शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

नागपूरमधील ईएसआयसी रुग्णालयाची चौकशी होणार; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 06:12 IST

राज्य कर्मचारी विमा योजनेंअंतर्गत (ईएसआयसी) असलेल्या नागपुरातील रुग्णालयातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

नवी दिल्ली : राज्य कर्मचारी विमा योजनेंअंतर्गत (ईएसआयसी) असलेल्या नागपुरातील रुग्णालयातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.या संदर्भात शिवसेनेचे कृपाल तुमाने (रामटेक) यांनी प्रश्न विचारला होता. नागपुरातील या रुग्णालयात १०० खाटा आहेत. परंतु सोनोग्राफी व एक्स रे मशीनसुद्धा काम करीत नाही. या रुग्णालयात अनेक गैरव्यवहार होत असून ज्या व्यक्तीला निविदा दिल्या जातात, परंतु काम मात्र कुणी दुसरे करतात, याकडे तुमाने यांनी लक्ष वेधले. यावर उत्तर देताना भूपेंद्र यादव म्हणाले, या रुग्णालयाच्या कारभाराची माहिती घेऊन निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. रामटेक मतदारसंघात ईएसआयसीच्या रुग्णालयाचे भूमिपूजन झाले. परंतु काम थांबल्याचेही तुमाने यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रश्नाचे उत्तर देताना यादव म्हणाले, सध्या देशात ५७ रुग्णालयांचे काम प्रलंबित आहे. या रुग्णालयांचे काम सुरू करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.नवी मुंबई विमानतळाचे काम तीन वर्षांत पूर्ण होईलनवी मुंबई विमानतळाचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी पूरक प्रश्न विचारला होता. मेट्रो शहरांमधील विमानतळांचा विस्तार होत आहे. परंतु लहान शहरांमधील विमानतळाचे विस्तारीकरण होत नसल्याचे पटेल यांनी निदर्शनास आणून दिले होते. यावर बोलताना शिंदे म्हणाले, मुंबई व दिल्लीसारख्या शहरांमध्ये विमानांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. क्रूड ऑईलसाठी रशियावर अवलंबून नाहीरशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असले तरी भारत क्रूड ऑईलच्या आयातीसाठी रशियावर अवलंबून नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले.  यासंदर्भात शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रश्न विचारला होता. भारताच्या एकूण गरजेपैकी रशियाकडून केवळ ०.२ टक्के क्रूड ऑईल आयात करीत असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले. क्रूड ऑईल अमेरिका, कोरिया व आखाती देशातून आयात होते.देशात सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचा पर्यावरण व शेतीवर विपरित परिणाम होत असून यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याची मागणी भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सोमवारी राज्यसभेत शून्य तासात केली. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा सामना लोकांना करावा लागत आहे. सध्या मार्च महिना सुरू असतानाच महाराष्ट्रातील अनेक शहरांतील तापमानात अचानकपणे वाढ झाली आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक व दिल्लीतही उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. वातावरणात होत असलेल्या या बदलाचा परिणाम शेती व जीवनशैलीवर होत आहे. महिलांना लढाऊ सैन्यात प्रवेश? लढाऊ सैन्यात महिलांना प्रवेश देण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करीत असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांनी प्रश्न विचारला होता.