शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

तापमान खालावले, पुढचे तीन दिवस तुरळक पावसाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST

नागपूर : २४ तासांपूर्वी नागपूरसह अन्य जिल्ह्यांत पडलेल्या पावसामुळे तापमान खालावले आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवस सर्वच ...

नागपूर : २४ तासांपूर्वी नागपूरसह अन्य जिल्ह्यांत पडलेल्या पावसामुळे तापमान खालावले आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवस सर्वच जिल्ह्यांत तुरळक पावसाचा इशारा दिला असून, तापमानाचा पारा संथगतीने वाढतीवर राहील, असे सांगितले जात आहे.

१२ मार्चनंतर या आठवड्यातील पुढचे चार दिवस तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या पावसामुळे शनिवारी दिवसभराचे तापमान खालावले. नागपुरातील किमान तापमानात ३.५ अंश सेल्सिअसने घट होऊन ३३.७ अंश सेल्सिअस अशी नोंद घेण्यात आली. यासोबतच वर्धा, गोंदियामधील तापमानातही घट झाली. वर्धा आणि बुलडाण्यातील तापमान ३४.४ अंश नोंदविण्यात आले. गोंदियात ३६ अंश, तर अकोल्यात ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावतीमध्ये ३३.८, तर वाशिममध्ये ३७ अंश तापमान नोंदविले गेले. चंद्रपुरातील तापमान शनिवारी विदर्भात सर्वाधिक म्हणजे ३९.४ अंश सेल्सिअस होते.

...

नागपुरात वादळ आणि पाऊस

नागपुरात शुक्रवारी रात्री वादळ आणि पावसाचा फटका बसला. विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. रात्री अनेक भागांमध्ये वीजप्रवाह खंडित होता. चॉक्स कॉलनीत वीज प्रवाहामुळे तीन कुत्रांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

...

नागपुरात सर्वाधिक पाऊस

मागील २४ तासांमध्ये नागपूरसह वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यात पाऊस झाला. अन्य भागांतही सायंकाळनंतर वातावरण बदलले होते. वादळाचाही अनुभव रात्री आला. पावसाची हजेरी तीन जिल्ह्यांतच लागली. नागपुरात ३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल वर्धामध्ये २.४, तर गोंदियामध्ये ०.६ मिलिमीटर पाऊस पडला.

...