शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

उपराजधानीतील सुभाषनगरात 'दाऊद', 'याकुब', 'मन्या'ची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 21:13 IST

Nagpur news उपराजधानीतील गुंडगिरीबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. याच उपराजधानीतील सुभाषनगरचे नागरिक दाऊद, याकुब व मन्याच्या दहशतीने चांगलेच हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देलोकांना बाहेर पडणे झाले कठीण घरासमोरील दुचाकींचे करताहेत नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीतील गुंडगिरीबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. याच उपराजधानीतील सुभाषनगरचे नागरिक दाऊद, याकुब व मन्याच्या दहशतीने चांगलेच हैराण झाले आहेत. ही तीन नावे कुण्या गुंडांची नसून, परिसरातील वळूंची आहेत. त्यांच्या ‘वळुगिरी’मुळे सुभाषनगर व अवतीभोवतीच्या परिसरात अघोषित संचारबंदी लागली आहे. परिसरातील लहानगे सुटी असूनही घरातच बंद आहेत. मोठ्यांनी सकाळ, संध्याकाळी फिरण्याला व मैदानावरील व्यायामाला तिलांजली दिली आहे. फुटलेल्या मालवाहतूक ऑटोरिक्षा, तुटलेले गेट, पाय तुटलेले तरुण आणि घरांचे गेट बंद करून आत दहशतीत बसलेले नागरिक असे चित्र सध्या सुभाषनगरात बघायला मिळत आहे. मोकाट सुटलेल्या या वळूंच्या गोंधळामुळे स्थानिक नागरिकांनीच त्यांना ही नावे दिली आहेत. सुभाषनगर आणि आजूबाजूच्या परिसरात या तीन वळूंनी गेल्या काही दिवसांपासून अक्षरश: धुडगूस घातला आहे. वळूंच्या लढाईमुळे परिसरात अनेकांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या लढाईत काहींच्या दुचाकीचे, तर काहींच्या घराचे नुकसान झाले. लहान मुलांना तर एकटे बाहेर निघण्याची परवानगीच नाही. दोन दिवसांपूर्वी एका भाजी विक्रेत्याचा ठेला या वळूच्या लढाईत अडकला आणि वळूंनी पाच हजारांची भाजी पायाखाली तुडवत मोठे नुकसान केले. सिलिंडरवाल्याची ऑटोरिक्षाच वळूंनी उलटविली. एवढेच नाही तर वळूच्या अफाट ताकतीमुळे मैदानाची संरक्षक भिंतीचा काही भागही कोसळला आहे. परिसरातील मैदानात रोज सकाळी, संध्याकाळी लहान मुले खेळायला यायची. अनेक जण मॉर्निंग, इव्हिनिंग वॉक करायचे. आता मैदानात जायला कोणी धजावत नाही. परिसरातील शंकर पंचेश्वर, छाया चतुरकर, प्रभुनाथ विश्वकर्मा, शीला चव्हाण यांच्या घरचे, कुटुंबाचे नुकसान झाले आहे. महापालिकेने लवकरात लवकर या वळूंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक