शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

पेट्रोकेमिकल्स रिफायनरीबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 21:24 IST

Nagpur News पेट्रोकेमिकल्स रिफायनरीबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्दे राज्य फक्त जमीन, पायाभूत सुविधाच देणार

नागपूर : केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी रत्नागिरी येथे रिफायनरीसह पेट्रोकेमिकल्स काॅम्प्लेक्ससाठी अनुकूलता दर्शविली आहे. तसेच यासाठी निश्चित झालेली रत्नागिरीच्या राजापूर येथील बारसूस्थित १३०० एकर जागा उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. विदर्भात हा प्रकल्प येण्याच्या शक्यतेसाठी हा झटका असल्याचे बोलले जाते. आता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीसुद्धा चेंडू केंद्र सरकारच्या पारड्यात टाकला आहे. हा प्रकल्प कुठे होणार याचा निर्णय केंद्र सरकार व प्रवर्तक कंपन्यांनाच करायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

देसाई यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले की, राज्य सरकारला या प्रकल्पासाठी केवळ जागा व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात रिफायनरी आणण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला हा प्रकल्प कोकणातील नाणार येथे उभारण्याचा निर्णय झाला होता; परंतु ते शक्य होऊ शकले नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात प्रकल्प आणण्याची मागणी करीत पत्र लिहिले; परंतु प्रवर्तक कंपनी आणि केंद्र सरकारलाच नेमका प्रकल्प कुठे करायचा ती जागा निश्चित करायची आहे. या कामासाठी एक समिती गठित करण्यात आलेली आहे. समितीच्या मताप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भात दहा हजार कोटींची गुंतवणूक

देसाई यांनी विदर्भात १० हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असल्याचा दावा केला. ११ उद्योग प्रत्येकी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार झाले आहेत. याशिवाय यवतमाळ व एका ऑस्ट्रेलियन कंपनीसोबत वीज संयंत्रांसाठी करार झाला आहे.

समृद्धी महामार्गाजवळ विकसित होणार औद्योगिक क्षेत्र

देसाई यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाजवळ औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. जागा निश्चित करण्यासाठी एमएसआरडीसी आणि एमआयडीसीने आराखडा तयार केला आहे. कृषी आधारित उद्योगांवर भर दिला जाणार आहे.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई