शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

हिंदुराष्ट्राचा आग्रह म्हणजे महिलांना पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचे षडयंत्र

By आनंद डेकाटे | Updated: July 5, 2025 20:05 IST

प्रा. विमल थोरात : जागतिक महिला परीषदेत विचारांचा जागर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत असून, हा आग्रह म्हणजे भारतीय महिलांना पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचे षडयंत्र होय, असे प्रतिपादन जेएनयुच्या प्रा. डॉ. विमल थोरात यांनी येथे केले. कामठी मार्गावरील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंन्शन सेंटर येथे शनिवारी आयोजित जागतिक रिपब्लिकन महिला परीषदेत त्या बोलत होत्या. 

परीषदेचे उद्घाटन पीपल्स एज्युकेशन सोसायटी, छत्रपती संभाजीनगर येथील सेवानिवृत्त ग्रंथपाल मालती वराळे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, दीपा श्रावस्ती, पुष्पा वैद्य, सुमेधा राऊत, प्रा.गौतमी खोब्रागडे आदी विचारपीठावर होते.

डॉ. थोरात म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब म्हणायचे की शिक्षणाशिवाय दुसरे मौलीक धन कोणतेच नाही. आज आपण याच विद्याधनाच्या आधारावर आपली नेत्रदिपक प्रगती होत आहे. मागासवगींयांच्या शिक्षणात गळती होत आहे. शिवाय महिलांबद्दलचा तिरस्कारही कमी झालेला नाही.  

राही भिडे म्हणाल्या, महाराष्ट्रासारख्या प्रगत व पुरोगामी राज्यात महिला मुख्यमंत्री होऊ शकल्या नाहीत. उत्तरप्रदेश, बिहार, जम्मु काश्मीर, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात महिलांना संधी मिळाली. 

मालती वराळे म्हणाल्या, बाबासाहेबानंतर रिपब्लिकन चळवळीला बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांनी न्याय मिळवून दिला. महिलांची चळवळ पुढे नेऊन मोठी शक्ती निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सुषमा भड, पुष्पा बौध्द, प्रा. गौतमी खोब्रागडे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक छाया बेहरे-खोब्रागडे यांनी केले. कल्पना मेश्राम यांनी उद्देशिकेचे वाचन, संचालन तक्षशिला वाघधरे आणि आभार जयश्री गणवीर यांनी मानले. 

उद्घाटन सत्रानंतर 'आंबेडकरी चळवळीत महिलांचे योगदान आणि महिलांचे संवैधानिक अधिकार व आजचे वास्तव'यावर परीसंवाद झाला. सुजाता लोखंडे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यानंतर शोभा गौतम पाटील यांनी 'मी रमाई बोलतेय'हा एकपात्री प्रयोग सादर केला. सायंकाळी झुंजार महिला कार्यकर्त्यांचा सत्कार, कवी संमेलन झाले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी लीला चितळे यांच्या उपस्थितीत परीषदेचा समारोप झाला. या सत्राचे संचालन सरिता सातारडे, आभार वर्षा शामकुळे यांनी मानले.

टॅग्स :nagpurनागपूर