शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘हम दो आणि बाकी कुणी नाही’ असाच राज्याचा कारभार, अजित पवारांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2022 10:47 IST

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून सरकारने अगोदर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पवार यांनी केली.

नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे राज्यात जवळपास १० लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला सुमारे पंधरा दिवस झाले तरी विदर्भातील शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचे केवळ दावे करायचे व प्रत्यक्षात हम दो आणि बाकी कुणी नाही, असा राज्याचा कारभार चालवायचा, अशी स्थिती असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विदर्भाच्या अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे बुधवारी रात्री नागपुरात आगमन झाले. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत मिळायला हवी होती; परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले तरी अपेक्षित मदत मिळाली नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही अडलेलाच आहे. अस्मानी संकटाच्या स्थितीत इतके मोठे राज्य दोन मंत्र्यांच्या भरवशावर चालविणे शक्य नाही. दिवसभर सह्या करणे शक्य नाही व त्यामुळे अनेक मुद्दे प्रलंबित पडत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून सरकारने अगोदर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पवार यांनी केली.

पालकमंत्रीच नाही, मदत कशी मिळणार?

मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नाही. एकाही जिल्ह्यात पालकमंत्री नाही. त्यामुळे जिल्हापातळीवर निर्णय होत नाही. त्यामुळे मदत मिळणार तरी कशी, असा सवाल पवार यांनी केला. शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यासाठी तरी पावसाळी अधिवेशन लगेच घ्यावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

ठाकरेंच्या मुलाखतींवर प्रत्युत्तर देऊन प्रश्न सुटणार नाहीत

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रत्युत्तर देण्यात सत्ताधाऱ्यांना जास्त रस दिसतो आहे. मात्र, त्यांना प्रत्युत्तर देऊन राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही ‘एसडीआरएफ’चे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दोन ते अडीच पट मदत केली होती. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा, असे पवार यांनी प्रतिपादन केले.

गडचिरोलीच्या दुर्गम भागाला भेट

अजित पवार यांनी आज (२८ जुलै) गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिली. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी देखील केली.

टॅग्स :PoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस