शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

थॅक्यू नागपूर! ईलेक्शन टू सिलेक्शन : कोणतीही अप्रिय घटना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:36 IST

उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाची अखेर मतमोजणी आटोपली अन् निकालही हाती आले. मतदानाच्या तारखेची घोषणा ते मतदानाचा निकाल, अशी तब्बल अडीच महिन्यांची प्रक्रिया अत्यंत उत्साहात नागपुरात पार पडली. मात्र, ७५ दिवसांच्या या प्रक्रियेत कसलीही गडबड झाली नाही. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला मात्र कुठलीही हिंसक घटना घडली नाही. शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे अभ्यासपूर्ण नियोजन केल्यानेच सर्व कसे शांततेत पार पडले.

ठळक मुद्देसर्वांचीच समंजस भूमिका : चोख बंदोबस्त, पोलिसांनी घेतले अथक परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाची अखेर मतमोजणी आटोपली अन् निकालही हाती आले. मतदानाच्या तारखेची घोषणा ते मतदानाचा निकाल, अशी तब्बल अडीच महिन्यांची प्रक्रिया अत्यंत उत्साहात नागपुरात पार पडली. मात्र, ७५ दिवसांच्या या प्रक्रियेत कसलीही गडबड झाली नाही. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला मात्र कुठलीही हिंसक घटना घडली नाही. शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे अभ्यासपूर्ण नियोजन केल्यानेच सर्व कसे शांततेत पार पडले. 

१८ मार्चपासून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. देशातील हेवीवेट नेते म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढत असल्यामुळे या लढतीवर देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे येथील पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण होता. परिणामी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मतदानाच्या एक आठवड्यापूर्वीपासूनच बंदोबस्ताची व्यूहरचना केली होती. मदतीला होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले होते. त्यांना बंदोबस्तात तैनात करून गुंड तसेच अवैध दारू विक्री करणारे आणि धामधूम करणारे उपद्रवी समाजकंटक यांच्यावर कारवाईचा धडाका लावला होता. शहरातील सर्व संवेदशनशील वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला होता. संवेदनशील, अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर सशस्त्र सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. विनाकारण वाद घालून शांतता भंग करण्याची सवय जडलेल्या गुन्हेगारांंना पोलिसांनी आधीच सज्जड दम दिला होता. अवैध धंदेवाल्यांवर विशेष छापेमारीचे सत्र राबविले. त्यामुळे गुन्हेगारांनी, उपद्रवींनी गप्प राहण्यात धन्यता मानली.नेत्यांशीही संवाद।पोलिसांनी समाजकंटकांना गप्प केले असले तरी निवडणुकीचा प्रचार टोकाला असताना एका मनोरुग्णाने सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह नारे लिहून खळबळ उडवून दिली. दुसरीकडे काही जणांनी बेताल वक्तव्य करून तर काहींनी आक्षेपार्ह्य पोस्ट करून प्रचार प्रक्रिया तापविण्याचे प्रयत्न केले.भाषणातून आक्षेपार्र्ह्य वक्तव्य करून, सोशल मिडियावरून उलटसुलट पोस्ट करून वातावरण दुषित करू पाहणा-यांसोबत तसेच त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रत्यक्ष बोलणी करून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संवाद साधला. लोकशाहीच्या उत्सवाला कसेलही गालबोट लागणार नाही, याची आपण सर्वच काळजी घेऊ, असे त्यांना आवाहन केले. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी समंजस भूमीका घेतली. त्यामुळे मतदान शांततेत पार पडले.मतमोजणीसाठी दोन दिवसांपूर्वीपासून पोलिसांनी बंदोबस्ताची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, खुपिया, वॉचर अशा सर्वांचाच बंदोबस्तासाठी नियोजनपूर्वक वापर करून घेण्यात आला. रखरखत्या उन्हात पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांच्यासह सर्वच पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांपासून तो पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत प्रत्येकांनी रात्रंदिवस बंदोबस्ताच्या निमित्ताने परिश्रम घेतले. त्यामुळे ईलेक्शन टू सिलेक्शन प्रक्रियेदरम्यान उपराजधानीत कुठलाही गडबड गोंधळ झाला नाही.नागपूरकरांनो धन्यवादनागपूरकर जनतेने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळेच शहरात अत्यंत चांगल्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली आणि तेवढ्याच शांततेत मतमोजणी पार पडली. निकालही आला. कुठे, कसलीच अनुचित घटना घडली नाही. यासाठी नागपूरकर जनतेला आपण मनापासून धन्यवाद देतो.डॉ. भूषणकुमार उपाध्यायपोलीस आयुक्त, नागपूर.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPoliceपोलिस