शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

थॅक्यू नागपूर! ईलेक्शन टू सिलेक्शन : कोणतीही अप्रिय घटना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:36 IST

उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाची अखेर मतमोजणी आटोपली अन् निकालही हाती आले. मतदानाच्या तारखेची घोषणा ते मतदानाचा निकाल, अशी तब्बल अडीच महिन्यांची प्रक्रिया अत्यंत उत्साहात नागपुरात पार पडली. मात्र, ७५ दिवसांच्या या प्रक्रियेत कसलीही गडबड झाली नाही. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला मात्र कुठलीही हिंसक घटना घडली नाही. शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे अभ्यासपूर्ण नियोजन केल्यानेच सर्व कसे शांततेत पार पडले.

ठळक मुद्देसर्वांचीच समंजस भूमिका : चोख बंदोबस्त, पोलिसांनी घेतले अथक परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाची अखेर मतमोजणी आटोपली अन् निकालही हाती आले. मतदानाच्या तारखेची घोषणा ते मतदानाचा निकाल, अशी तब्बल अडीच महिन्यांची प्रक्रिया अत्यंत उत्साहात नागपुरात पार पडली. मात्र, ७५ दिवसांच्या या प्रक्रियेत कसलीही गडबड झाली नाही. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला मात्र कुठलीही हिंसक घटना घडली नाही. शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे अभ्यासपूर्ण नियोजन केल्यानेच सर्व कसे शांततेत पार पडले. 

१८ मार्चपासून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. देशातील हेवीवेट नेते म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढत असल्यामुळे या लढतीवर देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे येथील पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण होता. परिणामी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मतदानाच्या एक आठवड्यापूर्वीपासूनच बंदोबस्ताची व्यूहरचना केली होती. मदतीला होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले होते. त्यांना बंदोबस्तात तैनात करून गुंड तसेच अवैध दारू विक्री करणारे आणि धामधूम करणारे उपद्रवी समाजकंटक यांच्यावर कारवाईचा धडाका लावला होता. शहरातील सर्व संवेदशनशील वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला होता. संवेदनशील, अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर सशस्त्र सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. विनाकारण वाद घालून शांतता भंग करण्याची सवय जडलेल्या गुन्हेगारांंना पोलिसांनी आधीच सज्जड दम दिला होता. अवैध धंदेवाल्यांवर विशेष छापेमारीचे सत्र राबविले. त्यामुळे गुन्हेगारांनी, उपद्रवींनी गप्प राहण्यात धन्यता मानली.नेत्यांशीही संवाद।पोलिसांनी समाजकंटकांना गप्प केले असले तरी निवडणुकीचा प्रचार टोकाला असताना एका मनोरुग्णाने सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह नारे लिहून खळबळ उडवून दिली. दुसरीकडे काही जणांनी बेताल वक्तव्य करून तर काहींनी आक्षेपार्ह्य पोस्ट करून प्रचार प्रक्रिया तापविण्याचे प्रयत्न केले.भाषणातून आक्षेपार्र्ह्य वक्तव्य करून, सोशल मिडियावरून उलटसुलट पोस्ट करून वातावरण दुषित करू पाहणा-यांसोबत तसेच त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रत्यक्ष बोलणी करून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संवाद साधला. लोकशाहीच्या उत्सवाला कसेलही गालबोट लागणार नाही, याची आपण सर्वच काळजी घेऊ, असे त्यांना आवाहन केले. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी समंजस भूमीका घेतली. त्यामुळे मतदान शांततेत पार पडले.मतमोजणीसाठी दोन दिवसांपूर्वीपासून पोलिसांनी बंदोबस्ताची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, खुपिया, वॉचर अशा सर्वांचाच बंदोबस्तासाठी नियोजनपूर्वक वापर करून घेण्यात आला. रखरखत्या उन्हात पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांच्यासह सर्वच पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांपासून तो पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत प्रत्येकांनी रात्रंदिवस बंदोबस्ताच्या निमित्ताने परिश्रम घेतले. त्यामुळे ईलेक्शन टू सिलेक्शन प्रक्रियेदरम्यान उपराजधानीत कुठलाही गडबड गोंधळ झाला नाही.नागपूरकरांनो धन्यवादनागपूरकर जनतेने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळेच शहरात अत्यंत चांगल्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली आणि तेवढ्याच शांततेत मतमोजणी पार पडली. निकालही आला. कुठे, कसलीच अनुचित घटना घडली नाही. यासाठी नागपूरकर जनतेला आपण मनापासून धन्यवाद देतो.डॉ. भूषणकुमार उपाध्यायपोलीस आयुक्त, नागपूर.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPoliceपोलिस