शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

स्वातंत्र्यवीर' हा वीर निराळाच आहे; मृत्यूरुपी पात्राने संवादात व्यक्त केली भावना

By आनंद डेकाटे | Updated: May 29, 2023 18:52 IST

Nagpur News 'स्वातंत्र्यवीर' हा वीर निराळाच आहे, अशी भावना मृत्यूरुपी पात्राने 'वीर सावरकरांचा मृत्यूची संवाद' या अभीवाचन कार्यक्रमात व्यक्त केली.

नागपूर : 'स्वातंत्र्यवीर' हा वीर निराळाच आहे, अशी भावना मृत्यूरुपी पात्राने 'वीर सावरकरांचा मृत्यूची संवाद' या अभीवाचन कार्यक्रमात व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे मृत्यूशय्येवर असताना अंतिम २६ दिवसांचे त्यांचे आणि मृत्यूरुपी काळ यांच्यातील संवादरुपी जीवनपटाचे अभिवाचन दिग्दर्शक नरेंद्र आमले आणि मुंबई आकाशवाणी येथील वृत्त निवेदक उमेश घळसासी यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंती दिनाच्या पर्वावर अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे हा अभिवाचन कार्यक्रम पार पडला. प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप पोकळे पाटील, पिंपरी चिंचवड येथील रंगमुद्रा थिएटरचे नरेंद्र आमले, उमेश घळसासी, विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात, विद्यापीठ शताब्दी महोत्सव सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रमोद तिजारे आदी व्यासपीठावर होते.

वि. दा. सावरकर यांनी वयाच्या १६ व्या वर्षी घेतलेल्या प्रतिज्ञेपासून ते मृत्यूपर्यंतचा जीवनपट अभिवाचनातून उलगडला गेला. 'स्वातंत्र्य लक्ष्मी की जय' असा दिलेला नारा, विदेशी कापडांची होळी केल्याने फर्ग्युसनच्या प्राचार्यांनी ठोठावलेला १० रुपयांचा दंड, लंडनच्या इंडिया हाऊस मधील मदनलाल धिंग्रा आणि क्रांतिकारकांसोबत आलेला सहवास, २१ पिस्तूल भारतात पाठविण्याची कामगिरी, 'ने मजसी ने परत मातृभूमीला' कवितेच्या आठवणीची उजळणी, स्वातंत्र्यवीरांसह संपूर्ण सावरकर कुटुंबीय झाले निर्वासित, दोन जन्मठेपेची म्हणजेच ५० वर्षाची काळ्या पाण्याची अभूतपूर्व शिक्षा, अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये खचून न जाता लाभलेले मानसिक स्थैर्य, एकांत वास मिळाल्याने विज्ञानाधिष्ठ हिंदुत्वनिष्ठ होण्याचे कारण असे त्यांच्या मृत्यूपर्यंतचा जीवनपट या अभिवाचनातून व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर