शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

धर्माच्या नावावर सरकार देशातील जनतेला धोका देतेय - मल्लिकार्जुन खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 12:22 IST

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत लिखित ‘आंबेडकर ऑन पाॅप्युलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी देशपांडे सभागृहात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खरगे उपस्थित होते.

ठळक मुद्देनितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पाॅप्युलेशन पॉलिसी’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : सध्या देश दोनच लोक चालवत आहेत. या दोन लोकांनी गरिबांच्या तोंडचा घास हिरावला आहे. कोरोनाने लोकांचा रोजगार हिरावल्यामुळे पोटापाण्याचे संकट निर्माण झाले आहे. महागाईच्या भस्मासुराने गरिबांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण केला आहे. गरिबांना बरबाद करणारे हे सरकार केवळ धर्माच्या नावावर जनतेच्या भावनांशी खेळत असून, देशातील १३० कोटी लोकांना धोका देत असल्याचा आरोप राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी येथे केला.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत लिखित ‘आंबेडकर ऑन पाॅप्युलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी देशपांडे सभागृहात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खरगे उपस्थित होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, विशेष अतिथी यूएसएच्या इंडियाना विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. केविन डी. ब्राऊन, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी एससी, एसटी, मायनॉरिटी विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू व तामिळनाडू विधानसभेतील काँग्रेसचे नेते सेल्वर पेरुंदगाई यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली होती. यावेळी पुस्तकाच्या निर्मितीमागील संकल्पना सांगताना डॉ. राऊत म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार किती प्रगल्भ होते याची जाणीव या पुस्तकातून होते. १९३८ मध्येच बाबासाहेबांनी कुटुंब नियोजनाचे बिल सादर केले होते. त्यावेळी त्याचा प्रचंड विरोध झाला. वाढती लोकसंख्या गरिबीचे महत्त्वाचे कारण ठरू शकते हा विचार त्यांनी त्याकाळी मांडला होता. लोकसंख्येमुळे शेतीवरचा भार वाढेल, जमिनीचे तुकडे होतील आणि शेतकऱ्यांना शेती करणे परवडणार नाही, ही भूमिका त्यांची होती. आज नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार ५१ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. बाबासाहेब भविष्यवेत्ता होते. त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि उपाययोजना सुचविल्या. त्यामुळेच १९३८ ला मांडलेले लोकसंख्या नियंत्रणाचे बिल इंदिरा गांधींनी १९७४ मध्ये अमलात आणले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित डॉ. ब्राऊन म्हणाले की, नागपूर असो, की महाराष्ट्र येथून बाबासाहेबांचा विचार या जगापर्यंत पोहोचविला. येथून बाबासाहेबांवर मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली आहे. बाबासाहेबांचे हे विचार अमेरिका, आफ्रिकेत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कोमल ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले.

- प्रबोधनकारांचे विचार तरी कुटुंबीयांनी जोपासावेत

जाती-धर्माच्या भिंती मोडण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांसोबत काम केले. प्रबोधनकारांचा विचार आज त्यांच्याच कुटुंबातील लोक विसरले आहेत. ते चिथावणीखोर वक्तव्य करून जाती-धर्मात तेढ निर्माण करीत असल्याचा टोला खरगे यांनी राज ठाकरेंना लगावला.

भक्त बना, अंध भक्त बनू नका - मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब हे ज्ञानाचा अथांग सागर. त्यांचे विचार हे देशासाठी पोषक आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे भक्त बनण्याची गरज आहे; पण आज अंध भक्तांचा सुळसुळाट झाला आहे. ते विनाकारण उधोउधो करीत फिरतात. हे भक्त कधीही आपले दैवत बदलवू शकतात. बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवणारे कधीही अंध भक्ती करीत नसल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन संवाद साधताना व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Rautनितीन राऊत