शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या विद्यार्थ्यांना ‘अ‍ॅडमिशन’चे ‘टेन्शन’;  मराठा आरक्षणामुळे थांबली प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 15:26 IST

सप्टेंबर उजाडला तरी प्रवेशच नाहीत तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार? अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.

ठळक मुद्देपहिल्या फेरीत फक्त १३,४५४ प्रवेश 

मंगेश व्यवहारेनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच उशीरा सुरू झालेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आली आहे. सप्टेंबर उजाडला तरी प्रवेशच नाहीत तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार? अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे शिक्षण संचालनालयाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविली आहे. त्यापूर्वी अकरावीची पहिली फेरी आटोपली होती. त्यात शहरात १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्षांनी कळविले होते की शासन स्तरावरून आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्यानंतरच आॅनलाईन प्रवेशाची पुढील कार्यवाही जाहीर करण्यात येईल. त्यामुळे अकरावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.अजूनही ४५,७१६ जागा रिक्तशहरात अकरावीच्या ५९,१७० जागा आहेत. ४०,९९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ३४,८७८ विद्यार्थ्यांनी भाग-१ भरला होता. २९,१५९ विद्यार्थ्यांनी आॅप्शन फॉर्म भरला होता. प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानुसार अजूनही ४५,७१६ जागा रिक्त आहेत.- ग्रामीणमध्ये शिक्षण सुरू, शहरात शिक्षण थांबलेशहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येत आहे. तर ग्रामीण भागात मुख्याध्यापक स्तरावर प्रक्रिया असल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे. ग्रामीण भागातील काही महाविद्यालयांमध्ये अकरावीचे आॅनलाईन शिक्षणही सुरू झाले आहे. पण शहरात प्रवेशच निश्चित झाले नसल्याने आॅनलाईन शिक्षणाला संधीच नाही. त्यामुळे अकरावीच्या शहरातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे जास्त नुकसान आहे. कारण जेईई आणि नीटच्या परीक्षेमध्ये अकरावीच्या अभ्यासक्रमाचा समावेश असतो.वर्ग सुरू व्हायला डिसेंबर उजाडेलसप्टेंबरचा अर्धा महिना लोटला आहे. आता पहिली फेरी संपली. मराठा आरक्षणामुळे दुसऱ्या फेरीला स्थगिती दिली आहे. निर्णय झाल्यानंतर दुसरी फेरी होणार आहे. त्यानंतरही तिसरी आणि चौथी फेरी शिल्लक आहे. त्यामुळे किमान नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रवेशाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. कॉलेज सुरू व्हायला डिसेंबर उजाडणार आहे. प्रवेश प्रक्रियेत अर्धे सत्र संपणार आहे. पण शिक्षण कसे देण्यात येईल, याबाबत कुठलेही दिशानिर्देश नाहीत.-डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र