शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

सर्वोच्च निकालानंतर ठाकरे-शिंदे गटातील संघर्ष तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2023 22:02 IST

Nagpur News राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च निकालाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांतील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

 

नागपूर : राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च निकालाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांतील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष किशोर कुमेरिया यांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्या व निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान दिले आहे. तर शिवसेना (शिंदे गट) चे नागपूर लोकसभा संपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांनी या निकालामुळे आता शिंदे गटाकडे इनकमिंग वाढणार असल्याचे सांगत आधी ते थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.

किशोर कुमेरिया म्हणाले, ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना ताशेरे ओढले ते पाहून सरकार हे बेकायदेशीर आहे हे सिद्ध झाले. केवळ तांत्रिक बाबींचा आधार घेत हे सरकार तरले आहे. गद्दार म्हणत होते की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. जर खरंच बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असाल तर सत्तेला लाथ मारा व सरकारच्या बाहेर पडा व निवडणुकीला सामोरे जा, अन्यथा वंदनीय बाळासाहेबांचे नाव घेऊ नका. थोडी फार नैतिकता असेल तर पदाचा राजीनामा द्या. जनतेच्या आख्याड्यात या, जनता कोणासोबत आहे हे दिसेल, असे आव्हानही कुमेरिया यांनी दिले.

यावर मंगेश काशीकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून निर्णय दिला आहे. जे झाले ते झाले. तो निर्णय बदलू शकत नाही. मुळात आता राजीनामा मागणे हेच चुकीचे आहे. सरकार पुढे चालत राहील. सरकारला धोका नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी न्यायालयीन लढा लढावा. आम्ही देखील पाठपुरावा करू. मात्र, आजवर बरेच नेते व शिवसैनिक कुंपनावर बसून विचार करीत होते, ते या निर्णयाला पाहून कुंपन ओलांडतील. शिंदे गटाकडे येणाऱ्यांचा ओढा वाढणार आहे. त्यांना कसे थांबवायचे याचा विचार आता ठाकरे गटाने करणे आवश्यक आहे, असा टोलाही काशीकर यांनी लगावला.

राष्ट्रवादी म्हणते विधानसभा अध्यक्षांनी नैतिकता दाखवावी 

- सर्वोेच्च न्यायालयाने निकाल दिला. आता विधानसभा अध्यक्षांनी नैतिकता बाळगून १६ आमदारांच्या अपात्रतेवर त्वरित निर्णय घ्यावा. नाहीतर सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे, व्यक्त केलेली नाराजी याला बगल दिल्या सारखे होईल. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर पुढे सर्व गोष्टी स्पष्ट होतील. विधानसभा अध्यक्षांनी न्याय दिला नाही तर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले जाईल. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी नैतिकता दाखवून कृती करावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी व्यक्त केली.

कृपाल तुमानेंच्या कार्यालयासमोर जल्लोष

- सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत राज्यातील शिंदे सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट केले. या निकालानंतर शिवनसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. खा. कृपाल तुमाने यांच्या कार्यालयासमोर ढोल-ताशांच्या निनादात जल्लोष करण्यात आला. यावेळी खा. कृपाल तुमाने यांच्यासह जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार, सोहेल अहमद, शुभम नवले, विनोद सातंगे, अनिता जाधव, केतन रेवतकर, बाबा लारोकर, उमेश कातुरे, अमित कातुरे, प्रदीप ठाकरे, दिवाकर पाटणे, अमोल गुजर आदी उपस्थित होते. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार स्थिरावल्याने विकास कार्याला वेग येईल अन् सामान्यांना दिलासा मिळेल. जे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन समोर जात होते, त्यांना आज अत्यानंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया खा. तुमाने यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Krupal Tumaneकृपाल तुमाने