शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

देशाचा खरा इतिहास जगासमोर आणणे आवश्यक - सरकार्यवाह होसबळे

By योगेश पांडे | Updated: October 2, 2023 17:35 IST

अगोदर देशात देशहिताबाबत बोलणे म्हणजे जणू अपराध होता - होसबळे

नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरदेखील अनेक जण वसाहतवादी मानसिकतेत होते. त्यामुळेच काही वर्षांअगोदरपर्यंत देशातच देशहिताबाबत बोलणे म्हणजे जणू अपराध होता. मात्र आता बौद्धिक स्वातंत्र्याकडे मार्गक्रमण सुरू आहे. देशाची स्थिती बदलत असून खरा इतिहास जगासमोर आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. शैक्षिक फाऊंडेशन व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघातर्फे आयोजित शिक्षाभूषण या शिक्षक सन्मान सोहळ्यादरम्यान ते सोमवारी बोलत होते.

रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित कार्यक्रमाला ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन येथील स्वामी चिदानंद सरस्वती महाराज अ.भा.रा.शैक्षिक महासंघाचे महामंत्री शिवानंद सिन्दनकेरा, सचिव डॉ.मनोज सिन्हा, विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्ष डॉ.कल्पना पांडे, सचिव डॉ.सतिश चाफले प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ.मिनाक्षी जैन, डॉ.कुलदीप चंद अग्निहोत्री व डॉ.संजीवनी केळकर यांना सन्मानित करण्यात आले.

काही वर्षांअगोदर भारतातील अनेक लोक वसाहतवादी मानसिकतेतच होते. त्यामुळेच राष्ट्रीय मुद्द्यांवर संशोधन, पीएचडी करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागायचा. अगदी अयोध्येवर पीएचडी करणाऱ्यांनादेखील नकार मिळायचा. मात्र आता स्थिती बदलते आहे. शिक्षकांनी नवीन पिढी घडविण्यासोबत राष्ट्रनिर्माणावर भर दिला पाहिजे. शिक्षकांना जर रस्त्यांवर आंदोलनासाठी उतरावे लागले तर ते समाजाचेच दुर्भाग्य ठरते, असे होसबळे म्हणाले. डॉ.कल्पना पांडे यांनी संचालन केले.

विरोधकांसमोर झुकण्याची गरज नाही

जेव्हा अंधकार दूर होतो तेव्हा सकारात्मक प्रकाशाला सामोरे जाण्याची इच्छा नसलेल्या विरोधी शक्ती जाणुनबुजून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र समाजातील घटकांनी अशा तत्वांना घाबरण्याची किंवा त्यांच्यासमोर झुकण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन सरकार्यवाहांनी केले.

महात्मा गांधी ते महात्मा मोदी

यावेळी स्वामी चिदानंत सरस्वती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महात्मा मोदी असा उल्लेख केला. देशातील संस्कारांमुळेच महात्मा गांधी ते महात्मा मोदी अशी अनेक मोठी व्यक्तिमत्त्व पहायला मिळाली. आज देशात संस्कारी सरकार आहे. सनातन धर्मावर काही लोक टीका करतात. मात्र सनातन धर्म हा आजार नसून उपचार आहे व समस्या नसून त्यातून शाश्वत समाधन लाभते, असे ते म्हणाले.

राममंदिराबाबत पुस्तक लिहीले म्हणून नाकारले गेले

यावेळी पुरस्कारप्राप्त डॉ.मिनाक्षी जैन यांनी त्यांचा अनुभव सांगितला. मी ज्या विचारसरणीच्या लोकांच्या मार्गदर्शनात अभ्यास केला तो परीक्षेचाच काळ होता. मी संशोधन करून अयोध्येतील राममंदिराबाबत ऐतिहासिक दाखले व पुराव्यांसह पुस्तक लिहीले. मात्र त्या काळी इतकी धास्ती होती की चार प्रकाशकांनी तर पुस्तक प्रकाशित करण्यास नकार दिला. देशातील खरा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक इतिहासकारांनादेखील असाच अनुभव आला, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर