शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 20:18 IST

Nagpur News विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार आहे, अशी माहिती भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देनागपुरात  ५० वे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन

नागपूर : भटक्या विमुक्तांच्या मागण्यांकडे केंद्र शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे आजवर त्यांना न्याय मिळू शकला नाही. पश्चिम महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जमाती संघटनेने शेकडो मोर्चे काढून भटक्या विमुक्तांमध्ये जनजागृती केली. विदर्भात आजपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही याची खंत आहे. त्यामुळे यापुढे विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार आहे, अशी माहिती भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शनिवारी आयोजित ५० व्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनानिमित्त आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आजपर्यंत सर्व आयोगांनी भटक्या विमुक्तांचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या शिफारस केल्या. परंतु केंद्र शासनाने या शिफारसी मान्य केल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. परंतु विदर्भात आम्ही उशिरा पोहोचल्याची खंत असून, अधिवेशनात विविध विषयांवर विचारमंथन होणार असल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दीपक मस्के, मिलिंद हिवरेकर आदी उपस्थित होते.

पवारांना ‘लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा’ किताब

भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता डॉ. प्रदीप आगलावे यांच्या हस्ते होईल. दुपारी १२ वाजता भटक्या विमुक्त जमाती संघटना वाटचाल आणि दिशा यावर, तर दुपारी २.३० वाजता वैदर्भीय भटक्या विमुक्तांवर चर्चा होईल. दुपारी ४ वाजता मुख्य समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर राहतील. समारंभात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना शाहु शहाजी छत्रपती महाराज, कोल्हापूर यांच्या हस्ते ‘लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा’ किताब बहाल करण्यात येणार आहे.

..........

टॅग्स :laxman maneलक्ष्मण माने