शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

नागरिकांच्या जीवनात अडथळे आणणे हा कायद्याचा उद्देश नाही; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 17, 2023 11:43 IST

वहिनीच्या विनयभंगाचा गुन्हा रद्द केला

राकेश घानोडे

नागपूर : देशातील सर्व कायदे समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. नागरिकांच्या जीवनात अडथळे निर्माण करणे हा कोणत्याही कायद्याचा उद्देश नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वहिनीच्या विनयभंगाचा एफआयआर रद्द करताना नोंदविले.

न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मीकी मेनेझेस यांनी संबंधित प्रकरणावर निर्णय दिला. प्रकरणातील फिर्यादी वहिनीने एफआयआर दाखल झाल्यानंतर काही महिन्यांनी कुटुंबीयांच्या पुढाकारामुळे आरोपी दिरासोबत तडजोड करून वाद संपविला. त्यानंतर दिराने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. त्या अर्जाला सरकार पक्षाने जोरदार विरोध केला. परंतु न्यायालयाने प्रकरणातील अपवादात्मक परिस्थिती पाहता, अर्ज मंजूर केला. विनयभंगाच्या घटनेनंतर वहिनी सासरचे घर सोडून माहेरी निघून गेली होती. स्वत:ची काहीच चूक नसताना तिचे वैवाहिक जीवन संकटात सापडले हाेते. दरम्यान, तडजोड झाल्यामुळे ती सासरी परत आली आहे. ती पतीसोबत आनंदात राहत आहे. ही एकाच कुटुंबातील घटना असल्यामुळे एफआयआर रद्द केल्यास कोणालाही हानी पोहोचणार नाही. उलट दोन्ही पक्षांचे हित जपले जाईल, असेही न्यायालय पुढे म्हणाले.

...म्हणून हायकोर्टाला अमर्याद अधिकार

समाजाच्या कल्याणाचा विचार करणे हा कायद्याच्या राज्याचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे कायदेमंडळाने न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग होऊ नये व न्यायदानाचे महत्त्व टिकवून राहावे, यासाठी उच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार हा एफआयआर रद्द करणे आवश्यक आहे, असेदेखील न्यायालयाने सांगितले.

अशी होती वहिनीची तक्रार

ही घटना अकोला जिल्ह्यातील आहे. १० डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ च्या सुमारास वहिनी एकटीच घरी होती. दरम्यान, आरोपीने तिला मागून पकडून अश्लील कृत्य केले, अशी तक्रार होती. १२ डिसेंबर २०२० रोजी बारशीटाकळी पोलिसांनी दिराविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४-ए, ४५२, ५०४, ५०६ अंतर्गत एफआयआर दाखल केला होता.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय