शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सातनवरीतील भीषण अपघातप्रकरणी राज्य सरकारला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 10:54 IST

३ ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण अपघातासंदर्भात 'लोकमत'च्या बातमीसह दाखल अर्जाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस बजावली व यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाची गंभीर दखल : 'लोकमत'च्या बातमीसह अर्ज दाखल

नागपूर : नागपूर-अमरावती रोडवरील सातनवरी येथे गेल्या ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण अपघातासंदर्भात 'लोकमत'च्या बातमीसह दाखल अर्जाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस बजावली व यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले, तसेच कोंढाळी पोलिसांना या प्रकरणाची केस डायरी सादर करण्यास सांगितले.

अर्जावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयामध्ये नागपूर-अमरावती व अमरावती-मलकापूर महामार्गाच्या दूरवस्थेची जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यामध्ये याचिकाकर्ते ॲड. अरुण पाटील यांनी हा अर्ज दाखल करून नागपूर-अमरावती महामार्गाच्या धोकादायकतेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. या दाव्याला आधार म्हणून त्यांनी 'लोकमत'मध्ये प्रकाशित बातमी अर्जाला जोडली आहे.

नागपूर-अमरावती महामार्ग अत्यंत खराब झाला आहे. कंत्राटदाराने गेल्या अनेक महिन्यांपासून महामार्गाची दुरुस्ती केली नाही. महामार्ग प्राधिकरणच्या अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, हा महामार्ग वाहनचालकांसाठी खूप त्रासदायक झाला आहे. महामार्गावरील अपघात वाढले आहेत. त्यात प्राणहानीही होत आहे. सातनवरी येथील अपघातासाठी रोडवरील खड्डेच कारणीभूत आहेत. संबंधित कार रोडवरील खड्डा चुकविताना दुभाजक तोडून लोकांच्या गराड्यात शिरली. त्यामुळे सख्ख्या बहीण-भावासह चौघांचा मृत्यू झाला. या अपघातासाठी रोड कंत्राटदार व अभियंता जबाबदार आहेत. त्यांनी रोडच्या देखभालीकडे वेळीच लक्ष दिले असते तर, हा भीषण अपघात घडला नसता, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

कंत्राटदारांकडून किती दंड वसूल केला?

नागपूर-अमरावती व अमरावती-मलकापूर या दोन्ही रोडच्या देखभाल व दुरुस्तीकडे कंत्राटदारांचे दीर्घ काळापासून दुर्लक्ष आहे. उच्च न्यायालयाने यावरून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला फटकारले, तसेच दोषी कंत्राटदारांकडून आतापर्यंत किती दंड वसूल करण्यात आला? अशी विचारणा केली व यावर पुढील तारखेपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा -

धक्कादायक! अनियंत्रित कारने चर जणांना चिरडले; मृतांमध्ये सख्या भाऊ-बहिणीचा समावेश

टॅग्स :AccidentअपघातCourtन्यायालय