शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लोडशेडिंगपासून तात्पुरता दिलासा; एनटीपीसी मदतीला, ४७१० मेगावॉट वीज उपलब्ध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 08:45 IST

Nagpur News केंद्र सरकारची एनटीपीसी मदतीला आली असून महाराष्ट्राला ४७१० मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून वीज कपात झालेली नाही.

कमल शर्मा

नागपूर : दहा वर्षांनंतर राज्यात पुन्हा एकदा लाेडशेडिंगचे संकट निर्माण झाले आहे. परंतु सध्या तात्पुरता दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारची एनटीपीसी मदतीला आली असून महाराष्ट्राला ४७१० मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून वीज कपात झालेली नाही. दरम्यान मागील पाच दिवसांपासून राज्यात कुठेही भारनियमन झाले नसून अखंडित वीज पुरवठा सुरू असल्याचा दावा महावितरणने केला आहे. या दोन्ही गोष्टी विचारात घेता नागरिकांना सध्यातरी लोडशेडिंग पासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात वीज संकट निर्माण झाले आहे. राज्य सरकारने यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्राकडून पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने वीज केंद्रातील साठा काही दिवसांपुरताच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे वीज केंद्र पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. १०,२१२ मेगावॉट क्षमतेच्या केंद्रातून केवळ ६,५२६ मेगावॉट विजेचे उत्पादन होत आहे. दुसरीकडे सोलापूर येथील बंद युनिटला सुरू करून एनटीपीसीने आता महाराष्ट्राला ४७१० मेगावॉट वीज द्यायला सुरुवात केली आहे. महावितरण सूत्रांचे म्हणणे आहे की, एक-दोन दिवसात एनटीपीसीचे आणखी एक युनिट सुरू होऊन ५०० मेगावॉट अधिकची वीज मिळू लागेल.

महावितरणच्या लोड व्यवस्थापनाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, एनटीपीसीकडून मिळत असलेल्या अतिरिक्त विजेमुळे कोयनासह इतर हायड्रो प्रकल्पातून सध्या केवळ २९१ मेगावॉट विजेचे उत्पादन केले जात आहे. या प्रकल्पातील पाणी संकटाच्या काळासाठी वाचवून ठेवले जात आहे. त्यांनी सांगितले की, मागणी २७ हजार मेगावॉट वरून २३,१५० मेगावॉट वर आली असल्यानेही कंपनीला थोडा दिलासा मिळाला आहे.

- संकट कायम आहे

महावितरणसाठी अजूनही सकाळी व सायंकाळी ५ ते ८ वाजेची वेळ संकटाची ठरत आहे. कंपनीच्या सूत्रांनुसार या काळात सौर ऊर्जाचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे या काळात विजेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. मागणी वाढल्यावर जी-ग्रुप क्षेत्रात पुन्हा लोडशेडिंग करावी लागू शकते.

 

 

टॅग्स :electricityवीज