शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

अजनी वन व कोराडी वीज प्रकल्पाचा मुद्दा विधानसभेत उचलणार; आदित्य ठाकरे यांची पर्यावरणवाद्यांना ग्वाही

By कमलेश वानखेडे | Updated: May 22, 2023 18:18 IST

Nagpur News अजनीवन परिसरात आयएमएस प्रकल्पासाठी कापण्यात आलेली हजारो झाडे तसेच कोराडी वीज प्रकल्पामुळे होणारे प्रदुषण हे मुद्दे आपण स्वत: विधानसभेत उचलणार, सरकारला जाब विचारणार, असे सांगत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणवाद्यांना आश्वस्त केले.

कमलेश वानखेडे

नागपूर : अजनीवन परिसरात आयएमएस प्रकल्पासाठी कापण्यात आलेली हजारो झाडे तसेच कोराडी वीज प्रकल्पामुळे होणारे प्रदुषण हे मुद्दे आपण स्वत: विधानसभेत उचलणार, सरकारला जाब विचारणार, असे सांगत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणवाद्यांना आश्वस्त केले.

आदित्य ठाकरे यांनी सोमवारी नागपुरात दाखल होते पर्यावरण कार्यकर्त्यांची भेट घेत सुमारे तासभर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी अजनी रेल्वे स्टेशन परिसरात होत असलेल्या आयएमएस प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती घेतली. पर्यावरण कार्यकर्त्यांनी अजनीवन परिसरात नव्याने आयएमएस प्रकल्पचे काम सुरू केल्याची माहिती दिली. या भागात बेकायदेशीर पणे हजारच्या जवळपास झाडे कापण्यात आल्याचे सांगितले. यातील बहुतेक झाडे हेरिटेज गटात मोडणारी होती. त्यांच्या विरोधात काही कारवाई झाली नाही. आएमएस प्रकल्प नावापुरता रद्द करण्यात आला आणि आता नव्या पद्धतीने पुन्हा सुरू करण्यात आल्याची तक्रारही करण्यात आली. ठाकरे यांनी या प्रकल्पाची उपयोगिता आणि होणारे नुकसान याची माहिती घेतली. महाविकास आघाडी सरकारने अजनी वन ला स्थगिती दिली होती, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय त्यांनी कोराडी वीज प्रकल्पाच्या प्रदूषणाची सद्य स्थिती आणि नव्या प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. कोराडीतील सहा युनिट बंद करून ६६० मेगावॅटचे दोन प्रकल्प आणण्यात येत आहे. जे लोकेशन बंद होत आहे तिथे रोजगार जाणार आहे. त्यांच्या रोजगाराचे पुढे काय ? सगळे युनिट एकाच ठिकाणी आणून स्थानिक रहिवाशांचे जीवन अधिक खालावणार असल्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला. या सर्व प्रकल्पाविषयी विधानसभेत मुद्दा उचलण्याची ग्वाही दिली. जून महिन्यात नागपूरला पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्याची योजना असून त्यात सर्व प्रकल्पांविषयी सविस्तर चर्चा आणि जनजागृती करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लिना बुधे, अनसूया काळे छबरणी, कुणाल मौर्य, प्राची महुरकर, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.

-नांदगाव ‘ॲशपॉण्ड’ ग्रस्तांशी संवाद

- आदित्य ठाकरे यांनी कोराडी खापरखेडा वीज केंद्रातील राख साठविण्यात येणाऱ्या नांदगाव ‘ॲशपॉण्ड’ची पुन्हा एकदा भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ‘ॲशपॉण्ड’ग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. येथे पुन्हा राखेची साठवणूक सुरू झाली असल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर त्यांनी वराडा येथे भेट देऊन गुप्ता कोल वॉशरीजमुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कोल वॉशरीज विदर्भात वाढत चालली आहे. आपण पर्यावरण मंत्री असतांना हे थांबिविले होते, असेही त्यांनी सांगितले. आज आपला दौरा आहे व रस्त्यांवर कोळशाचा काळा थर दिसू नये म्हणून पाणी मारण्यात आल्याचे दिसते, असे सांगत हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. या दौऱ्यात माजी खा. प्रकाश जाधव, जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले, शहर प्रमुख नितीन तिवारी, हर्षल काकडे आदी सहभागी झाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे