शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

श्रीक्षेत्र आदासा येथील ऐतिहासिक बाहुली विहिरी मोजतायेत शेवटच्या घटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 11:22 IST

श्रीक्षेत्र आदासा येथे कोरीव दगडापासून साकारण्यात आलेल्या बाहुली विहिरी म्हणजे प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमूना आहे.

ठळक मुद्देश्रीक्षेत्र आदासा येथे तीन बाहुली विहीर : वैभव जपण्याची गरज

विजय नागपुरे

कळमेश्वर (नागपूर) : श्रीक्षेत्र आदासा हे शमीविघ्नेश्वर देवस्थानसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. या देवस्थानचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे. परंतु याच क्षेत्रात पुरातन असलेल्या बाहुली विहिरींचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. श्रीक्षेत्र आदासा येथे कोरीव दगडापासून साकारण्यात आलेल्या बाहुली विहिरी म्हणजे प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमूना आहे.

आदासा येथे ग्रामपंचायतजवळ असलेली बाहुली ही पटकाखेडी येथील व्यक्तीने परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता बांधलेली होती. तर गोडशेच्या वाड्याजवळ असलेली बाहुली विहिरीचा उपयोग ठरवीक मंडळीच करायचे असे ग्रामस्थ सांगतात. तसेच मातोश्री वृद्धाश्रमजवळील विहीर ही देवस्थान अंतर्गत येत असून या विहिरीतील पाण्याचा वापर शमी विघ्नेश्वराचे मंदिराचे बांधकाम करण्यासाठी करण्यात आला होता, अशी माहिती आहे.

ग्रामपंचायतजवळील बाहुली विहीर ही अंदाजे ६५ फूट खोल आहे. विहिरीचे दुमजली बांधकाम असून वरच्या भागावर बांधण्यात आलेल्या खोलीत आराम करण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती. या विहिरीचे बांधकाम मजबूत असून विहिरीची साफसफाई व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. परंतु सध्या संपूर्ण विहीर कोरडी असून नागरिक येथे केरकचरा टाकत असल्याने ते बुजण्याच्या मार्गावर आहे. तसेच गोडशेच्या वाड्याजवळील विहीर पूर्णत: जीर्ण झाली असून तिचे बांधकाम अष्टकोनी आकारात आहे.

२४ वर्षांपूर्वी मातोश्री वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका देणगीदाराच्या आर्थिक साह्यातून वृद्धाश्रम जवळील विहीर स्वच्छ करण्यात आली होती. त्यानंतर मात्र या विहिरीकडे दुर्लक्ष झाल्याने ही विहीर झाडाझुडपात गडबड झाल्याने अस्तित्वासाठी झगडतांना दिसत आहे.

गावाची तहान भागवायच्या

या तीनही विहिरींना पूर्वी मुबलक प्रमाणात पाणी असायचे. संपूर्ण गावाची तहान या विहिरीमधून भागायची. परंतु कालांतराने घरोघरी नळाद्वारे पाणी व हातपंप तयार झाल्याने या विहिरीच्या पाण्याचा उपयोग होणे बंद झाले. तसेच परिसरात कोळसा खदान झाल्याने या विहिरींचे पाणीसुद्धा आटले असल्याची माहिती आदासा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण धोटे (७६) यांनी दिली.

वृद्धाश्रमाजवळील विहिरीतील पाणी पिण्यासाठी गोड असल्याने आम्ही लहान असताना शाळेत आल्यावर या विहिरीत पायऱ्याद्वारे उतरून पाणी पिण्याचा आनंद घेत होतो.

हरिश्चंद्र सावध, सोनपूर

टॅग्स :historyइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणnagpurनागपूर