शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

भुकेने व्याकूळ भीक मागणारे वाढले, हॉटेलात रोज १५ टन अन्नाची नासाडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 13:00 IST

वेदनादायी वास्तव : भुकेपोटी भीक मागणाऱ्यांच्याही संख्येत वाढ

नागपूर : शहरातील चौकांमध्ये, मंदिर, दर्गा, मस्जिदीपुढे भुकेपोटी भीक मागणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. तर दुसरीकडे शहरातील हॉटेल्समधून उरलेले, शिळे १५ टन अन्न कचऱ्यामध्ये दररोज टाकावे लागते. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दररोज सकाळी हॉटेलमधूनअन्न गोळा केले जाते. जे भांडेवाडीत टाकले जाते. त्यातून हे वेदनादायी वास्तव पुढे आले आहे.

महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कचरा गाड्या दररोज सकाळी शहरातील हॉटेल्समधील ‘कचरा’ गोळा करायला बाहेर पडतात. त्यांच्याकडे गोळा होणाऱ्या अन्नामध्ये अर्धवट टाकून दिलेल्या चपात्यांच्या राशी, शिल्लक राहिलेले भाताचे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या बिर्याणीचे ढीग, ग्राहकांनी ताटातच शिल्लक ठेवून दिलेल्या मांसाहारी आणि शाकाहारी भाज्या, कांदा-लिंबू, मुळा, बीट आणि गाजराचे तुकडे असे सारे अन्नाचे प्रकार या कचऱ्यात बघायला मिळतात.

तर दुसरीकडे शहरात फेरफटका मारल्यावर वेदनादायी चित्रही बघायला मिळते. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी अनेक जण एकवेळच्या अन्नालाही महाग आहेत. भुकेपोटी भीक मागणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. गोरगरिबांच्या वस्त्यांमधून कोंड्याचा मांडा करून गुजराण सुरू आहे. मात्र, त्याचवेेळी शहरात दररोज कित्येक टन अन्नाची अक्षरश: माती होताना दिसत आहे.

नागपूर शहरात ५०० वर हॉटेल

शहरात नोंदणीकृत हॉटेलांची संख्या ५०० च्यावर आहे. हॉटेल्सशिवाय खास सावजी जेेवणासाठी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंभरभर खासगी खानावळीही आहेत. याशिवाय रस्त्या-रस्त्यांवर दिसणारी छोटी-मोठी हॉटेल्स वेगळीच. जेवणाच्या बाबतीत नागपूरची स्वत:ची अशी एक खासियत आहे. या हॉटेल्स आणि खानावळींमधून दररोज एक ते दीड लाखांहून अधिक लोक जेवण करतात. तेवढ्याच मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडीही होते. कचरा डेपोकडे धावणारे अन्नाचे कचऱ्याचे ट्रक बघितल्यानंतर संवेदनशील माणसाच्या मनाला तडे गेल्याशिवाय राहत नाहीत.

टॅग्स :foodअन्नhotelहॉटेल