शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हा फाॅर्म्युला आधीच ठरला होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 19:30 IST

Nagpur News अचानक आता निकालानंतर शिवसेनेने अडीच वर्षांच मुख्यमंत्रीपद कसे मागितले, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

ठळक मुद्देअडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद आणले कुठून राज ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका

नागपूर : शिवसेना व भाजपची युती झाली होती तेव्हा १९८९ साली मातोश्रीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत आपणही उपस्थित होतो. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल, असे त्याचवेळी ठरले होते. त्यानुसार १९९५ ते ९९च्या काळात चार साडेचार वर्षांत भाजपने मुख्यमंत्रीपद मागितल्याचं कधीच आम्ही पाहिलं नाही. मग अचानक आता निकालानंतर शिवसेनेने अडीच वर्षांच मुख्यमंत्रीपद कसे मागितले, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी रविवारी नागपूर शहर व जिल्हा तर सोमवारी गोंदिया, भंडारा व वर्धा जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या विधानसभानिहाय बैठका घेतल्या. यानंतर रविभवनात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे सांगितले होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का घेतला नाही? चार भिंतीत ठरलेल्या गोष्टी उद्धव यांनी आधीच का सांगितल्या नाही, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण एवढा गोंधळ कधीच पाहिला नाही. निवडणुका एकाशी मिळवू लढवता अन् पहाटे शपथविधी दुसऱ्याशीच होतो. नंतर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येते. ही तर मतदारांची प्रतारणा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अमूक गोष्ट फुकट द्या, अशा मागणीसाठी आजवर एकही मोर्चा निघालेला नाही. राजकीय पक्षच स्वार्थासाठी फ्री च्या घोषणा करतात. आपल्याला अर्थव्यवस्था बरबाद करायची आहे का, असा सवाल करीत अशा फुकट्या लोकांना थारा देऊ नका, असा चिमटाही त्यांनी घेतला.

वेदांता-फॉक्सकॉन का गेला, याची चौकशी व्हावी

- देशात कोणताही उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांची पहिली पसंती ही महाराष्ट्र असते. मात्र, वेदांता-फॉक्सकॉनच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला, कुठे फिस्कटले, यात काही पैसे मागितले होते का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

विदर्भाबाबत जनतम घ्या

- वेगळ्या विदर्भाच्या चळवळीला बळ देण्यासाठी राजनीतिकार प्रशांत किशोर हे २० रोजी नागपुरात बैठक घेत आहेत. याकडे लक्ष वेधले असता विदर्भाबाबत जनमत घ्या, कोणत्या खासगी संस्थेमार्फत नाही तर निवडणूक होते तसे घ्या. वेगळे व्हायचे की नाही हे तेथील जनतेला ठरवू द्या, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीनेच निवडणुका व्हाव्या

- तीन-चार सदस्यीय प्रभाग लोकशाहीसाठी घातक आहे. चार-चार नगरसेवक असले तर जनतेने कामांसाठी कुणाकडे जायचे. त्यातही दोन पक्षांचे दोन-दोन निवडून आले तर एकमेकांना कामे करू देत नाहीत. राजकीय पक्षाच्या हितासाठी जनतेचे नुकसान करणे सुरू आहे. त्यामुळे एक सदस्यीय वॉर्ड पद्धतच असावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. ज्याचे बहुमत असेल त्याचा सरपंच, ज्याचे नगरसेवक जास्त त्याचा महापौर, हेच योग्य आहे. या सर्व पद्धती का बदलल्या जात आहेत, निवडणूक आयोग काय करतोय, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे