शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

लोडशेडिंगपासून तात्पुरता दिलासा; एनटीपीसी मदतीला, ४७१० मेगावॉट वीज उपलब्ध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 08:45 IST

Nagpur News केंद्र सरकारची एनटीपीसी मदतीला आली असून महाराष्ट्राला ४७१० मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून वीज कपात झालेली नाही.

कमल शर्मा

नागपूर : दहा वर्षांनंतर राज्यात पुन्हा एकदा लाेडशेडिंगचे संकट निर्माण झाले आहे. परंतु सध्या तात्पुरता दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारची एनटीपीसी मदतीला आली असून महाराष्ट्राला ४७१० मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून वीज कपात झालेली नाही. दरम्यान मागील पाच दिवसांपासून राज्यात कुठेही भारनियमन झाले नसून अखंडित वीज पुरवठा सुरू असल्याचा दावा महावितरणने केला आहे. या दोन्ही गोष्टी विचारात घेता नागरिकांना सध्यातरी लोडशेडिंग पासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात वीज संकट निर्माण झाले आहे. राज्य सरकारने यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्राकडून पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने वीज केंद्रातील साठा काही दिवसांपुरताच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे वीज केंद्र पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. १०,२१२ मेगावॉट क्षमतेच्या केंद्रातून केवळ ६,५२६ मेगावॉट विजेचे उत्पादन होत आहे. दुसरीकडे सोलापूर येथील बंद युनिटला सुरू करून एनटीपीसीने आता महाराष्ट्राला ४७१० मेगावॉट वीज द्यायला सुरुवात केली आहे. महावितरण सूत्रांचे म्हणणे आहे की, एक-दोन दिवसात एनटीपीसीचे आणखी एक युनिट सुरू होऊन ५०० मेगावॉट अधिकची वीज मिळू लागेल.

महावितरणच्या लोड व्यवस्थापनाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, एनटीपीसीकडून मिळत असलेल्या अतिरिक्त विजेमुळे कोयनासह इतर हायड्रो प्रकल्पातून सध्या केवळ २९१ मेगावॉट विजेचे उत्पादन केले जात आहे. या प्रकल्पातील पाणी संकटाच्या काळासाठी वाचवून ठेवले जात आहे. त्यांनी सांगितले की, मागणी २७ हजार मेगावॉट वरून २३,१५० मेगावॉट वर आली असल्यानेही कंपनीला थोडा दिलासा मिळाला आहे.

- संकट कायम आहे

महावितरणसाठी अजूनही सकाळी व सायंकाळी ५ ते ८ वाजेची वेळ संकटाची ठरत आहे. कंपनीच्या सूत्रांनुसार या काळात सौर ऊर्जाचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे या काळात विजेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. मागणी वाढल्यावर जी-ग्रुप क्षेत्रात पुन्हा लोडशेडिंग करावी लागू शकते.

 

 

टॅग्स :electricityवीज