शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

धर्माच्या नावावर सरकार देशातील जनतेला धोका देतेय - मल्लिकार्जुन खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 12:22 IST

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत लिखित ‘आंबेडकर ऑन पाॅप्युलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी देशपांडे सभागृहात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खरगे उपस्थित होते.

ठळक मुद्देनितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पाॅप्युलेशन पॉलिसी’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : सध्या देश दोनच लोक चालवत आहेत. या दोन लोकांनी गरिबांच्या तोंडचा घास हिरावला आहे. कोरोनाने लोकांचा रोजगार हिरावल्यामुळे पोटापाण्याचे संकट निर्माण झाले आहे. महागाईच्या भस्मासुराने गरिबांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण केला आहे. गरिबांना बरबाद करणारे हे सरकार केवळ धर्माच्या नावावर जनतेच्या भावनांशी खेळत असून, देशातील १३० कोटी लोकांना धोका देत असल्याचा आरोप राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी येथे केला.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत लिखित ‘आंबेडकर ऑन पाॅप्युलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी देशपांडे सभागृहात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खरगे उपस्थित होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, विशेष अतिथी यूएसएच्या इंडियाना विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. केविन डी. ब्राऊन, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी एससी, एसटी, मायनॉरिटी विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू व तामिळनाडू विधानसभेतील काँग्रेसचे नेते सेल्वर पेरुंदगाई यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली होती. यावेळी पुस्तकाच्या निर्मितीमागील संकल्पना सांगताना डॉ. राऊत म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार किती प्रगल्भ होते याची जाणीव या पुस्तकातून होते. १९३८ मध्येच बाबासाहेबांनी कुटुंब नियोजनाचे बिल सादर केले होते. त्यावेळी त्याचा प्रचंड विरोध झाला. वाढती लोकसंख्या गरिबीचे महत्त्वाचे कारण ठरू शकते हा विचार त्यांनी त्याकाळी मांडला होता. लोकसंख्येमुळे शेतीवरचा भार वाढेल, जमिनीचे तुकडे होतील आणि शेतकऱ्यांना शेती करणे परवडणार नाही, ही भूमिका त्यांची होती. आज नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार ५१ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. बाबासाहेब भविष्यवेत्ता होते. त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि उपाययोजना सुचविल्या. त्यामुळेच १९३८ ला मांडलेले लोकसंख्या नियंत्रणाचे बिल इंदिरा गांधींनी १९७४ मध्ये अमलात आणले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित डॉ. ब्राऊन म्हणाले की, नागपूर असो, की महाराष्ट्र येथून बाबासाहेबांचा विचार या जगापर्यंत पोहोचविला. येथून बाबासाहेबांवर मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली आहे. बाबासाहेबांचे हे विचार अमेरिका, आफ्रिकेत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कोमल ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले.

- प्रबोधनकारांचे विचार तरी कुटुंबीयांनी जोपासावेत

जाती-धर्माच्या भिंती मोडण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांसोबत काम केले. प्रबोधनकारांचा विचार आज त्यांच्याच कुटुंबातील लोक विसरले आहेत. ते चिथावणीखोर वक्तव्य करून जाती-धर्मात तेढ निर्माण करीत असल्याचा टोला खरगे यांनी राज ठाकरेंना लगावला.

भक्त बना, अंध भक्त बनू नका - मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब हे ज्ञानाचा अथांग सागर. त्यांचे विचार हे देशासाठी पोषक आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे भक्त बनण्याची गरज आहे; पण आज अंध भक्तांचा सुळसुळाट झाला आहे. ते विनाकारण उधोउधो करीत फिरतात. हे भक्त कधीही आपले दैवत बदलवू शकतात. बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवणारे कधीही अंध भक्ती करीत नसल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन संवाद साधताना व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Rautनितीन राऊत