शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

क्रिकेट मॅच संपली अन् वर्धा रोडवर अडकली हजारो वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2023 21:28 IST

Nagpur News जामठ्याच्या व्हीसीएस स्टेडियममध्ये दुपारी २.१७ वाजता ऑस्ट्रेलियाची अखेरची विकेट पडली आणि भारताने टेस्ट मॅच जिंकली. मॅच लवकर संपल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली व वर्धा मार्गावर जाम लागला.

ठळक मुद्देअनेकांनी हिंगणा मार्गाने गाठले नागपूर

नागपूर : जामठ्याच्या व्हीसीएस स्टेडियममध्ये दुपारी २.१७ वाजता ऑस्ट्रेलियाची अखेरची विकेट पडली आणि भारताने टेस्ट मॅच जिंकली. मॅच लवकर संपल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली व वर्धा मार्गावर जाम लागला. वाहतूककोंडीतून वाचण्यासाठी अनेक वाहन चालकांना हिंगणा मार्गाने नागपूरला येण्याची पाळी आली.

 

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचच्या दरम्यान जामठ्याचे व्हीसीए स्टेडियम अर्धेच भरलेले होते. व्हीसीएने दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये केवळ २३,९४२ प्रेक्षक होते, परंतु मॅच संपताच वर्धा मार्गावर गर्दी झाली. यूटर्न घेण्याच्या नादात अनेक वाहने अडकून पडली, तर अनेक युवक आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभे करून गप्पा मारू लागले. पाहता-पाहता वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांनी वाहतुकीची कोंडी आणखीनच वाढविली, तर वारंगा लॉ युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित दीक्षांत समारंभामुळे व्हीआयपी मूव्हमेंट वाढल्यामुळे या वाहतूककोंडीत आणखी भर पडली. दरम्यान, दुपारी तीन वाजता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गर्दी होणे सुरू झाले. त्यात वर्धा मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला नसल्याने वाहतुकीची समस्या आणखीनच वाढली होती. वाहतुकीची कोंडी होत असताना, वाहतूक पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नसल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

 

..............

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी