शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

सर्वोच्च निकालानंतर ठाकरे-शिंदे गटातील संघर्ष तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2023 22:02 IST

Nagpur News राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च निकालाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांतील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

 

नागपूर : राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च निकालाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांतील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष किशोर कुमेरिया यांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्या व निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान दिले आहे. तर शिवसेना (शिंदे गट) चे नागपूर लोकसभा संपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांनी या निकालामुळे आता शिंदे गटाकडे इनकमिंग वाढणार असल्याचे सांगत आधी ते थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.

किशोर कुमेरिया म्हणाले, ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना ताशेरे ओढले ते पाहून सरकार हे बेकायदेशीर आहे हे सिद्ध झाले. केवळ तांत्रिक बाबींचा आधार घेत हे सरकार तरले आहे. गद्दार म्हणत होते की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. जर खरंच बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असाल तर सत्तेला लाथ मारा व सरकारच्या बाहेर पडा व निवडणुकीला सामोरे जा, अन्यथा वंदनीय बाळासाहेबांचे नाव घेऊ नका. थोडी फार नैतिकता असेल तर पदाचा राजीनामा द्या. जनतेच्या आख्याड्यात या, जनता कोणासोबत आहे हे दिसेल, असे आव्हानही कुमेरिया यांनी दिले.

यावर मंगेश काशीकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून निर्णय दिला आहे. जे झाले ते झाले. तो निर्णय बदलू शकत नाही. मुळात आता राजीनामा मागणे हेच चुकीचे आहे. सरकार पुढे चालत राहील. सरकारला धोका नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी न्यायालयीन लढा लढावा. आम्ही देखील पाठपुरावा करू. मात्र, आजवर बरेच नेते व शिवसैनिक कुंपनावर बसून विचार करीत होते, ते या निर्णयाला पाहून कुंपन ओलांडतील. शिंदे गटाकडे येणाऱ्यांचा ओढा वाढणार आहे. त्यांना कसे थांबवायचे याचा विचार आता ठाकरे गटाने करणे आवश्यक आहे, असा टोलाही काशीकर यांनी लगावला.

राष्ट्रवादी म्हणते विधानसभा अध्यक्षांनी नैतिकता दाखवावी 

- सर्वोेच्च न्यायालयाने निकाल दिला. आता विधानसभा अध्यक्षांनी नैतिकता बाळगून १६ आमदारांच्या अपात्रतेवर त्वरित निर्णय घ्यावा. नाहीतर सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे, व्यक्त केलेली नाराजी याला बगल दिल्या सारखे होईल. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर पुढे सर्व गोष्टी स्पष्ट होतील. विधानसभा अध्यक्षांनी न्याय दिला नाही तर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले जाईल. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी नैतिकता दाखवून कृती करावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी व्यक्त केली.

कृपाल तुमानेंच्या कार्यालयासमोर जल्लोष

- सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत राज्यातील शिंदे सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट केले. या निकालानंतर शिवनसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. खा. कृपाल तुमाने यांच्या कार्यालयासमोर ढोल-ताशांच्या निनादात जल्लोष करण्यात आला. यावेळी खा. कृपाल तुमाने यांच्यासह जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार, सोहेल अहमद, शुभम नवले, विनोद सातंगे, अनिता जाधव, केतन रेवतकर, बाबा लारोकर, उमेश कातुरे, अमित कातुरे, प्रदीप ठाकरे, दिवाकर पाटणे, अमोल गुजर आदी उपस्थित होते. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार स्थिरावल्याने विकास कार्याला वेग येईल अन् सामान्यांना दिलासा मिळेल. जे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन समोर जात होते, त्यांना आज अत्यानंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया खा. तुमाने यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Krupal Tumaneकृपाल तुमाने