शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

'त्या' गावकऱ्यांच्या यातनांची हायकोर्टाकडून दखल, पण सरकारला जाग कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 08:10 IST

Gadchiroli News देशाने गेल्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. परंतु, राजकीय उदासीनतेमुळे देशातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देदिना धरणाच्या पाण्यामुळे सहा-सात महिने जातात संपर्काबाहेरगडचिरोली जिल्ह्यातील चार गावे मूलभूत सुविधांपासून वंचित

राकेश घानोडे

नागपूर : देशाने गेल्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. परंतु, राजकीय उदासीनतेमुळे देशातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वेंगणूर, सुरगाव, अळंगेपल्ली व पडकाटोला या चार गावांचा समावेश आहे.

ही गावे पक्के रस्ते, पक्के पूल व आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. दरम्यान, यासंदर्भात गावकऱ्यांनी शक्य होईल तेथे डोकी आपटली, पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या जूनमध्ये गावकऱ्यांच्या यातनांची दखल घेतली व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता स्वत:च जनहित याचिका दाखल केली. असे असले तरी सरकारने मनावर घेतल्याशिवाय गावकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणे अशक्य आहे. त्यामुळे सरकारला कधी जाग येणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहून स्वत:च्या व्यथा सांगितल्या होत्या. ही गावे मुलचेरा तालुक्यात आहेत. या गावांमध्ये माडिया गोंड जमातीचे नागरिक राहतात. केंद्र सरकारने १७ सप्टेंबर २०१९ रोजी परिपत्रक जारी करून ही जमात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या जमातीच्या संवर्धानाकरिता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, राज्य सरकार याबाबतीत उदासीन असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यामध्ये दिना धरणातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर ही गावे चारही बाजूने जलमय होतात व दरवर्षी सुमारे सहा-सात महिने संपर्काबाहेर जातात. ही गावे वर्षभर संपर्कात राहण्याकरिता अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सरकारला फटकारले होते. सरकारचे अधिकारी एसी रूममध्ये बसून केवळ चालढकल करतात, असे ताशेरे ओढले होते. या गावांपर्यंत पक्के रस्ते व पक्के पूल बांधणे आवश्यक आहे. परंतु, त्याकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. पाणी साचल्यानंतर गावकऱ्यांना केवळ होड्या दिल्या जातात. आरोग्य सुविधा व जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी गावकरी जीव धोक्यात टाकून त्या होड्यांचा उपयोग करतात. सरकारने या तात्पुरत्या सुविधेद्वारे आतापर्यंत वेळ मारत आणली आहे.

आरोग्य केंद्र २० किमी लांब

सध्याचे आरोग्य केंद्र या गावांपासून २० किलोमीटर लांब आहे. परिणामी, अकस्मात परिस्थितीत गावकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. २०१९ मध्ये जिल्हा परिषदेने वेंगणूर येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला होता, पण त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. वेंगणूर येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात यावे, आरोग्य केंद्र मंजूर होईपर्यंत एक डॉक्टरला तात्पुरते नियुक्त करावे, गावांपर्यंत पक्के रस्ते व पक्के पूल बांधण्यात यावेत आणि पावसाळ्यात वीज खंडित होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या, अशा गावकऱ्यांच्या मागण्या आहेत.

एका महिलेचा अनुभव धक्कादायक

या दुर्गम भागातील एक महिला गर्भवती असताना दिना धरण पूर्णपणे पाण्याने भरले होते. त्यामुळे तिला जीव धोक्यात टाकून होडीने रुग्णालयात जावे लागत होते. अनेकदा रुग्णालयात जाणे शक्य होत नव्हते. दरम्यान, बाळंतपण होईपर्यंत तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. उच्च न्यायालयाला पाठविलेल्या पत्रात संबंधित महिलेने हे अनुभव कथन केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय