्त होतील. त्यासाठीच समान नागरी कायदा गरजेचा असल्याचे मत ॲड. मोनिका अरोरा यांनी व्यक्त केले.

भारतीय संविधानाने तुमची संस्कृती, तुमच्या परंपरा जपण्याचा अधिकार दिला आहे; परंतु ज्या कु-परंपरा येथील लोकशाही मार्गाला, समाजव्यवस्थेला, स्वातंत्र्याला बाधा पोहोचवत असतील तर त्यांचे निर्दालन म्हणजे समान नागरी कायदा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरी कायद्याचा आग्रह धरला होता; परंतु तत्कालीन सरकारांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि वर्तमानातील संघर्ष दिसून येत असल्याचे मोनिका अरोरा यावेळी म्हणाल्या.

...................

टॅग्स :Socialसामाजिक