शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

अकरावीच्या विद्यार्थ्यांना ‘अ‍ॅडमिशन’चे ‘टेन्शन’;  मराठा आरक्षणामुळे थांबली प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 15:26 IST

सप्टेंबर उजाडला तरी प्रवेशच नाहीत तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार? अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.

ठळक मुद्देपहिल्या फेरीत फक्त १३,४५४ प्रवेश 

मंगेश व्यवहारेनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच उशीरा सुरू झालेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आली आहे. सप्टेंबर उजाडला तरी प्रवेशच नाहीत तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार? अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे शिक्षण संचालनालयाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविली आहे. त्यापूर्वी अकरावीची पहिली फेरी आटोपली होती. त्यात शहरात १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्षांनी कळविले होते की शासन स्तरावरून आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्यानंतरच आॅनलाईन प्रवेशाची पुढील कार्यवाही जाहीर करण्यात येईल. त्यामुळे अकरावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.अजूनही ४५,७१६ जागा रिक्तशहरात अकरावीच्या ५९,१७० जागा आहेत. ४०,९९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ३४,८७८ विद्यार्थ्यांनी भाग-१ भरला होता. २९,१५९ विद्यार्थ्यांनी आॅप्शन फॉर्म भरला होता. प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानुसार अजूनही ४५,७१६ जागा रिक्त आहेत.- ग्रामीणमध्ये शिक्षण सुरू, शहरात शिक्षण थांबलेशहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येत आहे. तर ग्रामीण भागात मुख्याध्यापक स्तरावर प्रक्रिया असल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे. ग्रामीण भागातील काही महाविद्यालयांमध्ये अकरावीचे आॅनलाईन शिक्षणही सुरू झाले आहे. पण शहरात प्रवेशच निश्चित झाले नसल्याने आॅनलाईन शिक्षणाला संधीच नाही. त्यामुळे अकरावीच्या शहरातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे जास्त नुकसान आहे. कारण जेईई आणि नीटच्या परीक्षेमध्ये अकरावीच्या अभ्यासक्रमाचा समावेश असतो.वर्ग सुरू व्हायला डिसेंबर उजाडेलसप्टेंबरचा अर्धा महिना लोटला आहे. आता पहिली फेरी संपली. मराठा आरक्षणामुळे दुसऱ्या फेरीला स्थगिती दिली आहे. निर्णय झाल्यानंतर दुसरी फेरी होणार आहे. त्यानंतरही तिसरी आणि चौथी फेरी शिल्लक आहे. त्यामुळे किमान नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रवेशाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. कॉलेज सुरू व्हायला डिसेंबर उजाडणार आहे. प्रवेश प्रक्रियेत अर्धे सत्र संपणार आहे. पण शिक्षण कसे देण्यात येईल, याबाबत कुठलेही दिशानिर्देश नाहीत.-डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र