शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

कॅन्सरची नियमित चाचणी करा

By admin | Updated: February 5, 2015 01:09 IST

गुटखा, तंबाखू व सिगारेटच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण कॅन्सरग्रस्तांपैकी ४० टक्के रुग्णांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होतो.

अजय मेहता : म्यूर मेमोरियल सोसायटी व इंडियन कॅन्सर हॉस्पिटलतर्फे जनजागृती नागपूर : गुटखा, तंबाखू व सिगारेटच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण कॅन्सरग्रस्तांपैकी ४० टक्के रुग्णांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होतो. त्यामुळे या पदार्थांचे सेवन बंद करून दरवर्षी नियमित चाचणी करणे आवश्यक आहे; तेव्हाच कॅन्सरवर नियंत्रण मिळवता येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध आॅन्कोलॉजी तज्ज्ञ व इंडियन कॅन्सर सोसायटीचे सहसचिव डॉ. अजय मेहता यांनी केले. इंडियन कॅन्सर सोसायटी व म्यूर मेमोरियल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.मेहता म्हणाले, भारतात कॅन्सरविषयी जनजागृती नाही. इतर प्रगत देशांमध्ये सामान्य नागरिक नियमितपणे तपासणी करतात. त्यामुळे कॅन्सर असो वा इतरही आजारांची माहिती पहिल्याच स्टेजमध्ये मिळते. त्यावर नियमित औषधोपचार करून कॅन्सरसारखे आजार बरे होतात. मात्र, याबाबत भारतात अद्याप जनजागृती नसल्यामुळे येथील कॅन्सरचे प्रमाण जास्त असल्याचे डॉ. मेहता म्हणाले. इंडियन कॅन्सर सोसायटीचे सचिव डॉ. मनमोहन राठी म्हणाले, कॅन्सरग्रस्तांनी नियमित व्यायाम व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. शरीर संतुलित असल्यास कॅन्सरशी लढा देणे शक्य होते. यावेळी इंडियन कॅन्सर सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ. व्ही. एन. मानेकर, म्यूर मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक विलास शेंडे व संजीवन बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष बबिता सोनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला संजीवन बहुउद्देशीय संस्थेच्या ५० महिला व म्यूर मेमोरियल हॉस्पिटल व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सोसायटीच्यावतीने सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत जनजागृतीकरिता चित्रप्रदर्शन लावण्यात आले होते. इंडियन कॅन्सर सोसायटीचे सदस्य नरेंद्र सतिजा यांनी संचालन करून आभार मानले. (प्रतिनिधी)