शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 20:18 IST

Nagpur News विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार आहे, अशी माहिती भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देनागपुरात  ५० वे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन

नागपूर : भटक्या विमुक्तांच्या मागण्यांकडे केंद्र शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे आजवर त्यांना न्याय मिळू शकला नाही. पश्चिम महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जमाती संघटनेने शेकडो मोर्चे काढून भटक्या विमुक्तांमध्ये जनजागृती केली. विदर्भात आजपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही याची खंत आहे. त्यामुळे यापुढे विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार आहे, अशी माहिती भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शनिवारी आयोजित ५० व्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनानिमित्त आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आजपर्यंत सर्व आयोगांनी भटक्या विमुक्तांचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या शिफारस केल्या. परंतु केंद्र शासनाने या शिफारसी मान्य केल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. परंतु विदर्भात आम्ही उशिरा पोहोचल्याची खंत असून, अधिवेशनात विविध विषयांवर विचारमंथन होणार असल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दीपक मस्के, मिलिंद हिवरेकर आदी उपस्थित होते.

पवारांना ‘लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा’ किताब

भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता डॉ. प्रदीप आगलावे यांच्या हस्ते होईल. दुपारी १२ वाजता भटक्या विमुक्त जमाती संघटना वाटचाल आणि दिशा यावर, तर दुपारी २.३० वाजता वैदर्भीय भटक्या विमुक्तांवर चर्चा होईल. दुपारी ४ वाजता मुख्य समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर राहतील. समारंभात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना शाहु शहाजी छत्रपती महाराज, कोल्हापूर यांच्या हस्ते ‘लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा’ किताब बहाल करण्यात येणार आहे.

..........

टॅग्स :laxman maneलक्ष्मण माने