शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान तरुण पिढीत रुजवावे'; ‘अनसुया माय वाईफ’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2023 22:25 IST

Nagpur News स्वातंत्र्य पराक्रमाने मिळविलेले आहे. यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. ही भावना येणाऱ्या पिढीमध्ये रुजविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी लोकसभा अध्यक्ष व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी केले.

नागपूर : ‘दे दी हमे आजादी बिना खडग् बिना ढाल....’ असे म्हणत आपण आपली तरुण पिढी मवाळ केली. देशाला स्वातंत्र्य केवळ अहिंसेनेच मिळालेले नाही. हे स्वातंत्र्य पराक्रमाने मिळविलेले आहे. यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. ही भावना येणाऱ्या पिढीमध्ये रुजविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी लोकसभा अध्यक्ष व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी केले.

ज्येष्ठ उद्योजक दिवंगत पुरुषोत्तम काळे यांनी त्यांच्या पत्नी दिवंगत अनसुया काळे १९६२ साली प्रकाशित केलेल्या आठवणींचा संग्रह असलेल्या मराठी पुस्तकाचा दीपाली काळे यांनी इंग्रजीत ‘अनसुया माय वाईफ- द फायर ब्रॅण्ड फ्रीडम फायटर’ या शीर्षकांतर्गत अनुवाद केला असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी पार पडला. बनयान सभागृह, चिटणवीस सेंटर येथील कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सच्या माजी अध्यक्षा शीला काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, तर व्यासपीठावर विलास काळे, कुमार काळे, जयदेव काळे, प्रवीण काळे प्रामुख्याने उपस्थित होते.

माजी खासदार दिवंगत अनसुया काळे यांनी राजकारणात वावरताना व्यक्तिमत्त्व कसे असावे, अभ्यासपूर्ण कसे बोलावे, वंचित समाजासाठी विशेषत: महिलांसाठी कसे कार्य करावे याचा वस्तुपाठ घालून दिला होता. त्यांचे हे कार्य राजकारणातील सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.

शीला काकडे यांनी ऑल इंडिया वूमेन कॉन्फरन्सच्या कार्याची माहिती देताना त्यातील अनसुया काळे यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला.

नरेश सबजीवाले यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली. विलास काळे यांनी अनसुया काळे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन प्रणोती गद्रे यांनी केले. पूर्वा काळे यांनी आभार मानले.

 स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलणे हे नागपूरचे वैशिष्ट्य

नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलतात. अनुसया काळे यासुद्धा स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलत होत्या. तेव्हा स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलणे हे नागपूरचे वैशिष्ट्य असल्याचे दिसून येते, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.

टॅग्स :literatureसाहित्य