शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रागाच्या भरात मुलांनी घर सोडले, आरपीएफने कुटुंबियांत पोहचवले; ८५८ कुटुंबांना दिलासा

By नरेश डोंगरे | Updated: December 22, 2023 14:19 IST

अलिकडे अल्पवयीन मुले-मुली छोट्या छोट्या कारणावरून रागात येतात. रागाच्या भरात ते स्वत:चे घर सोडून बाहेर पळून जातात.

नरेश डोंगरे          नागपूर : कुणी आमिष दाखवले म्हणून तर कुणी रागावले म्हणून स्वत:चे घर सोडले. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना हेरले आणि त्यांच्या पालकांना बोलवून सुखरूपपणे त्यांच्या स्वाधिन केले. होय, गेल्या आठ महिन्यात आरपीएफने एकूण ८५८ मुला-मुलींना परत त्यांच्या कुटुंबात पाठविले आहे.

अलिकडे अल्पवयीन मुले-मुली छोट्या छोट्या कारणावरून रागात येतात. रागाच्या भरात ते स्वत:चे घर सोडून बाहेर पळून जातात. यातील काही जण भांडणामुळे, काही स्वप्नातील दुनिया बघण्यासाठी तर काही जण कुणी आमिष दाखविल्यामुळे स्वत:चे घर सोडून पळून जातात. आपल्या गावापासून दूर मुंबई, दिल्ली सारख्या महानगरात पळून जाण्याकडे या मुलांचा कल असतो. खिशात पैसे असो नसो, ही मंडळी घरून रेल्वे स्थानकावर पळून येतात.

मोठ्या महानगराकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसून ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा मुलांवर आरपीएफची खास नजर असते. त्यांच्या हालचाली, संशयास्पद वर्तनावरून ते त्यांना ताव्यात घेतात. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत या मुलांची आरपीएफ आस्थेने विचारपूस करतात आणि ते घरून पळून आल्याचे लक्षात येताच त्यांच्या पालकांना बोलवून त्यांचे समुपदेशन करतात आणि नंतर या मुलांना पालकांच्या स्वाधिन केले जाते. यंदा महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकावर अशा प्रकारे ८५८ मुले आरपीएफने पकडली आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन केले. यात नागपूर विभागातील १११ मुला-मुलीमचा समावेश आहे.