शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हा फाॅर्म्युला आधीच ठरला होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 19:30 IST

Nagpur News अचानक आता निकालानंतर शिवसेनेने अडीच वर्षांच मुख्यमंत्रीपद कसे मागितले, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

ठळक मुद्देअडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद आणले कुठून राज ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका

नागपूर : शिवसेना व भाजपची युती झाली होती तेव्हा १९८९ साली मातोश्रीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत आपणही उपस्थित होतो. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल, असे त्याचवेळी ठरले होते. त्यानुसार १९९५ ते ९९च्या काळात चार साडेचार वर्षांत भाजपने मुख्यमंत्रीपद मागितल्याचं कधीच आम्ही पाहिलं नाही. मग अचानक आता निकालानंतर शिवसेनेने अडीच वर्षांच मुख्यमंत्रीपद कसे मागितले, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी रविवारी नागपूर शहर व जिल्हा तर सोमवारी गोंदिया, भंडारा व वर्धा जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या विधानसभानिहाय बैठका घेतल्या. यानंतर रविभवनात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे सांगितले होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का घेतला नाही? चार भिंतीत ठरलेल्या गोष्टी उद्धव यांनी आधीच का सांगितल्या नाही, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण एवढा गोंधळ कधीच पाहिला नाही. निवडणुका एकाशी मिळवू लढवता अन् पहाटे शपथविधी दुसऱ्याशीच होतो. नंतर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येते. ही तर मतदारांची प्रतारणा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अमूक गोष्ट फुकट द्या, अशा मागणीसाठी आजवर एकही मोर्चा निघालेला नाही. राजकीय पक्षच स्वार्थासाठी फ्री च्या घोषणा करतात. आपल्याला अर्थव्यवस्था बरबाद करायची आहे का, असा सवाल करीत अशा फुकट्या लोकांना थारा देऊ नका, असा चिमटाही त्यांनी घेतला.

वेदांता-फॉक्सकॉन का गेला, याची चौकशी व्हावी

- देशात कोणताही उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांची पहिली पसंती ही महाराष्ट्र असते. मात्र, वेदांता-फॉक्सकॉनच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला, कुठे फिस्कटले, यात काही पैसे मागितले होते का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

विदर्भाबाबत जनतम घ्या

- वेगळ्या विदर्भाच्या चळवळीला बळ देण्यासाठी राजनीतिकार प्रशांत किशोर हे २० रोजी नागपुरात बैठक घेत आहेत. याकडे लक्ष वेधले असता विदर्भाबाबत जनमत घ्या, कोणत्या खासगी संस्थेमार्फत नाही तर निवडणूक होते तसे घ्या. वेगळे व्हायचे की नाही हे तेथील जनतेला ठरवू द्या, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीनेच निवडणुका व्हाव्या

- तीन-चार सदस्यीय प्रभाग लोकशाहीसाठी घातक आहे. चार-चार नगरसेवक असले तर जनतेने कामांसाठी कुणाकडे जायचे. त्यातही दोन पक्षांचे दोन-दोन निवडून आले तर एकमेकांना कामे करू देत नाहीत. राजकीय पक्षाच्या हितासाठी जनतेचे नुकसान करणे सुरू आहे. त्यामुळे एक सदस्यीय वॉर्ड पद्धतच असावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. ज्याचे बहुमत असेल त्याचा सरपंच, ज्याचे नगरसेवक जास्त त्याचा महापौर, हेच योग्य आहे. या सर्व पद्धती का बदलल्या जात आहेत, निवडणूक आयोग काय करतोय, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे