शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

विदर्भात आभाळ फाटले; अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 20:20 IST

Nagpur News गेल्या चार दिवसांपासून पूर्व विदर्भात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वाधिक फटका १४ तालुक्यांना बसला आहे.

ठळक मुद्देचार जिल्ह्यात स्थिती बिकट नागपुरात मायलेकी, तर चंद्रपुरातून शेतकरी वाहून गेला

नागपूर : गेल्या चार दिवसांपासून पूर्व विदर्भात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वाधिक फटका १४ तालुक्यांना बसला आहे. तेथे अतिवृष्टीची नोंद झाली असून नागपूर जिल्ह्यातील सहा, चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तर वर्धा जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे नदी-नाले दुथडी वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

गडचिराेलीतील सिरोंचा तालुक्यात १७१.१ मिमी आणि अहेरी १२६.६ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. या दाेन तालुक्यांसह दक्षिण गडचिराेलीला सर्वाधिक फटका बसला आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक असून, सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्यात नागपूर तालुका (७२ मि. मी.), नागपूर ग्रामीण (६६.६ मि. मी.), हिंगणा (७२ मि. मी.), काटोल (७३ मि. मी.), नरखेड (६४ मि. मी.), कळमेश्वर (१०२ मि. मी.) पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ५२ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक पाऊस कळमेश्वर तालुक्यात झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासांत ५२ मि. मी. पाऊस झाला. चंद्रपूर (७८ मि. मी.), वरोरा (८० मि. मी.), भद्रावती (८८.४ मि. मी.) चिमूर (६७.९ मि. मी.) आणि बल्लारपूरमध्ये (८० मि. मी.) पावसाची नोंद झाली. वर्धा जिल्ह्यात ३९ मि. मी. पाऊस झाला. समुद्रपूर तालुक्यात (८२ मि. मी.) अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात १ जून ते ११ जुलै या दरम्यान पडलेला पाऊस ३३६.३९ मि.मी असून त्याची टक्केवारी २१२.३ अशी आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात नदी-नाले फुगले

चंद्रपूर जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आला. नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानराड ही चार जलाशये फुल्ल झाली आहेत. इरई धरणात ७१.३५ टक्के जलसाठा भरल्याने सोमवारी धरणाचे दोन दरवाजे ०.२५ सेंटिमीटरने उघडण्यात आले. संभाव्य धोका टाळण्यासाठी महानिर्मितीने इरई नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पुरामुळे कापूस, सोयाबीन, तूर, धान, भाजीपाला पिके पुराच्या पाण्याखाली आहेत. गाेंदिया जिल्ह्यात सोमवारीही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच होती तर दुपारदरम्यान पावसाचा जोर हाेता. भंडारा जिल्ह्यात सोमवारी पावसाची उघडझाप सुरू होती. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणासमोरील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, २४ तासांत अप्पर वर्धा धरण परिसरात पाऊस पडण्याची शक्यता असल्यास धरणातून पाणी सोडले जाऊ शकते.

टॅग्स :floodपूरRainपाऊस