शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

तेंदूपत्ता तोडाईला जाताय, एकत्रित जा! वनविभागाने जारी केल्या सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 23:53 IST

तेंदूपत्ता तोडाईचा आणि मोहफूल वेचण्याच्या हंगामात वन्यजीव संघर्ष हा नेहमीचाच असतो. जंगलावर उपजीविका असणाऱ्या गावांसाठी हे हंगाम महत्त्वाचे असतात. या दिवसातील हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

ठळक मुद्देवन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तेंदूपत्ता तोडाईचा आणि मोहफूल वेचण्याच्या हंगामात वन्यजीव संघर्ष हा नेहमीचाच असतो. जंगलावर उपजीविका असणाऱ्या गावांसाठी हे हंगाम महत्त्वाचे असतात. या दिवसातील हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. तेंदूपत्ता तोडाईला जाताना मिळून जा, अशी दवंडी गावात देऊन गावकऱ्यांना जागृत केले जात आहे.नागपूर वन विभागांतर्गत एकूण १४ वनपरिक्षेत्र येतात. हे वनक्षेत्र सुमारे १ लाख ४६ हजार हेक्टरचे आहे. या वनक्षेत्राची सीमा पेंच व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, बोर अभयारण्य, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. त्यामुळे सेमिनरी हिल्स, नागपूर वनपरिक्षेत्र वगळता इतर १३ वनपरिक्षेत्र वन्यजीवांचे कॉरिडोर आहेत.नागपूर जिल्ह्यातील ५५० गावे ही वनालगत आहेत. त्यामुळे या गावकºयांची उपजीविका वनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात वनक्षेत्रात मोहफुले किंवा तेंदूपत्ता संकलनासाठी जातात. वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावकऱ्यांना सकाळी लवकर जंगलामध्ये न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी जंगलामध्ये जाताना कमीतकमी १० व्यक्तींनी एकत्र जावे. तेंदूपाने तोडताना तसेच मोहफुले वेचताना बराच वेळ वाकून राहू नये. दोन-तीन व्यक्तींनी एकत्र येऊन काम करावे, एकमेकांशी सारखे बोलत राहावे. काम करताना वाकल्यास वन्यप्राण्यांना तो प्राणी वाटतो व ते हल्ला करू शकतात, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात येत आहेत. वनात डोक्यामागे मुखवटा घालून चालावे, खांद्यावर जमिनीस समांतर काठी घेऊन चालावे, असे उपाय सुचविण्यात येत आहेत.जागरूकतेसाठी उपाययोजनावन परिक्षेत्रस्तरावर गावकऱ्यांना जागरूक केले जात आहे. यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीची मदत घेतली जात असून कोरोनासंदर्भात शासनाकडून जारी सूचनांचे उल्लंघन न करता ग्रामस्थांना याबाबत सतर्क केले जात आहे. संपर्क टाळण्याकरिता क्षेत्रीय कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून या सूचना गावात पोहचविल्या जात आहेत.गावकऱ्यांच्या डोअर-टु-डोअर कॅम्पेनिंगद्वारे २५ हजार कुटुंबांना मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत सांगण्यात आले आहे. जंगलालगतच्या गावकऱ्यांच्या जागृतीसाठी ग्रामपंचायती आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सहकार्य घेतले जात आहे.- डॉ. प्रभुनाथ शुक्ल, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव