शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

पेट्रोकेमिकल्स रिफायनरीबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 21:24 IST

Nagpur News पेट्रोकेमिकल्स रिफायनरीबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्दे राज्य फक्त जमीन, पायाभूत सुविधाच देणार

नागपूर : केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी रत्नागिरी येथे रिफायनरीसह पेट्रोकेमिकल्स काॅम्प्लेक्ससाठी अनुकूलता दर्शविली आहे. तसेच यासाठी निश्चित झालेली रत्नागिरीच्या राजापूर येथील बारसूस्थित १३०० एकर जागा उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. विदर्भात हा प्रकल्प येण्याच्या शक्यतेसाठी हा झटका असल्याचे बोलले जाते. आता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीसुद्धा चेंडू केंद्र सरकारच्या पारड्यात टाकला आहे. हा प्रकल्प कुठे होणार याचा निर्णय केंद्र सरकार व प्रवर्तक कंपन्यांनाच करायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

देसाई यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले की, राज्य सरकारला या प्रकल्पासाठी केवळ जागा व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात रिफायनरी आणण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला हा प्रकल्प कोकणातील नाणार येथे उभारण्याचा निर्णय झाला होता; परंतु ते शक्य होऊ शकले नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात प्रकल्प आणण्याची मागणी करीत पत्र लिहिले; परंतु प्रवर्तक कंपनी आणि केंद्र सरकारलाच नेमका प्रकल्प कुठे करायचा ती जागा निश्चित करायची आहे. या कामासाठी एक समिती गठित करण्यात आलेली आहे. समितीच्या मताप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भात दहा हजार कोटींची गुंतवणूक

देसाई यांनी विदर्भात १० हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असल्याचा दावा केला. ११ उद्योग प्रत्येकी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार झाले आहेत. याशिवाय यवतमाळ व एका ऑस्ट्रेलियन कंपनीसोबत वीज संयंत्रांसाठी करार झाला आहे.

समृद्धी महामार्गाजवळ विकसित होणार औद्योगिक क्षेत्र

देसाई यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाजवळ औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. जागा निश्चित करण्यासाठी एमएसआरडीसी आणि एमआयडीसीने आराखडा तयार केला आहे. कृषी आधारित उद्योगांवर भर दिला जाणार आहे.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई