शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

बृहत आराखडा म्हंजी काय रं भाऊ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:27 IST

राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ४ वर्षांनंतर बृहत् आराखडा तयार करण्याची आठवण आली आहे. यासाठी विद्यापीठाने शिक्षकांसोबतच विद्यार्थी, पालक यांच्याकडूनदेखील ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया मागविल्या आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे बृहत् आराखडा नेमका काय आहे, का तयार करण्यात येत आहे, याची कुठलीही माहिती दिलेली नाही. थेट प्रतिक्रिया व सल्ले मागण्यात आले आहेत. बृहत् आराखडा म्हणजे काय असतो याचीच अनेक विद्यार्थी पालकांना माहिती नाही. अशा स्थितीत प्रशासनाची ही भूमिका पाहता बृहत् आराखड्याबाबत विद्यापीठ किती गंभीर आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : माहितीशिवायच मागण्यात येत आहेत बृहत् आराखड्यावर प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ४ वर्षांनंतर बृहत् आराखडा तयार करण्याची आठवण आली आहे. यासाठी विद्यापीठाने शिक्षकांसोबतच विद्यार्थी, पालक यांच्याकडूनदेखील ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया मागविल्या आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे बृहत् आराखडा नेमका काय आहे, का तयार करण्यात येत आहे, याची कुठलीही माहिती दिलेली नाही. थेट प्रतिक्रिया व सल्ले मागण्यात आले आहेत. बृहत् आराखडा म्हणजे काय असतो याचीच अनेक विद्यार्थी पालकांना माहिती नाही. अशा स्थितीत प्रशासनाची ही भूमिका पाहता बृहत् आराखड्याबाबत विद्यापीठ किती गंभीर आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.बृहत् आराखडा नेमका काय असतो, त्यात कुठल्या गोष्टींचा समावेश असतो हे विद्यार्थी-पालकांना सांगण्याची तसदीदेखील विद्यापीठाने घेतलेली नाही. यंदा प्रतिक्रिया ‘आॅनलाईन’ मागविण्यात आल्या आहेत. मात्र अनेक विद्यार्थी-पालक अद्यापही इंटरनेटपासून दूर आहेत. शिवाय विद्यापीठातीलच काही शिक्षक ‘आॅफलाईन’ आहेत. असा स्थितीत ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया सर्व स्तरांतून येतील कशा हादेखील प्रश्न आहेच.केंद्रदेखील बनविले नाहीतविद्यापीठ प्रशासनाने सर्वांना ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया नोंदविण्यास सांगितले आहे. मात्र यात काही तांत्रिक अडचण आली तर त्याचे निराकरण करण्यासाठी शहर तसेच ग्रामीण क्षेत्रांतील महाविद्यालयांत केंद्र तयार करण्यात आलेले नाहीत.चार वर्षांनंतर आली आठवणविद्यापीठाने २००८ साली पहिल्यांदाच बृहत् आराखडा तयार केला होता. या आराखड्यात विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगाराची स्वप्ने दाखविण्यात आली होती. मात्र नेमक्या किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने अजूनही दिलेली नाही. बृहत् आराखड्याच्या नावाखाली डोळे मिटून नवीन महाविद्यालये व अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाच्या उच्च शिक्षणाचा स्तर खालावताना दिसून येत आहे.हा असतो बृहत् आराखडायेणाऱ्या कालावधीत विद्यापीठाचा विकास नेमका कसा व्हावा, विद्यार्थ्यांना कोणते शिक्षण देण्यात येईल, कशाप्रकारचे नवे अभ्यासक्रम सुरू होतील, कौशल्य विकासासाठी काय पावले उचलली जातील या बाबींचा बृहत् आराखड्यात समावेश असतो. सोबतच उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेचा स्तर उंचावणे, रोजगारासाठी प्रयत्न करणे, या बाबींना डोळ्यासमोर ठेवूनदेखील सर्वांच्या प्रतिक्रिया मागवून मग एक योजना तयार करण्यात येते. सर्वसमावेशक विकास असा उद्देश असलेली ही योजना दीर्घ कालावधीसाठी असते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर