शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दीड तासात उधळली गाेंडखैरी काेळसा खाणीची जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2023 19:50 IST

Nagpur News नागपूरपासून अवघ्या २० किलाेमीटर अंतरावरील कळमेश्वर तालुक्याच्या गाेंडखैरी येथे प्रस्तावित भूमिगत काेळसा खाणीची जनसुनावणी पर्यावरणवाद्यांनी अवघ्या दीड तासात उधळून लावली.

नागपूर : नागपूरपासून अवघ्या २० किलाेमीटर अंतरावरील कळमेश्वर तालुक्याच्या गाेंडखैरी येथे प्रस्तावित भूमिगत काेळसा खाणीची जनसुनावणी पर्यावरणवाद्यांनी अवघ्या दीड तासात उधळून लावली. खाणीचा अहवाल गावकऱ्यांना मराठीत न मिळाल्याचा आक्षेप घेत कायदेशीर प्रक्रियाच अवलंबली गेली नसल्याचा आराेप केल्यानंतर हाेणाऱ्या प्रचंड विराेधामुळे ही जनसुनावणी रद्द करावी लागली.

गाेंडखैरी परिसरातील काेळसा खाणीचा पट्टा अदानी पाॅवर महाराष्ट्र लिमिटेडला देण्यात आला. येथे भूमिगत काेळसा खाण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र, या काेळसा खाणीला आसपासची २४ प्रमुख गावे व ८० च्यावर लहान गावांनी विराेध सुरू केला आहे. कंपनीच्या अर्जानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गुरुवारी कळमेश्वर तालुक्याच्या कारली तलावाजवळ जनसुनावणी आयाेजित केली हाेती. सुनावणी अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चाैधरी, एमपीसीबीच्या विभागीय अधिकारी हेमा देशपांडे, एसआरओ राजेंद्र पाटील तसेच कंपनीचे अधिकारीही उपस्थित हाेते. एमपीसीबीच्या पत्रानंतर आधीच २४ ग्रामपंचायतींनी ठराव पारीत करीत खाणीला विराेध दर्शविणारे पत्र एमपीसीबीला सादर केले हाेते.

अपेक्षेप्रमाणे विराेध करणाऱ्या बहुतेक गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांसह पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यही सुनावणीस हजर झाले हाेते. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, अनिल देशमुख व रमेश बंग तसेच कळमेश्वर पंचायत समिती सभापती प्रभाकर पवार, उपसभापती अविनाश पारधी, जिल्हा परिषद सदस्य भारती पाटील आदी उपस्थित हाेते. सुनील केदार यांनी खाणीसंदर्भात ग्रामपंचायतींना सादर केलेला अहवाल इंग्रजीत असल्याने नागरिकांना समजण्यास अडचण हाेत असल्याचा आक्षेप घेतला. हा अहवाल मराठीतून दिला गेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अनिल देशमुख यांनीही खाणीविराेधात भूमिका मांडत एमपीसीबीच्या अधिकारी देशपांडे यांना काेळसा खाण बंद करण्याबाबत निवेदन सादर केले. नागरिकांनी ‘बंद करा, बंद करा कोळसा खाण बंद करा’, अशी नारेबाजी करीत आपला विराेध दर्शविला. नागरिकांकडून हाेत असलेला प्रचंड विराेध पाहता जनसुनावणी रद्द करण्याची घाेषणा आरडीसी सुभाष चाैधरी यांनी केली.

कायदेशीर प्रक्रिया दुर्लक्षित केली

यावेळी पर्यावरण तज्ज्ञ सुधीर पालिवाल यांनी एमपीसीबीची वेबसाईट दाेन दिवसांपासून बंद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. वेबसाईट बंद असल्याने बहुतेकांना कंपनीचा अहवाल वाचता आला नाही व सुनावणीत ऑनलाइनही उपस्थित राहता आले नाही. शिवाय ज्याने खाणीचा अहवाल तयार केला, त्याच व्यक्तीकडून सुनावणीत सादरीकरण हाेणे अपेक्षित हाेते पण एका प्रयाेगशाळेच्या प्रतिनिधीद्वारे खाणीचा अहवाल सादर करण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.

खाणीच्या समर्थनात एकही उभा झाला नाही

सुनावणीवर आक्षेप हाेत असताना काेळसा खाणीच्या समर्थनात काेण आहे, असे विचारण्यात आले तेव्हा कुणीही हात वर केले नाही व शुकशुकाट पसरला. विराेध कुणाचा आहे, असे विचारल्यावर उपस्थित सर्व नागरिक एकाच वेळी उभे हाेऊन खाणीच्या विराेधात घाेषणाबाजी करू लागले.

लाेकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून तीव्र विराेध झाल्याने सध्या जनसुनावणी रद्द करण्यात आली. लाेकांनी खाणीबाबत अहवालाचे सादरीकरण बंद पाडले. यापुढे सुनावणी हाेणार, नाही हाेणार किंवा प्रकल्पाबाबत आता काही सांगता येणार नाही.

- हेमा देशपांडे, विभागीय अधिकारी, एमपीसीबी

टॅग्स :Socialसामाजिक