शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

'स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान तरुण पिढीत रुजवावे'; ‘अनसुया माय वाईफ’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2023 22:25 IST

Nagpur News स्वातंत्र्य पराक्रमाने मिळविलेले आहे. यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. ही भावना येणाऱ्या पिढीमध्ये रुजविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी लोकसभा अध्यक्ष व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी केले.

नागपूर : ‘दे दी हमे आजादी बिना खडग् बिना ढाल....’ असे म्हणत आपण आपली तरुण पिढी मवाळ केली. देशाला स्वातंत्र्य केवळ अहिंसेनेच मिळालेले नाही. हे स्वातंत्र्य पराक्रमाने मिळविलेले आहे. यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. ही भावना येणाऱ्या पिढीमध्ये रुजविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी लोकसभा अध्यक्ष व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी केले.

ज्येष्ठ उद्योजक दिवंगत पुरुषोत्तम काळे यांनी त्यांच्या पत्नी दिवंगत अनसुया काळे १९६२ साली प्रकाशित केलेल्या आठवणींचा संग्रह असलेल्या मराठी पुस्तकाचा दीपाली काळे यांनी इंग्रजीत ‘अनसुया माय वाईफ- द फायर ब्रॅण्ड फ्रीडम फायटर’ या शीर्षकांतर्गत अनुवाद केला असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी पार पडला. बनयान सभागृह, चिटणवीस सेंटर येथील कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सच्या माजी अध्यक्षा शीला काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, तर व्यासपीठावर विलास काळे, कुमार काळे, जयदेव काळे, प्रवीण काळे प्रामुख्याने उपस्थित होते.

माजी खासदार दिवंगत अनसुया काळे यांनी राजकारणात वावरताना व्यक्तिमत्त्व कसे असावे, अभ्यासपूर्ण कसे बोलावे, वंचित समाजासाठी विशेषत: महिलांसाठी कसे कार्य करावे याचा वस्तुपाठ घालून दिला होता. त्यांचे हे कार्य राजकारणातील सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.

शीला काकडे यांनी ऑल इंडिया वूमेन कॉन्फरन्सच्या कार्याची माहिती देताना त्यातील अनसुया काळे यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला.

नरेश सबजीवाले यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली. विलास काळे यांनी अनसुया काळे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन प्रणोती गद्रे यांनी केले. पूर्वा काळे यांनी आभार मानले.

 स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलणे हे नागपूरचे वैशिष्ट्य

नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलतात. अनुसया काळे यासुद्धा स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलत होत्या. तेव्हा स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलणे हे नागपूरचे वैशिष्ट्य असल्याचे दिसून येते, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.

टॅग्स :literatureसाहित्य