शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

बहुमत आहे की नाही याबाबत महाविकास आघाडीने आत्मचिंतन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 21:59 IST

Nagpur News सध्या महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही याबाबत आत्मचिंतन करावे. जर बहुमत नसेल तर त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन भाजपचे नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्दे संजय राऊत यांचे मन आणखी चंचल, अस्थिर होणार

नागपूर : राज्यातील सध्याच्या स्थितीत भाजप ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. आवश्यकता भासेल तेव्हा जनहितार्थ कोअर टीम योग्य निर्णय घेईल. परंतु सध्या महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही याबाबत आत्मचिंतन करावे. जर बहुमत नसेल तर त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन भाजपचे नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते मंगळवारी नागपुरात बोलत होते.

२२ ते २४ जून या कालावधीत राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात शासन निर्णय जारी केले. एकीकडे राज्यात अस्थिर परिस्थिती असताना काही लोक स्थिर मनाने शासन निर्णय काढत पैसे कमविण्याचे उद्योग करत असल्याची शंका आम्हाला आली होती. त्यामुळेच राज्यपालांना आमच्या पक्षातर्फे निवेदन देण्यात आले होते. त्या आधारावर त्यांनी राज्य शासनाकडून माहिती मागविली आहे व त्यांचे कर्तव्य बजावले आहे. राज्यपालांनी आक्षेप घेतलेला नाही. त्यांनी केवळ माहिती मागितली आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

राऊतांच्या बोलण्यावर भाष्य नाही

संजय राऊतांच्या बोलण्यावर भाष्य करण्याची वेळ आलेली नाही. राज्यात जेवढी अस्थिरता वाढेल तेवढेच त्यांचे मनदेखील चंचल व अस्थिर होईल. अशा मन:स्थितीत ते काय भाष्य करतील याचा भरवसा नाही. राज्याला वराह, रेडे यासारखे काही शब्द नवनवीन शब्द ऐकावे लागतील, असा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला.

..म्हणून आमदारांना राज्यात राहण्याचे निर्देश

पक्ष राज्यातील स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. चुकून आमदार विदेशात गेले, न सांगता राज्याबाहेर गेले तर आवश्यकता भासेल तेव्हा अडचण होईल. त्यामुळे त्यांना राज्यात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदारसंघात राहून जनतेचे प्रश्न सोडवा. पेरणी, खते, बियाणांच्या समस्यांवर गंभीरपणे लक्ष द्या, अशा सूचनादेखील पक्षातर्फे करण्यात आल्या आहेत.

चिखलीकरांची भूमिका पक्षाची नाही

खासदार चिखलीकरांनी लवकरच राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईल, असा दावा केला. मात्र त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही. पाऊस येणार असल्याचा अंदाज काही शेतकऱ्यांना येतो व ती त्यांना पेरणीची योग्य वेळ वाटते. तसेच आमच्या पक्षातील काही लोकांनी राजकीय आकलन करून अशी भूमिका मांडली असेल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार