शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

देशाचा खरा इतिहास जगासमोर आणणे आवश्यक - सरकार्यवाह होसबळे

By योगेश पांडे | Updated: October 2, 2023 17:35 IST

अगोदर देशात देशहिताबाबत बोलणे म्हणजे जणू अपराध होता - होसबळे

नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरदेखील अनेक जण वसाहतवादी मानसिकतेत होते. त्यामुळेच काही वर्षांअगोदरपर्यंत देशातच देशहिताबाबत बोलणे म्हणजे जणू अपराध होता. मात्र आता बौद्धिक स्वातंत्र्याकडे मार्गक्रमण सुरू आहे. देशाची स्थिती बदलत असून खरा इतिहास जगासमोर आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. शैक्षिक फाऊंडेशन व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघातर्फे आयोजित शिक्षाभूषण या शिक्षक सन्मान सोहळ्यादरम्यान ते सोमवारी बोलत होते.

रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित कार्यक्रमाला ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन येथील स्वामी चिदानंद सरस्वती महाराज अ.भा.रा.शैक्षिक महासंघाचे महामंत्री शिवानंद सिन्दनकेरा, सचिव डॉ.मनोज सिन्हा, विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्ष डॉ.कल्पना पांडे, सचिव डॉ.सतिश चाफले प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ.मिनाक्षी जैन, डॉ.कुलदीप चंद अग्निहोत्री व डॉ.संजीवनी केळकर यांना सन्मानित करण्यात आले.

काही वर्षांअगोदर भारतातील अनेक लोक वसाहतवादी मानसिकतेतच होते. त्यामुळेच राष्ट्रीय मुद्द्यांवर संशोधन, पीएचडी करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागायचा. अगदी अयोध्येवर पीएचडी करणाऱ्यांनादेखील नकार मिळायचा. मात्र आता स्थिती बदलते आहे. शिक्षकांनी नवीन पिढी घडविण्यासोबत राष्ट्रनिर्माणावर भर दिला पाहिजे. शिक्षकांना जर रस्त्यांवर आंदोलनासाठी उतरावे लागले तर ते समाजाचेच दुर्भाग्य ठरते, असे होसबळे म्हणाले. डॉ.कल्पना पांडे यांनी संचालन केले.

विरोधकांसमोर झुकण्याची गरज नाही

जेव्हा अंधकार दूर होतो तेव्हा सकारात्मक प्रकाशाला सामोरे जाण्याची इच्छा नसलेल्या विरोधी शक्ती जाणुनबुजून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र समाजातील घटकांनी अशा तत्वांना घाबरण्याची किंवा त्यांच्यासमोर झुकण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन सरकार्यवाहांनी केले.

महात्मा गांधी ते महात्मा मोदी

यावेळी स्वामी चिदानंत सरस्वती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महात्मा मोदी असा उल्लेख केला. देशातील संस्कारांमुळेच महात्मा गांधी ते महात्मा मोदी अशी अनेक मोठी व्यक्तिमत्त्व पहायला मिळाली. आज देशात संस्कारी सरकार आहे. सनातन धर्मावर काही लोक टीका करतात. मात्र सनातन धर्म हा आजार नसून उपचार आहे व समस्या नसून त्यातून शाश्वत समाधन लाभते, असे ते म्हणाले.

राममंदिराबाबत पुस्तक लिहीले म्हणून नाकारले गेले

यावेळी पुरस्कारप्राप्त डॉ.मिनाक्षी जैन यांनी त्यांचा अनुभव सांगितला. मी ज्या विचारसरणीच्या लोकांच्या मार्गदर्शनात अभ्यास केला तो परीक्षेचाच काळ होता. मी संशोधन करून अयोध्येतील राममंदिराबाबत ऐतिहासिक दाखले व पुराव्यांसह पुस्तक लिहीले. मात्र त्या काळी इतकी धास्ती होती की चार प्रकाशकांनी तर पुस्तक प्रकाशित करण्यास नकार दिला. देशातील खरा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक इतिहासकारांनादेखील असाच अनुभव आला, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर