शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘हम दो आणि बाकी कुणी नाही’ असाच राज्याचा कारभार, अजित पवारांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2022 10:47 IST

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून सरकारने अगोदर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पवार यांनी केली.

नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे राज्यात जवळपास १० लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला सुमारे पंधरा दिवस झाले तरी विदर्भातील शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचे केवळ दावे करायचे व प्रत्यक्षात हम दो आणि बाकी कुणी नाही, असा राज्याचा कारभार चालवायचा, अशी स्थिती असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विदर्भाच्या अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे बुधवारी रात्री नागपुरात आगमन झाले. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत मिळायला हवी होती; परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले तरी अपेक्षित मदत मिळाली नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही अडलेलाच आहे. अस्मानी संकटाच्या स्थितीत इतके मोठे राज्य दोन मंत्र्यांच्या भरवशावर चालविणे शक्य नाही. दिवसभर सह्या करणे शक्य नाही व त्यामुळे अनेक मुद्दे प्रलंबित पडत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून सरकारने अगोदर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पवार यांनी केली.

पालकमंत्रीच नाही, मदत कशी मिळणार?

मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नाही. एकाही जिल्ह्यात पालकमंत्री नाही. त्यामुळे जिल्हापातळीवर निर्णय होत नाही. त्यामुळे मदत मिळणार तरी कशी, असा सवाल पवार यांनी केला. शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यासाठी तरी पावसाळी अधिवेशन लगेच घ्यावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

ठाकरेंच्या मुलाखतींवर प्रत्युत्तर देऊन प्रश्न सुटणार नाहीत

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रत्युत्तर देण्यात सत्ताधाऱ्यांना जास्त रस दिसतो आहे. मात्र, त्यांना प्रत्युत्तर देऊन राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही ‘एसडीआरएफ’चे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दोन ते अडीच पट मदत केली होती. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा, असे पवार यांनी प्रतिपादन केले.

गडचिरोलीच्या दुर्गम भागाला भेट

अजित पवार यांनी आज (२८ जुलै) गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिली. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी देखील केली.

टॅग्स :PoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस