शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

अकरावीच्या विद्यार्थ्यांना ‘अ‍ॅडमिशन’चे ‘टेन्शन’;  मराठा आरक्षणामुळे थांबली प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 15:26 IST

सप्टेंबर उजाडला तरी प्रवेशच नाहीत तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार? अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.

ठळक मुद्देपहिल्या फेरीत फक्त १३,४५४ प्रवेश 

मंगेश व्यवहारेनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच उशीरा सुरू झालेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आली आहे. सप्टेंबर उजाडला तरी प्रवेशच नाहीत तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार? अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे शिक्षण संचालनालयाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविली आहे. त्यापूर्वी अकरावीची पहिली फेरी आटोपली होती. त्यात शहरात १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्षांनी कळविले होते की शासन स्तरावरून आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्यानंतरच आॅनलाईन प्रवेशाची पुढील कार्यवाही जाहीर करण्यात येईल. त्यामुळे अकरावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.अजूनही ४५,७१६ जागा रिक्तशहरात अकरावीच्या ५९,१७० जागा आहेत. ४०,९९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ३४,८७८ विद्यार्थ्यांनी भाग-१ भरला होता. २९,१५९ विद्यार्थ्यांनी आॅप्शन फॉर्म भरला होता. प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानुसार अजूनही ४५,७१६ जागा रिक्त आहेत.- ग्रामीणमध्ये शिक्षण सुरू, शहरात शिक्षण थांबलेशहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येत आहे. तर ग्रामीण भागात मुख्याध्यापक स्तरावर प्रक्रिया असल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे. ग्रामीण भागातील काही महाविद्यालयांमध्ये अकरावीचे आॅनलाईन शिक्षणही सुरू झाले आहे. पण शहरात प्रवेशच निश्चित झाले नसल्याने आॅनलाईन शिक्षणाला संधीच नाही. त्यामुळे अकरावीच्या शहरातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे जास्त नुकसान आहे. कारण जेईई आणि नीटच्या परीक्षेमध्ये अकरावीच्या अभ्यासक्रमाचा समावेश असतो.वर्ग सुरू व्हायला डिसेंबर उजाडेलसप्टेंबरचा अर्धा महिना लोटला आहे. आता पहिली फेरी संपली. मराठा आरक्षणामुळे दुसऱ्या फेरीला स्थगिती दिली आहे. निर्णय झाल्यानंतर दुसरी फेरी होणार आहे. त्यानंतरही तिसरी आणि चौथी फेरी शिल्लक आहे. त्यामुळे किमान नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रवेशाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. कॉलेज सुरू व्हायला डिसेंबर उजाडणार आहे. प्रवेश प्रक्रियेत अर्धे सत्र संपणार आहे. पण शिक्षण कसे देण्यात येईल, याबाबत कुठलेही दिशानिर्देश नाहीत.-डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र