शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

थेट सांगा ना, मराठी विद्यापीठ आम्हाला नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 21:52 IST

Nagpur News Marathi महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने ‘तुम्हाला मराठी विद्यापीठ नको आहे का’ असा सवाल शासनाला विचारला आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीमाहिती अधिकाराअंतर्गत शासन पडले उघडेप्रत्येकवेळी पारंपारिक विद्यापीठे निकामी होण्याची व्यक्त केली भिती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मराठी विद्यापीठ स्थापन झाले तर पारंपारिक विद्यापीठांना कोणतेच काम उरणार नाही, ते पांढरा हत्ती बनून राहतील, अशी कारणे रेटून मराठी विद्यापीठ स्थापनेबाबत कायम रोडा अडविण्याचे काम शासनामार्फत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकाराअंतर्गत मागवण्यात आलेल्या दस्तऐवजांवरून हेच स्पष्ट होत आहे. याबाबत महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने ‘तुम्हाला मराठी विद्यापीठ नको आहे का’ असा सवाल शासनाला विचारला आहे.

महाराष्ट्रात मराठी विद्यापीठाच्या स्थापनेची मागणी ८५ वर्षापासून प्रलंबित आहे. एका अर्थाने मराठी भाषिक राज्यात मराठी विद्यापीठ स्थापनेबाबत असलेली ही उदासीनता बघूनच, राज्यकर्ते मराठीच्या अधोगतीला कसे कारणीभूत आहेत हे स्पष्ट होते. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शासनाकडे विद्यापीठ स्थापनेसंदर्भातील हालचाली, शासकीय टिपण्या व दस्तऐवजांची मागणी केली होती. त्यातूनच सातत्याने शासन, शासनाचे विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मराठी भाषा विभाग यात टोलवला जाणारा मराठी विद्यापीठाच्या मागणीचा चेंडू, स्थापनेबाबत तयार करावयाची समिती, केलेली फुळचट कारणमीमांसा, पारंपारिक विद्यापीठांचे भविष्य अशी एक ना अनेक रोडे घालण्याचेच काम झाल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे डॉ. श्रीपाद जोशी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, केवळ अभिवचने देण्याशिवाय प्रत्यक्ष कृती कधीच झाली नसल्याचे व कृती होऊ नये म्हणून केवळ कारणे देण्याचेच काम महाराष्ट्र शासनाकडून झाल्याचे स्पष्ट होत आहे.

 

* कार्यवाही लांबण्याची कारणे

- १ फेब्रुवारी २०१३ रोजी स्थापनेचा ठराव.

- २५ फेब्रुवारी २०१३ रोजी भाषा सल्लागार समितीचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाला निर्देश.

- १४ जून २०१३च्या टिपणीत ते निर्देश गाळले गेले. पारंपारिक विद्यापीठ निकामी होण्याची व्यक्त केली भिती.

- २५ मार्च २०१४ रोजीच्या टिपणीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तज्ज्ञ समिती स्थापित करण्याची सूचना.

- तब्बल आठ महिने हा विषय तसा पडून राहिला हे ११ नोव्हेंबर २०१४च्या टिपणीत स्पष्ट होते.

- ३ जानेवारी २०१५ रोजी तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांनी प्रधान सचिवांना समितीसाठीची नावे कळवली.

- सहा महिन्यानंतर ११ जून २०१५ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती स्थापन्याची विनंती करा व नंतर नावे निश्चित करावी असा निर्णय घेतला.

- २७ जानेवारी २०१६ रोजी पुन्हा त्यात सुधारणा करण्याचे सुचविण्यात आले.

- ३० जानेवारी २०१६ रोजी पुन्हा नावे पाठविण्याची सूचना झाली.

- १६ जुलै २०१६ रोजी मराठी भाषा विभागाने उच्च व तंत्रशिक्षण विभागास कार्यवाहिचे स्मरण करवून दिले.

- १० जुलै २०१७ रोजी अवर मुख्य सचिवांनी बैठक व चर्चा आयोजित करण्याचे सुचवले.

- २० जुलै २०१८ रोजी बैठकीच्या आयोजनाची विनंती सादर केली.

- ८ ऑक्टोबर २०१८ रोजी समितीसाठी नव्याने नावे सुचविण्यात आली. त्यात विदर्भाबाबत उदासीनता बाळगण्यात आली.

- २४ जुलै २०१९ रोजी या संदर्भातील नस्ती पुन्हा सादर झाली.

...............

टॅग्स :marathiमराठी