शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भरात मुलांनी घर सोडले, आरपीएफने कुटुंबियांत पोहचवले; ८५८ कुटुंबांना दिलासा

By नरेश डोंगरे | Updated: December 22, 2023 14:19 IST

अलिकडे अल्पवयीन मुले-मुली छोट्या छोट्या कारणावरून रागात येतात. रागाच्या भरात ते स्वत:चे घर सोडून बाहेर पळून जातात.

नरेश डोंगरे          नागपूर : कुणी आमिष दाखवले म्हणून तर कुणी रागावले म्हणून स्वत:चे घर सोडले. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना हेरले आणि त्यांच्या पालकांना बोलवून सुखरूपपणे त्यांच्या स्वाधिन केले. होय, गेल्या आठ महिन्यात आरपीएफने एकूण ८५८ मुला-मुलींना परत त्यांच्या कुटुंबात पाठविले आहे.

अलिकडे अल्पवयीन मुले-मुली छोट्या छोट्या कारणावरून रागात येतात. रागाच्या भरात ते स्वत:चे घर सोडून बाहेर पळून जातात. यातील काही जण भांडणामुळे, काही स्वप्नातील दुनिया बघण्यासाठी तर काही जण कुणी आमिष दाखविल्यामुळे स्वत:चे घर सोडून पळून जातात. आपल्या गावापासून दूर मुंबई, दिल्ली सारख्या महानगरात पळून जाण्याकडे या मुलांचा कल असतो. खिशात पैसे असो नसो, ही मंडळी घरून रेल्वे स्थानकावर पळून येतात.

मोठ्या महानगराकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसून ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा मुलांवर आरपीएफची खास नजर असते. त्यांच्या हालचाली, संशयास्पद वर्तनावरून ते त्यांना ताव्यात घेतात. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत या मुलांची आरपीएफ आस्थेने विचारपूस करतात आणि ते घरून पळून आल्याचे लक्षात येताच त्यांच्या पालकांना बोलवून त्यांचे समुपदेशन करतात आणि नंतर या मुलांना पालकांच्या स्वाधिन केले जाते. यंदा महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकावर अशा प्रकारे ८५८ मुले आरपीएफने पकडली आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन केले. यात नागपूर विभागातील १११ मुला-मुलीमचा समावेश आहे.