शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

क्षणोक्षणी मृत्यूचे भय, तरीदेखील ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत; युक्रेनच्या राजधानीतून ‘एरोस्पेस सायंटिस्ट’चा ‘आंखो देखा हाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 07:05 IST

Nagpur News पावलापावलावर मृत्यूचे भय असतानाही ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत असल्याचे दिसून येत आहे. ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून भारतीय लोक एकमेकांच्या सहकार्याने रस्तेमार्गाने युक्रेनच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत.

ठळक मुद्देअनेक भारतीय रोमानिया सीमेकडे रवाना

 

योगेश पांडे

नागपूर : सातत्याने बॉम्बचे आवाज, आजुबाजूचे भेदरलेले चेहरे, सर्व दुकाने बंद असल्यामुळे दैनंदिन गोष्टींचा तुटवडा अन् अशास्थितीत आपल्या मायभूमीची लागलेली आस. कोणत्याही क्षणी एखाद्या बॉम्बच्या स्वरुपात मृत्यू समोर उभा ठाकण्याची शक्यता असतानादेखील युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये भारतीय लोकांनी अद्यापही आशा सोडलेली नाही. पावलापावलावर मृत्यूचे भय असतानाही ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत असल्याचे दिसून येत आहे. ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून भारतीय लोक एकमेकांच्या सहकार्याने रस्तेमार्गाने युक्रेनच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. मूळचे नागपुरातील व मागील १७ वर्षांपासून युक्रेनमध्ये असलेले एरोस्पेस सायंटिस्ट राजेश मुनेश्वर यांनी हा ‘आंखो देखा हाल’ ‘लोकमत’ला सांगितला आहे.

राजेश हे त्यांची पत्नी व मुलासह कीव्हमध्ये राहतात. सर्व हवाई वाहतूक बंद असल्याने भारतात परतण्यासाठी इतरांप्रमाणे त्यांचीदेखील धडपड सुरू आहे. युक्रेनच्या विविध शहरांमध्ये हल्ला झाल्यानंतर कीव्हजवळच रशियन सैन्याने हेलिकॉप्टरदेखील पाडले. सातत्याने आम्हाला बॉम्बहल्ल्यांचा आवाज ऐकू येत आहे. युक्रेनच्या सैन्याचादेखील प्रतिकार सुरू आहे. मात्र, कीव्हमधील दोन्ही विमानतळ बंद करण्यात आले आहेत.

रशियाच्या हल्ल्यामुळे ‘एअरलिफ्ट’ची शक्यता मावळली. मात्र विमानतळाकडे निघालेले अनेक भारतीय नागरिक व विद्यार्थी रस्त्यांवर अर्ध्यातच अडकले. किव्हमध्ये भारतीय दुतावास तसेच भारतीय नागरिकांनी अशा विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यासाठी धाव घेतली आहे. मृत्यूचे भय असतानादेखील काही लोकांना घरी तर काहींना जवळील शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. अनेक विद्यार्थी किव्हमधील भारतीय दुतावासासमोर जमले आहेत. या विद्यार्थ्यांना बसेसच्या मदतीने रोमानियामध्ये नेण्यात येणार आहे. परंतु सध्या सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. ते आमच्यासमोरील मोठे आव्हान राहणार असल्याची माहिती राजेश मुनेश्वर यांनी दिली. राजेश यांनी स्पेस लॉंच वेहिकल प्रकल्पात युक्रेन सरकारसोबत काम केले आहे हे विशेष.

डोळ्यांनी दिसताहेत आगीच्या ज्वाळा

बोरिस्पिल विमानतळावर हल्ला झाला असून राजेशच्या घरापासून अवघ्या अडीच किमीवर अंतरावर असलेल्या झुलियानी विमानतळावर कधीही हल्ला होण्याची शक्यता आहे. ‘एअरलिफ्ट’ची शक्यता संपली असून पोलंड व रोमानियाकडे जाण्याची सूचना भारतीय दुतावासाने केली आहे. या दोन्ही देशांनी त्यांच्या सीमा खुल्या केल्या आहेत व हा आमच्यासाठी आशेचा मोठा किरण असल्याची भावना राजेश यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. डोळ्यांनी आगीच्या ज्वाळा पाहिल्या असून काहीही करून मायदेशात परतायचे आहे. भारतीय दुतावासातील लोक सातत्याने संपर्कात आहेत, असेदेखील त्यांनी सांगितले.

सर्व दुकाने बंद, विद्यार्थ्यांचे हाल

हल्ला झाल्यानंतर युक्रेनच्या राजधानीतील सर्व दुकाने बंद झाली आहेत. तेथील सरकारने विशिष्ट शिबीरेदेखील लावलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. खाण्यापिण्याच्या साहित्याचा तुटवडा आहे. आम्ही अगोदरपासूनच व्यवस्था केली होती व त्यातूनच भारतीय लोक इतर विद्यार्थ्यांची मदत करत आहेत. इंटरनेट सेवादेखील कधीही कोलमडू शकते, असे मुनेश्वर यांनी सांगितले.

टॅग्स :warयुद्ध