शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' गावकऱ्यांच्या यातनांची हायकोर्टाकडून दखल, पण सरकारला जाग कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 08:10 IST

Gadchiroli News देशाने गेल्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. परंतु, राजकीय उदासीनतेमुळे देशातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देदिना धरणाच्या पाण्यामुळे सहा-सात महिने जातात संपर्काबाहेरगडचिरोली जिल्ह्यातील चार गावे मूलभूत सुविधांपासून वंचित

राकेश घानोडे

नागपूर : देशाने गेल्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. परंतु, राजकीय उदासीनतेमुळे देशातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वेंगणूर, सुरगाव, अळंगेपल्ली व पडकाटोला या चार गावांचा समावेश आहे.

ही गावे पक्के रस्ते, पक्के पूल व आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. दरम्यान, यासंदर्भात गावकऱ्यांनी शक्य होईल तेथे डोकी आपटली, पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या जूनमध्ये गावकऱ्यांच्या यातनांची दखल घेतली व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता स्वत:च जनहित याचिका दाखल केली. असे असले तरी सरकारने मनावर घेतल्याशिवाय गावकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणे अशक्य आहे. त्यामुळे सरकारला कधी जाग येणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहून स्वत:च्या व्यथा सांगितल्या होत्या. ही गावे मुलचेरा तालुक्यात आहेत. या गावांमध्ये माडिया गोंड जमातीचे नागरिक राहतात. केंद्र सरकारने १७ सप्टेंबर २०१९ रोजी परिपत्रक जारी करून ही जमात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या जमातीच्या संवर्धानाकरिता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, राज्य सरकार याबाबतीत उदासीन असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यामध्ये दिना धरणातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर ही गावे चारही बाजूने जलमय होतात व दरवर्षी सुमारे सहा-सात महिने संपर्काबाहेर जातात. ही गावे वर्षभर संपर्कात राहण्याकरिता अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सरकारला फटकारले होते. सरकारचे अधिकारी एसी रूममध्ये बसून केवळ चालढकल करतात, असे ताशेरे ओढले होते. या गावांपर्यंत पक्के रस्ते व पक्के पूल बांधणे आवश्यक आहे. परंतु, त्याकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. पाणी साचल्यानंतर गावकऱ्यांना केवळ होड्या दिल्या जातात. आरोग्य सुविधा व जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी गावकरी जीव धोक्यात टाकून त्या होड्यांचा उपयोग करतात. सरकारने या तात्पुरत्या सुविधेद्वारे आतापर्यंत वेळ मारत आणली आहे.

आरोग्य केंद्र २० किमी लांब

सध्याचे आरोग्य केंद्र या गावांपासून २० किलोमीटर लांब आहे. परिणामी, अकस्मात परिस्थितीत गावकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. २०१९ मध्ये जिल्हा परिषदेने वेंगणूर येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला होता, पण त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. वेंगणूर येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात यावे, आरोग्य केंद्र मंजूर होईपर्यंत एक डॉक्टरला तात्पुरते नियुक्त करावे, गावांपर्यंत पक्के रस्ते व पक्के पूल बांधण्यात यावेत आणि पावसाळ्यात वीज खंडित होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या, अशा गावकऱ्यांच्या मागण्या आहेत.

एका महिलेचा अनुभव धक्कादायक

या दुर्गम भागातील एक महिला गर्भवती असताना दिना धरण पूर्णपणे पाण्याने भरले होते. त्यामुळे तिला जीव धोक्यात टाकून होडीने रुग्णालयात जावे लागत होते. अनेकदा रुग्णालयात जाणे शक्य होत नव्हते. दरम्यान, बाळंतपण होईपर्यंत तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. उच्च न्यायालयाला पाठविलेल्या पत्रात संबंधित महिलेने हे अनुभव कथन केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय