शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

थॅक्यू नागपूर! ईलेक्शन टू सिलेक्शन : कोणतीही अप्रिय घटना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:36 IST

उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाची अखेर मतमोजणी आटोपली अन् निकालही हाती आले. मतदानाच्या तारखेची घोषणा ते मतदानाचा निकाल, अशी तब्बल अडीच महिन्यांची प्रक्रिया अत्यंत उत्साहात नागपुरात पार पडली. मात्र, ७५ दिवसांच्या या प्रक्रियेत कसलीही गडबड झाली नाही. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला मात्र कुठलीही हिंसक घटना घडली नाही. शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे अभ्यासपूर्ण नियोजन केल्यानेच सर्व कसे शांततेत पार पडले.

ठळक मुद्देसर्वांचीच समंजस भूमिका : चोख बंदोबस्त, पोलिसांनी घेतले अथक परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाची अखेर मतमोजणी आटोपली अन् निकालही हाती आले. मतदानाच्या तारखेची घोषणा ते मतदानाचा निकाल, अशी तब्बल अडीच महिन्यांची प्रक्रिया अत्यंत उत्साहात नागपुरात पार पडली. मात्र, ७५ दिवसांच्या या प्रक्रियेत कसलीही गडबड झाली नाही. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला मात्र कुठलीही हिंसक घटना घडली नाही. शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे अभ्यासपूर्ण नियोजन केल्यानेच सर्व कसे शांततेत पार पडले. 

१८ मार्चपासून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. देशातील हेवीवेट नेते म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढत असल्यामुळे या लढतीवर देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे येथील पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण होता. परिणामी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मतदानाच्या एक आठवड्यापूर्वीपासूनच बंदोबस्ताची व्यूहरचना केली होती. मदतीला होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले होते. त्यांना बंदोबस्तात तैनात करून गुंड तसेच अवैध दारू विक्री करणारे आणि धामधूम करणारे उपद्रवी समाजकंटक यांच्यावर कारवाईचा धडाका लावला होता. शहरातील सर्व संवेदशनशील वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला होता. संवेदनशील, अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर सशस्त्र सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. विनाकारण वाद घालून शांतता भंग करण्याची सवय जडलेल्या गुन्हेगारांंना पोलिसांनी आधीच सज्जड दम दिला होता. अवैध धंदेवाल्यांवर विशेष छापेमारीचे सत्र राबविले. त्यामुळे गुन्हेगारांनी, उपद्रवींनी गप्प राहण्यात धन्यता मानली.नेत्यांशीही संवाद।पोलिसांनी समाजकंटकांना गप्प केले असले तरी निवडणुकीचा प्रचार टोकाला असताना एका मनोरुग्णाने सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह नारे लिहून खळबळ उडवून दिली. दुसरीकडे काही जणांनी बेताल वक्तव्य करून तर काहींनी आक्षेपार्ह्य पोस्ट करून प्रचार प्रक्रिया तापविण्याचे प्रयत्न केले.भाषणातून आक्षेपार्र्ह्य वक्तव्य करून, सोशल मिडियावरून उलटसुलट पोस्ट करून वातावरण दुषित करू पाहणा-यांसोबत तसेच त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रत्यक्ष बोलणी करून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संवाद साधला. लोकशाहीच्या उत्सवाला कसेलही गालबोट लागणार नाही, याची आपण सर्वच काळजी घेऊ, असे त्यांना आवाहन केले. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी समंजस भूमीका घेतली. त्यामुळे मतदान शांततेत पार पडले.मतमोजणीसाठी दोन दिवसांपूर्वीपासून पोलिसांनी बंदोबस्ताची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, खुपिया, वॉचर अशा सर्वांचाच बंदोबस्तासाठी नियोजनपूर्वक वापर करून घेण्यात आला. रखरखत्या उन्हात पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांच्यासह सर्वच पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांपासून तो पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत प्रत्येकांनी रात्रंदिवस बंदोबस्ताच्या निमित्ताने परिश्रम घेतले. त्यामुळे ईलेक्शन टू सिलेक्शन प्रक्रियेदरम्यान उपराजधानीत कुठलाही गडबड गोंधळ झाला नाही.नागपूरकरांनो धन्यवादनागपूरकर जनतेने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळेच शहरात अत्यंत चांगल्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली आणि तेवढ्याच शांततेत मतमोजणी पार पडली. निकालही आला. कुठे, कसलीच अनुचित घटना घडली नाही. यासाठी नागपूरकर जनतेला आपण मनापासून धन्यवाद देतो.डॉ. भूषणकुमार उपाध्यायपोलीस आयुक्त, नागपूर.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPoliceपोलिस