शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

'त्या' गावकऱ्यांच्या यातनांची हायकोर्टाकडून दखल, पण सरकारला जाग कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 08:10 IST

Gadchiroli News देशाने गेल्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. परंतु, राजकीय उदासीनतेमुळे देशातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देदिना धरणाच्या पाण्यामुळे सहा-सात महिने जातात संपर्काबाहेरगडचिरोली जिल्ह्यातील चार गावे मूलभूत सुविधांपासून वंचित

राकेश घानोडे

नागपूर : देशाने गेल्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. परंतु, राजकीय उदासीनतेमुळे देशातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वेंगणूर, सुरगाव, अळंगेपल्ली व पडकाटोला या चार गावांचा समावेश आहे.

ही गावे पक्के रस्ते, पक्के पूल व आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. दरम्यान, यासंदर्भात गावकऱ्यांनी शक्य होईल तेथे डोकी आपटली, पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या जूनमध्ये गावकऱ्यांच्या यातनांची दखल घेतली व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता स्वत:च जनहित याचिका दाखल केली. असे असले तरी सरकारने मनावर घेतल्याशिवाय गावकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणे अशक्य आहे. त्यामुळे सरकारला कधी जाग येणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहून स्वत:च्या व्यथा सांगितल्या होत्या. ही गावे मुलचेरा तालुक्यात आहेत. या गावांमध्ये माडिया गोंड जमातीचे नागरिक राहतात. केंद्र सरकारने १७ सप्टेंबर २०१९ रोजी परिपत्रक जारी करून ही जमात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या जमातीच्या संवर्धानाकरिता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, राज्य सरकार याबाबतीत उदासीन असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यामध्ये दिना धरणातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर ही गावे चारही बाजूने जलमय होतात व दरवर्षी सुमारे सहा-सात महिने संपर्काबाहेर जातात. ही गावे वर्षभर संपर्कात राहण्याकरिता अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सरकारला फटकारले होते. सरकारचे अधिकारी एसी रूममध्ये बसून केवळ चालढकल करतात, असे ताशेरे ओढले होते. या गावांपर्यंत पक्के रस्ते व पक्के पूल बांधणे आवश्यक आहे. परंतु, त्याकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. पाणी साचल्यानंतर गावकऱ्यांना केवळ होड्या दिल्या जातात. आरोग्य सुविधा व जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी गावकरी जीव धोक्यात टाकून त्या होड्यांचा उपयोग करतात. सरकारने या तात्पुरत्या सुविधेद्वारे आतापर्यंत वेळ मारत आणली आहे.

आरोग्य केंद्र २० किमी लांब

सध्याचे आरोग्य केंद्र या गावांपासून २० किलोमीटर लांब आहे. परिणामी, अकस्मात परिस्थितीत गावकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. २०१९ मध्ये जिल्हा परिषदेने वेंगणूर येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला होता, पण त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. वेंगणूर येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात यावे, आरोग्य केंद्र मंजूर होईपर्यंत एक डॉक्टरला तात्पुरते नियुक्त करावे, गावांपर्यंत पक्के रस्ते व पक्के पूल बांधण्यात यावेत आणि पावसाळ्यात वीज खंडित होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या, अशा गावकऱ्यांच्या मागण्या आहेत.

एका महिलेचा अनुभव धक्कादायक

या दुर्गम भागातील एक महिला गर्भवती असताना दिना धरण पूर्णपणे पाण्याने भरले होते. त्यामुळे तिला जीव धोक्यात टाकून होडीने रुग्णालयात जावे लागत होते. अनेकदा रुग्णालयात जाणे शक्य होत नव्हते. दरम्यान, बाळंतपण होईपर्यंत तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. उच्च न्यायालयाला पाठविलेल्या पत्रात संबंधित महिलेने हे अनुभव कथन केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय