शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

केवळ हिंदू-मुस्लीमच नव्हे तर सर्व धर्माच्या ऐक्याची गरज

By आनंद डेकाटे | Updated: April 26, 2025 17:06 IST

संमेलनाध्यक्ष डाॅ. श. नू. पठाण : दहावे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन

आनंद डेकाटे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धार्मिक उन्मादामुळे प्रत्येक देश आतून पोखरला जातोय. त्यामुळे केवळ हिंदू-मुस्लीम एकोप्याचे कार्य करून चालणार नाही. तर जगातील सर्व धर्माच्या ऐक्याच्या कार्याची या देशाला व जगाला अत्यंत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी कुलगुरू, एमआयटी पुण्याचे सल्लागार आणि दहावे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डाॅ. श. नू. पठाण यांनी येथे केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे मातोश्री विमलताई देशमुख सभागृह धनवटे नॅशनल काॅलेज येथे आयोजित दहाव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या परिसराला मरहूम डाॅ. अक्रम पठाण साहित्य नगरी तर विचारपीठाला महात्मा ज्योतिबा फुले-डाॅ. आंबेडकर विचार मंच असे नाव देण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. अनुपमा उजगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार हुसेन दलवाई, प्राचार्य डाॅ. प्रशांत कोठे, मुख्य आमंत्रक प्रा. जावेद पाशा कुरैशी, प्रा. कोमल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन सरदार, अब्दुल रऊफ शेख, सरदार जगजित सिंग, ॲड. आसिफ कुरैशी, प्रा. रमेश पिसे, प्रा. फ. म. शहाजिंदे, ज्ञानेश्वर रक्षक, कुलदीप रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.

संमेलनाध्यक्ष डाॅ. श. नू. पठाण म्हणाले, मुस्लीम समाजाला शिक्षणाचे कार्यच विकासाकडे घेऊन जाईल. त्यामुळे शिक्षणावर अधिक भर द्या. एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा समन्वयाचा जागर करा. या संमेलनाचा कुठलाही राजकीय अजेंडा नाही. सर्व विचारांना सामावून घेण्यासाठी हे संमेलन असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत या संमेलनातून हिंदू-मुस्लीम एकोप्याचा संदेश जाऊ द्या. वारकरी संत व सुफी संतांनी मांडलेल्या सांप्रदायिक सद्भावाची आज २१ व्या शतकात फार गरज आहे. या संमेलनातून हा सांप्रदायिक सद्भाव व समन्वयाचा संदेश गेला तर मी या संमेलनाचा मुख्य संदेश समजेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. डाॅ. शरयू तायवाडे या स्वागताध्यक्ष होत्या. परंतु आजारपणामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांच्या वतीने प्रा. कोमल ठाकरे यांनी स्वागताध्यक्षांचे भाषण वाचून दाखविले.

मुख्य आमंत्रक प्रा. जावेश पाशा कुरैशी यांनी संमेलनाची भूमिका विशद केली. ते म्हणाले, हे संमेलन केवळ मुस्लिमांचे नाही, तर मुसलमान म्हणून व्यक्त होण्याशिवाय पर्याय नाही, हे दाखवण्यासाठीचं आहे. मुस्लिम हे अब्दुल कलाम यांच्यासारखे मिसाईलमॅनही आहेत, हे दाखवण्यासाठी आहे. सरदार जगजित सिंग, नितीन सरदार, अब्दुल रउफ शेख यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. संचालन नेहा गोडघाटे यांनी केले. तर मुबारक शेख यांनी आभार मानले. 

आज खरी गरज चांगला माणूस होण्याची आहे - उद्घाटक डाॅ. अनुपमा उजगरेडाॅ. अनुपमा उजगरे संमेलनाचे उद्घाटन करताना म्हणाल्या, सध्या लोकांची भाषा अतिशय वाईट होत चालली आहे. आज चांगले साहित्यिक होण्यापेक्षा चांगले माणूस होण्याची खरी गरज आहे. हे दहावे संमेलन आहे. असेच शंभरावे संमेलनसुद्धा व्हावे, यासाठी सातत्याने साहित्यनिर्मिती होण्याची गरज आहे. त्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. हा संवाद चांगल्या भाषेत व्हावा. साहित्य हे माणसाला जोडते. त्यामुळे सर्व समाजामध्ये सलोखा असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दहशतवादी हल्ल्याचा निषेध, मृतांना श्रद्धांजलीसाहित्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अय्युब नल्लामंदू यांनी कुरआन आयतीचे पठण केले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. जैबुन्नीसा शेख, प्रा. रुबीना पटेल यांच्यासह अनेकांचे सत्कार

स्मरणिकेसह विविध पुस्तकांचे प्रकाशन

यावेळी मऱ्हाठवाणी या स्मरणकिसह प्रा. डाॅ. प्रमोद मनघाटे लिखीत राष्ट्रंत तुकडोजी महाराज, प्रा. जावेद पाशा कुरैशी लिखीत हिंदूत्व आणि धर्मांतरीत मुसलमानांपुढील आव्हाने, अबरार नल्लामंदू संपादित कासिद संमेलन विशेषांक, मुजफ्फर सय्यद लिखीत ईद मिलन विशेषांक, डाॅ. के.जी. पठाण यांचे उतार वयातील चढण काव्यसंग्रह, गौस शिकलगार यांचे शब्द सारथी आणि मुबारक शेख लिखीत अजान आणि चालीसा या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. 

जैबुन्नीसा शेख, प्रा. रुबीना पटेल यांच्यासह अनेकांचे सत्कारयावेळी जैबुन्नीसा शेख, प्रा. रूबीना पटेल, शकील पटेल, डाॅ. मुहीम कादरी, डाॅ. शाहीद अली जाफरी, डाॅ. जलील पटेल, डाॅ. अर्जीनबी शेख, जहीरुद्दीन शेख, मलिका शेख, रहीम शेख बंदी, जमील अंसारी, यामिनी चौधरी, डाॅ. विनोद राऊत, नासीर जुम्मन शेख, नेहा गोडघाटे, शैले जैमिनी, हाजी नासीर यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :nagpurनागपूर