शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बहुमत आहे की नाही याबाबत महाविकास आघाडीने आत्मचिंतन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 21:59 IST

Nagpur News सध्या महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही याबाबत आत्मचिंतन करावे. जर बहुमत नसेल तर त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन भाजपचे नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्दे संजय राऊत यांचे मन आणखी चंचल, अस्थिर होणार

नागपूर : राज्यातील सध्याच्या स्थितीत भाजप ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. आवश्यकता भासेल तेव्हा जनहितार्थ कोअर टीम योग्य निर्णय घेईल. परंतु सध्या महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही याबाबत आत्मचिंतन करावे. जर बहुमत नसेल तर त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन भाजपचे नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते मंगळवारी नागपुरात बोलत होते.

२२ ते २४ जून या कालावधीत राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात शासन निर्णय जारी केले. एकीकडे राज्यात अस्थिर परिस्थिती असताना काही लोक स्थिर मनाने शासन निर्णय काढत पैसे कमविण्याचे उद्योग करत असल्याची शंका आम्हाला आली होती. त्यामुळेच राज्यपालांना आमच्या पक्षातर्फे निवेदन देण्यात आले होते. त्या आधारावर त्यांनी राज्य शासनाकडून माहिती मागविली आहे व त्यांचे कर्तव्य बजावले आहे. राज्यपालांनी आक्षेप घेतलेला नाही. त्यांनी केवळ माहिती मागितली आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

राऊतांच्या बोलण्यावर भाष्य नाही

संजय राऊतांच्या बोलण्यावर भाष्य करण्याची वेळ आलेली नाही. राज्यात जेवढी अस्थिरता वाढेल तेवढेच त्यांचे मनदेखील चंचल व अस्थिर होईल. अशा मन:स्थितीत ते काय भाष्य करतील याचा भरवसा नाही. राज्याला वराह, रेडे यासारखे काही शब्द नवनवीन शब्द ऐकावे लागतील, असा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला.

..म्हणून आमदारांना राज्यात राहण्याचे निर्देश

पक्ष राज्यातील स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. चुकून आमदार विदेशात गेले, न सांगता राज्याबाहेर गेले तर आवश्यकता भासेल तेव्हा अडचण होईल. त्यामुळे त्यांना राज्यात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदारसंघात राहून जनतेचे प्रश्न सोडवा. पेरणी, खते, बियाणांच्या समस्यांवर गंभीरपणे लक्ष द्या, अशा सूचनादेखील पक्षातर्फे करण्यात आल्या आहेत.

चिखलीकरांची भूमिका पक्षाची नाही

खासदार चिखलीकरांनी लवकरच राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईल, असा दावा केला. मात्र त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही. पाऊस येणार असल्याचा अंदाज काही शेतकऱ्यांना येतो व ती त्यांना पेरणीची योग्य वेळ वाटते. तसेच आमच्या पक्षातील काही लोकांनी राजकीय आकलन करून अशी भूमिका मांडली असेल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार