शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात; साहित्य महामंडळाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 16:25 IST

हे संमेलन जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात येईल, असे महामंडळ अध्यक्ष उषा तांबे यांनी सांगितले.

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबे यांनी रविवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली.

विदर्भ साहित्य संघाचे शताब्दी वर्ष सुरू असल्याने ९६वे संमेलन विदर्भात व्हावे, अशी इच्छा महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने व्यक्ती केली होती. त्या संमेलनासाठी त्यांनी वर्धा हे नाव संमेलन स्थळासाठी सुचविले होते. त्याअनुषंगाने, शनिवारी महामंडळाच्या स्थळ निवड समितीने वर्धा स्थळाला भेट दिली. तेथील मैदाने, वाहनतळ, पुस्तक प्रदर्शनांचे स्थळ आणि निवास व्यवस्था यांची पाहणी केली. पाहणीनंतर ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी वर्धा हे स्थळ योग्य असल्याचा अहवाल स्थळ निवड समितीने रविवारी विदर्भ साहित्य संघात झालेल्या बैठकीत दिला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. हे संमेलन जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात येईल, असे उषा तांबे यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सचिव उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे व विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांची उपस्थिती होती. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, वर्धेचे शाखा समन्वयक प्रदीप दाते, अकोल्याचे डॉ. गजानन नारे, डॉ. विद्या देवधर, कपूर वासनिक, पुण्याचे प्रकाश होळकर, औरंगाबादचे किरण सगर यांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनliteratureसाहित्यwardha-acवर्धा