शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

क्रिकेट मॅच संपली अन् वर्धा रोडवर अडकली हजारो वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2023 21:28 IST

Nagpur News जामठ्याच्या व्हीसीएस स्टेडियममध्ये दुपारी २.१७ वाजता ऑस्ट्रेलियाची अखेरची विकेट पडली आणि भारताने टेस्ट मॅच जिंकली. मॅच लवकर संपल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली व वर्धा मार्गावर जाम लागला.

ठळक मुद्देअनेकांनी हिंगणा मार्गाने गाठले नागपूर

नागपूर : जामठ्याच्या व्हीसीएस स्टेडियममध्ये दुपारी २.१७ वाजता ऑस्ट्रेलियाची अखेरची विकेट पडली आणि भारताने टेस्ट मॅच जिंकली. मॅच लवकर संपल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली व वर्धा मार्गावर जाम लागला. वाहतूककोंडीतून वाचण्यासाठी अनेक वाहन चालकांना हिंगणा मार्गाने नागपूरला येण्याची पाळी आली.

 

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचच्या दरम्यान जामठ्याचे व्हीसीए स्टेडियम अर्धेच भरलेले होते. व्हीसीएने दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये केवळ २३,९४२ प्रेक्षक होते, परंतु मॅच संपताच वर्धा मार्गावर गर्दी झाली. यूटर्न घेण्याच्या नादात अनेक वाहने अडकून पडली, तर अनेक युवक आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभे करून गप्पा मारू लागले. पाहता-पाहता वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांनी वाहतुकीची कोंडी आणखीनच वाढविली, तर वारंगा लॉ युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित दीक्षांत समारंभामुळे व्हीआयपी मूव्हमेंट वाढल्यामुळे या वाहतूककोंडीत आणखी भर पडली. दरम्यान, दुपारी तीन वाजता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गर्दी होणे सुरू झाले. त्यात वर्धा मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला नसल्याने वाहतुकीची समस्या आणखीनच वाढली होती. वाहतुकीची कोंडी होत असताना, वाहतूक पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नसल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

 

..............

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी