शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतात दहावी झालेले एमबीबीएसच्या प्रवेशातून बाद; शेकडाे पात्र विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 20:13 IST

Nagpur News २०१७ नंतर परप्रांतातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएससह वैद्यकीय शाखेतील अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार नाही, या निर्णयाचा शेकडाे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.

नागपूर : २०१७ नंतर परप्रांतातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएससह वैद्यकीय शाखेतील अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार नाही, या निर्णयाचा शेकडाे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागणार असून त्यांचे शैक्षणिक भविष्य अंधकारमय हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजानंद कावळे यांनी राज्याचे वैद्यकीय व उच्च शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पत्र पाठवून फडणवीस सरकारच्या निर्णयात सुधारणा करून ‘नीट’ प्रवेशातील ही अट तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. या निर्णयामुळे एमबीबीएससह नर्सिंग प्रवेशाच्या ८५ टक्के कोट्याअंतर्गत विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असला तरी दहावी २०१७ नंतर परप्रांतात झाल्यास त्याला प्रवेश नाकारण्यात येत आहे़ विशेष म्हणजे, शेजारील कुठल्याही राज्यात अशाप्रकारची अट नाही़ मग, राज्यासाठी इतका गुंतागुंतीचा नियम का, असा सवालही पालकवर्गात आहे़ याउलट, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुलांना पूर्णत: सूट देण्यात आली आहे. गुणवत्ता व पात्रता असतानाही तत्कालीन सरकारच्या एका अटीमुळे शेकडो विद्यार्थी डॉक्टर होण्यापासून वंचित हाेतील. २०१७ नंतर दहावी परप्रांतात व १२ वी आणि पुढील शिक्षण महाराष्ट्रात झाल्यास एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस आदी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नसल्याची अट आहे. विद्यार्थ्यांना ‘नीट’साठी ऑनलाइन अर्ज भरताना या कॉलममध्ये क्लिक केल्यास हा अर्जच पुढे सरकत नाही. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचे पालकांचे म्हणणे आहे़ महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असताना काहींचे शिक्षण अडचणीमुळे परप्रांतात तर काही पालक खासगी नोकरीत असल्याने कुटुंबासह तिथे स्थायिक व्हावे लागते़ त्यामुळे शिक्षणही तिथेच होते़ त्यानंतर परत अशी कुटुंबे महाराष्ट्रात येतात़ मात्र, वैद्यकीय शिक्षण त्यांच्या पाल्यांना घ्यायचे झाल्यास या जाचक अटीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सरकारने ही अट ‘नीट’ अर्जातून काढून टाकावी, अशी मागणी पालकांची आहे.

‘नीट’ परीक्षेचे राउंड लवकरच सुरू होतील़ अशावेळी पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून राज्याचे वैद्यकीय व उच्च शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी लक्ष घालावे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही सविस्तर निवेदन ऑनलाइन पाठविले आहे. येत्या आठवड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा धोरणात्मक निर्णय घ्यावा.

- राजानंद कावळे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्र