शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नागरिकांच्या जीवनात अडथळे आणणे हा कायद्याचा उद्देश नाही; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 17, 2023 11:43 IST

वहिनीच्या विनयभंगाचा गुन्हा रद्द केला

राकेश घानोडे

नागपूर : देशातील सर्व कायदे समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. नागरिकांच्या जीवनात अडथळे निर्माण करणे हा कोणत्याही कायद्याचा उद्देश नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वहिनीच्या विनयभंगाचा एफआयआर रद्द करताना नोंदविले.

न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मीकी मेनेझेस यांनी संबंधित प्रकरणावर निर्णय दिला. प्रकरणातील फिर्यादी वहिनीने एफआयआर दाखल झाल्यानंतर काही महिन्यांनी कुटुंबीयांच्या पुढाकारामुळे आरोपी दिरासोबत तडजोड करून वाद संपविला. त्यानंतर दिराने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. त्या अर्जाला सरकार पक्षाने जोरदार विरोध केला. परंतु न्यायालयाने प्रकरणातील अपवादात्मक परिस्थिती पाहता, अर्ज मंजूर केला. विनयभंगाच्या घटनेनंतर वहिनी सासरचे घर सोडून माहेरी निघून गेली होती. स्वत:ची काहीच चूक नसताना तिचे वैवाहिक जीवन संकटात सापडले हाेते. दरम्यान, तडजोड झाल्यामुळे ती सासरी परत आली आहे. ती पतीसोबत आनंदात राहत आहे. ही एकाच कुटुंबातील घटना असल्यामुळे एफआयआर रद्द केल्यास कोणालाही हानी पोहोचणार नाही. उलट दोन्ही पक्षांचे हित जपले जाईल, असेही न्यायालय पुढे म्हणाले.

...म्हणून हायकोर्टाला अमर्याद अधिकार

समाजाच्या कल्याणाचा विचार करणे हा कायद्याच्या राज्याचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे कायदेमंडळाने न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग होऊ नये व न्यायदानाचे महत्त्व टिकवून राहावे, यासाठी उच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार हा एफआयआर रद्द करणे आवश्यक आहे, असेदेखील न्यायालयाने सांगितले.

अशी होती वहिनीची तक्रार

ही घटना अकोला जिल्ह्यातील आहे. १० डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ च्या सुमारास वहिनी एकटीच घरी होती. दरम्यान, आरोपीने तिला मागून पकडून अश्लील कृत्य केले, अशी तक्रार होती. १२ डिसेंबर २०२० रोजी बारशीटाकळी पोलिसांनी दिराविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४-ए, ४५२, ५०४, ५०६ अंतर्गत एफआयआर दाखल केला होता.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय