शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या नावावर सरकार देशातील जनतेला धोका देतेय - मल्लिकार्जुन खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 12:22 IST

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत लिखित ‘आंबेडकर ऑन पाॅप्युलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी देशपांडे सभागृहात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खरगे उपस्थित होते.

ठळक मुद्देनितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पाॅप्युलेशन पॉलिसी’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : सध्या देश दोनच लोक चालवत आहेत. या दोन लोकांनी गरिबांच्या तोंडचा घास हिरावला आहे. कोरोनाने लोकांचा रोजगार हिरावल्यामुळे पोटापाण्याचे संकट निर्माण झाले आहे. महागाईच्या भस्मासुराने गरिबांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण केला आहे. गरिबांना बरबाद करणारे हे सरकार केवळ धर्माच्या नावावर जनतेच्या भावनांशी खेळत असून, देशातील १३० कोटी लोकांना धोका देत असल्याचा आरोप राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी येथे केला.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत लिखित ‘आंबेडकर ऑन पाॅप्युलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी देशपांडे सभागृहात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खरगे उपस्थित होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, विशेष अतिथी यूएसएच्या इंडियाना विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. केविन डी. ब्राऊन, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी एससी, एसटी, मायनॉरिटी विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू व तामिळनाडू विधानसभेतील काँग्रेसचे नेते सेल्वर पेरुंदगाई यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली होती. यावेळी पुस्तकाच्या निर्मितीमागील संकल्पना सांगताना डॉ. राऊत म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार किती प्रगल्भ होते याची जाणीव या पुस्तकातून होते. १९३८ मध्येच बाबासाहेबांनी कुटुंब नियोजनाचे बिल सादर केले होते. त्यावेळी त्याचा प्रचंड विरोध झाला. वाढती लोकसंख्या गरिबीचे महत्त्वाचे कारण ठरू शकते हा विचार त्यांनी त्याकाळी मांडला होता. लोकसंख्येमुळे शेतीवरचा भार वाढेल, जमिनीचे तुकडे होतील आणि शेतकऱ्यांना शेती करणे परवडणार नाही, ही भूमिका त्यांची होती. आज नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार ५१ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. बाबासाहेब भविष्यवेत्ता होते. त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि उपाययोजना सुचविल्या. त्यामुळेच १९३८ ला मांडलेले लोकसंख्या नियंत्रणाचे बिल इंदिरा गांधींनी १९७४ मध्ये अमलात आणले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित डॉ. ब्राऊन म्हणाले की, नागपूर असो, की महाराष्ट्र येथून बाबासाहेबांचा विचार या जगापर्यंत पोहोचविला. येथून बाबासाहेबांवर मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली आहे. बाबासाहेबांचे हे विचार अमेरिका, आफ्रिकेत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कोमल ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले.

- प्रबोधनकारांचे विचार तरी कुटुंबीयांनी जोपासावेत

जाती-धर्माच्या भिंती मोडण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांसोबत काम केले. प्रबोधनकारांचा विचार आज त्यांच्याच कुटुंबातील लोक विसरले आहेत. ते चिथावणीखोर वक्तव्य करून जाती-धर्मात तेढ निर्माण करीत असल्याचा टोला खरगे यांनी राज ठाकरेंना लगावला.

भक्त बना, अंध भक्त बनू नका - मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब हे ज्ञानाचा अथांग सागर. त्यांचे विचार हे देशासाठी पोषक आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे भक्त बनण्याची गरज आहे; पण आज अंध भक्तांचा सुळसुळाट झाला आहे. ते विनाकारण उधोउधो करीत फिरतात. हे भक्त कधीही आपले दैवत बदलवू शकतात. बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवणारे कधीही अंध भक्ती करीत नसल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन संवाद साधताना व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Rautनितीन राऊत