शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोकेमिकल्स रिफायनरीबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 21:24 IST

Nagpur News पेट्रोकेमिकल्स रिफायनरीबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्दे राज्य फक्त जमीन, पायाभूत सुविधाच देणार

नागपूर : केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी रत्नागिरी येथे रिफायनरीसह पेट्रोकेमिकल्स काॅम्प्लेक्ससाठी अनुकूलता दर्शविली आहे. तसेच यासाठी निश्चित झालेली रत्नागिरीच्या राजापूर येथील बारसूस्थित १३०० एकर जागा उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. विदर्भात हा प्रकल्प येण्याच्या शक्यतेसाठी हा झटका असल्याचे बोलले जाते. आता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीसुद्धा चेंडू केंद्र सरकारच्या पारड्यात टाकला आहे. हा प्रकल्प कुठे होणार याचा निर्णय केंद्र सरकार व प्रवर्तक कंपन्यांनाच करायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

देसाई यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले की, राज्य सरकारला या प्रकल्पासाठी केवळ जागा व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात रिफायनरी आणण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला हा प्रकल्प कोकणातील नाणार येथे उभारण्याचा निर्णय झाला होता; परंतु ते शक्य होऊ शकले नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात प्रकल्प आणण्याची मागणी करीत पत्र लिहिले; परंतु प्रवर्तक कंपनी आणि केंद्र सरकारलाच नेमका प्रकल्प कुठे करायचा ती जागा निश्चित करायची आहे. या कामासाठी एक समिती गठित करण्यात आलेली आहे. समितीच्या मताप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भात दहा हजार कोटींची गुंतवणूक

देसाई यांनी विदर्भात १० हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असल्याचा दावा केला. ११ उद्योग प्रत्येकी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार झाले आहेत. याशिवाय यवतमाळ व एका ऑस्ट्रेलियन कंपनीसोबत वीज संयंत्रांसाठी करार झाला आहे.

समृद्धी महामार्गाजवळ विकसित होणार औद्योगिक क्षेत्र

देसाई यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाजवळ औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. जागा निश्चित करण्यासाठी एमएसआरडीसी आणि एमआयडीसीने आराखडा तयार केला आहे. कृषी आधारित उद्योगांवर भर दिला जाणार आहे.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई