शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

थँक्यू नागपूर पोलीस ! ७२ तासांपासून अविश्रांत परिश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:09 IST

मतदान शांततेत पार पाडण्यासाठी खास व्यूहरचना करून गेल्या ७२ तासांपासून अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या पोलिसांमुळे नागपुरात कुठेही अप्रिय घटना घडली नाही. नागपूरकरांनी अत्यंत शांततेत आणि उत्साहात मतदान केले. निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त लावला होता. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातील लढतीवर देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे येथील पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण होता. परिणामी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीपासूनच बंदोबस्ताची व्यूहरचना केली होती. स्थानिक पोलीसांच्या मदतीला होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले होते.

ठळक मुद्देकोणतीही अप्रिय घटना नाही : शांततेत आणि उत्साहात मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदान शांततेत पार पाडण्यासाठी खास व्यूहरचना करून गेल्या ७२ तासांपासून अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या पोलिसांमुळे नागपुरात कुठेही अप्रिय घटना घडली नाही. नागपूरकरांनी अत्यंत शांततेत आणि उत्साहात मतदान केले.निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त लावला होता. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातील लढतीवर देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे येथील पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण होता. परिणामी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीपासूनच बंदोबस्ताची व्यूहरचना केली होती. स्थानिक पोलीसांच्या मदतीला होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले होते.या सर्वांच्या मदतीने गेल्या ७२ तासांपासून पोलीस यंत्रणा रात्रंदिवस बंदोबस्तात गुंतली होती. गुंड तसेच अवैध दारू विक्री करणारे आणि धामधूम करणारे उपद्रवी समाजकंटक यांच्यावर कारवाईचा धडाका लावला होता. शहरातील सर्व संवेदशनशील वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. संवेदनशील, अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर सशस्त्र सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. विनाकारण वाद घालून शांतता भंग करण्याची सवय जडलेल्या गुन्हेगारांंना पोलिसांनी आधीच सज्जड दम दिला होता. त्यामुळे समाजकंटकांनी शांत बसण्यातच धन्यता मानली.गुरुवारी रखरखत्या उन्हात सीपी (पोलीस आयुक्त) टू पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) असे सर्वच जण बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळताना धावपळ करताना दिसत होते. कुठे काही गडबड गोंधळ झाला तर त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शीघ्र कृती दलाचे पथक ५ ते १० मिनिटात पोहचेल, अशी बंदोबस्ताची व्यूहरचना करण्यात आली होती. त्यामुळे कुठलाही गडबड गोंधळ शहरातील कोणत्याच भागात झाला नाही.मोमीनपुरा, ताजबाग, हसनबाग, ताजनगर, टेका नाका, सतरंजीपुरा आणि ठिकठिकाणच्या मुस्लीमबहुल मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह बघायला मिळाला. रखरखत्या उन्हात या भागात जागोजागी पोलीस रस्त्यावर दिसत होते. त्यात पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्तांचाही समावेश होता. गस्तीवरील वाहनेही दर पाच मिनिटांनी इकडून तिकडून फिरताना दिसत होती.दुपारच्या वेळी उत्तर नागपुरातील एका मतदान केंद्राजवळ मतदार यादीमुळे गोंधळ झाल्याचे कळताच स्वत: पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय पोहचले. मतदान संपल्यानंतर सर्व मतदार केंद्रातील ईव्हीएम मशीन्स कळमन्यातील स्ट्राँग रूममध्ये पोहचवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची धावपळ सुरू होती. पोलिसांनी घेतलेल्या अविश्रांत परिश्रमामुळे आणि त्यांनी केलेल्या चोख बंदोबस्तामुळेच शहरात कुठेही अप्रिय घटना घडली नाही.नागपूरकरांनो धन्यवाद !  पोलीस आयुक्त डॉ. उपाध्यायनागपूरकर जनतेने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळेच शहरात अत्यंत चांगल्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. कुठेही, कसलीच अनुचित घटना घडली नाही. यासाठी नागपूरकर जनतेला आपण मनापासून धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना दिली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019