शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...तर जमिनीचे आरक्षण रद्द करण्याचा मालकाला अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 11:41 IST

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यानुसार, आरक्षित जमीन अंतिम विकास आराखडा लागू झाल्यापासून १० वर्षांच्या आत संपादित करणे आवश्यक आहे. अन्यथा जमीनमालकाला आरक्षण रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होतो.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा चौघांना दिलासा संपादनाची मुदत संपल्यास तरतूद

नागपूर : सक्षम प्राधिकारी मुदतीत संपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यास मालकाला त्याच्या जमिनीचे आरक्षण रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होतो. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यात या संदर्भात तरतूद करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या आधारावर चार जमीनमालकांना दिलासा दिला आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यानुसार, आरक्षित जमीन अंतिम विकास आराखडा लागू झाल्यापासून १० वर्षांच्या आत संपादित करणे आवश्यक आहे. अन्यथा जमीनमालकाला आरक्षण रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होतो. याकरिता, कायद्यातील कलम १२७ अंतर्गत सक्षम प्राधिकरणाला नोटीस जारी करून जमीनमालक हा संपादन प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना देऊ शकतो. त्यानंतर जमीन २४ महिन्यांत संपादित करणे बंधनकारक आहे. या मुदतीतही संपादन न झाल्यास जमीन आरक्षणमुक्त होते, तसेच मालकाला ती जमीन विकासाकरिता उपलब्ध होते.

मालकांनी १९ जानेवारी २०१७ रोजी नगर परिषदेला कलम १२७ अंतर्गत नोटीस बजावून जमीन २४ महिन्यात संपादित करण्याची सूचना केली, तसेच १६ फेब्रुवारी २०१८ रोजी स्मरणपत्रही पाठविले. परंतु, जमीन संपादित करण्यात आली नाही. परिणामी मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आरक्षण रद्द झाल्याचे जाहीर करण्याची विनंती केली होती. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी ती याचिका मंजूर केली.

दहा वर्षांनंतरही जमिनीचे संपादन नाही

न्यायालयातील प्रकरणाशी संबंधित जमीन बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आहे. पीयूष सेजपाल व इतर तिघांच्या मालकीची ही १.६२ हेक्टर जमीन ३० एप्रिल १९९२ रोजी लागू विकास आराखड्यामध्ये पार्क व शॉपिंग कॉम्प्लेक्सकरिता आरक्षित करण्यात आली होती. त्यानंतर १० वर्षापर्यंत जमीन संपादित करण्यात आली नाही.

टॅग्स :Courtन्यायालय