शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

पोहण्याचा मोह व नदीतला खोल खड्डा जीवावर बेतला; संगीत शिक्षकासह तिघांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 21:19 IST

Nagpur News सुटी असल्याने पिकनिकला आलेले स्वामीनारायण विद्यालय, वर्धमाननगर, नागपूर येथील कर्मचारी व विद्यार्थी पाेहण्यासाठी वळणा (ता. माैदा) येथील कन्हान नदीच्या पात्रात उतरले. पाेहताना खाेल पाण्यात गेल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देतिघेही नागपूर शहरातील स्वामीनारायण विद्यालयाचे कर्मचारीएकाचा मृतदेह गवसला

नागपूर : सुटी असल्याने पिकनिकला आलेले स्वामीनारायण विद्यालय, वर्धमाननगर, नागपूर येथील कर्मचारी व विद्यार्थी पाेहण्यासाठी वळणा (ता. माैदा) येथील कन्हान नदीच्या पात्रात उतरले. पाेहताना खाेल पाण्यात गेल्याने तिघे बुडाले तर आठ जण बाहेर आले. बुडालेल्यांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. ही घटना शनिवारी (दि. २७) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

बुडालेल्यांमध्ये प्रशांत राजाभाई पटेल (२३, रा. तितलागड ओडिशा), अभिषेक जितेंद्रभाई चव्हाण (२१, रा. गौजुल, गुजरात) व हरिकृष्ण वालजीभाई लिंबाचिया (२८, रा. अहमदाबाद, गुजरात) या तिघांचा समावेश असून, यातील प्रशांत पटेल यांचा मृतदेह शाेधण्यात नागरिकांना यश आले. अभिषेक चव्हाण हे संगीत शिक्षक तर प्रशांत पटेल व हरिकृष्ण लिंबाचिया हे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून स्वामीनारायण मंदिर ट्रस्टच्या वर्धमाननगर, नागपूर येथील स्वामीनारायण विद्यालयात नाेकरी करायचे.

ते ट्रस्टच्या वाठाेडा, नागपूर येथील क्वाॅर्टरमध्ये राहायचे. शनिवारी सुटी असल्याने या तिघांसह एकूण ११ जण वळणा, ता. माैदा येथील स्वामीनारायण गाेरक्षण येथे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पिकनिकसाठी आले हाेते. यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा समावेश हाेता. या गाेरक्षणलगत कन्हान नदी वाहते. त्यामुळे सर्व जण नदीच्या पात्रात फिरायला गेले हाेते. पाेहताना यातील तिघे नदीत बुडाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान, ठाणेदार हेमंत खराबे यांच्यासह पाेलिसांनी दाेन बाेटींसह घटनास्थळ गाठले. अंधारामुळे शाेधकार्य थांबविण्यात आले हाेते.

सर्व जण सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पाेहण्यासाठी पात्रात उतरले. प्रवाह संथ व पाणी उथळ असल्याने सर्व जण आत जायला लागले. यातील कुणालाही पाेहता येत नव्हते. पात्रात समाेर खाेल खड्डा असल्याची जाणीव कुणालाही नव्हता. त्यातच प्रशांत, अभिषेक व हरिकृष्ण त्या खाेल खड्ड्यात शिरले व गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे उर्वरित आठ जण लगेच बाहेर आले व आरडाओरड करू लागले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यातच सर्वांनी तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. काही वेळात प्रशांतचा मृतदेह वर आल्याने ताे नागरिकांनी बाहेर काढला.

अंधारामुळे शाेधकार्य थांबविण्यात आले. दाेघांचा शाेध घेण्यासाठी उद्या (रविवार, दि. २८) ‘एनडीआरएफ’च्या जवानांची मदत घेतली जाईल. शाेधकार्याला सकाळपासून सुरुवात केली जाईल.- हेमंत खराबे, ठाणेदार,

पाेलीस ठाणे, माैदा.

टॅग्स :Deathमृत्यू