शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

विदर्भात आभाळ फाटले; अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 20:20 IST

Nagpur News गेल्या चार दिवसांपासून पूर्व विदर्भात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वाधिक फटका १४ तालुक्यांना बसला आहे.

ठळक मुद्देचार जिल्ह्यात स्थिती बिकट नागपुरात मायलेकी, तर चंद्रपुरातून शेतकरी वाहून गेला

नागपूर : गेल्या चार दिवसांपासून पूर्व विदर्भात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वाधिक फटका १४ तालुक्यांना बसला आहे. तेथे अतिवृष्टीची नोंद झाली असून नागपूर जिल्ह्यातील सहा, चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तर वर्धा जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे नदी-नाले दुथडी वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

गडचिराेलीतील सिरोंचा तालुक्यात १७१.१ मिमी आणि अहेरी १२६.६ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. या दाेन तालुक्यांसह दक्षिण गडचिराेलीला सर्वाधिक फटका बसला आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक असून, सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्यात नागपूर तालुका (७२ मि. मी.), नागपूर ग्रामीण (६६.६ मि. मी.), हिंगणा (७२ मि. मी.), काटोल (७३ मि. मी.), नरखेड (६४ मि. मी.), कळमेश्वर (१०२ मि. मी.) पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ५२ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक पाऊस कळमेश्वर तालुक्यात झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासांत ५२ मि. मी. पाऊस झाला. चंद्रपूर (७८ मि. मी.), वरोरा (८० मि. मी.), भद्रावती (८८.४ मि. मी.) चिमूर (६७.९ मि. मी.) आणि बल्लारपूरमध्ये (८० मि. मी.) पावसाची नोंद झाली. वर्धा जिल्ह्यात ३९ मि. मी. पाऊस झाला. समुद्रपूर तालुक्यात (८२ मि. मी.) अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात १ जून ते ११ जुलै या दरम्यान पडलेला पाऊस ३३६.३९ मि.मी असून त्याची टक्केवारी २१२.३ अशी आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात नदी-नाले फुगले

चंद्रपूर जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आला. नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानराड ही चार जलाशये फुल्ल झाली आहेत. इरई धरणात ७१.३५ टक्के जलसाठा भरल्याने सोमवारी धरणाचे दोन दरवाजे ०.२५ सेंटिमीटरने उघडण्यात आले. संभाव्य धोका टाळण्यासाठी महानिर्मितीने इरई नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पुरामुळे कापूस, सोयाबीन, तूर, धान, भाजीपाला पिके पुराच्या पाण्याखाली आहेत. गाेंदिया जिल्ह्यात सोमवारीही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच होती तर दुपारदरम्यान पावसाचा जोर हाेता. भंडारा जिल्ह्यात सोमवारी पावसाची उघडझाप सुरू होती. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणासमोरील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, २४ तासांत अप्पर वर्धा धरण परिसरात पाऊस पडण्याची शक्यता असल्यास धरणातून पाणी सोडले जाऊ शकते.

टॅग्स :floodपूरRainपाऊस