शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

किशोरीतार्इंनी गाण्यात भावना ओतली

By admin | Updated: April 11, 2017 02:23 IST

संगीतातील लय आणि ताल तोलून-मापून वापरणे हे जयपूर घराण्याचे वैशिष्ट्य आहे. अभिजात कलांमध्ये भावनेत वाहून जाण्याला मनाई आहे.

महेश एलकुंचवार : स्वरार्थमणी दृकश्राव्य कार्यक्रमाचे सादरीकरणनागपूर : संगीतातील लय आणि ताल तोलून-मापून वापरणे हे जयपूर घराण्याचे वैशिष्ट्य आहे. अभिजात कलांमध्ये भावनेत वाहून जाण्याला मनाई आहे. ती कला बुद्धिप्रामाण्य असण्यावरच अनेकांचा भर असतो. मात्र किशोरीतार्इंनी जुन्या संकल्पना मोडित काढून गाण्यांमध्ये भावना आणली. भावना म्हणजे कळ काढणे किंवा रडणे नाही तर रागांचा अंत:स्वभाव समजणे होय. किशोरीतार्इंनी आयुष्यभर हा प्रयत्न केला. ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार महेश एलकुंचवार यांनी एका कार्यक्रमात हे मनोगत व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विदर्भ प्रांताच्यावतीने गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे जीवन व योगदान यावर आधारित ‘स्वरार्थमणी’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे सादरीकरण राष्ट्रभाषा संकुलच्या धनवटे सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी महेश एलकुंचवार यांनी किशोरीतार्इंविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्या मूर्तिमंत देवस्वरूप होत्या. पु. ल. देशपांडे यांनी एकदा किशोरीतार्इंना बंडखोर म्हणून संबोधले होते. तेव्हापासून महाराष्ट्रात त्यांच्याविषयी त्याच भावनेतून विचार केला गेला. किशोरीतार्इंना बंडखोर समजणे योग्य नाही. त्यांनी जयपूर घराण्याची तालीम सोडली नाही, किंबहुना संगीताची परंपरा अधिकच समृद्ध केली. त्यांच्या गाण्यांचे खोलवर जाऊन विश्लेषण करणे आवश्यक आहे, मात्र तसा श्रोता आता राहिला नाही. कलावंत कितीही अभिजात असला तरी त्याची कला समजणारे श्रोतेही तेवढेच समजदार असले पाहिजेत. आपले गाणे समजणारे किती, ही खंत किशोरीतार्इंनीच व्यक्त केली होती.त्यामुळे त्यांच्या गाण्याचे स्वरूप समजून घेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना एलकुंचवार यांनी व्यक्त केली.यावेळी डॉ. चित्रा मोडक म्हणाल्या, किशोरीतार्इंनी रियाज, चिंतन, मनन व कल्पकतेचे सातत्य राखले. त्यांच्या गाण्यात गहनता, अलौकिकता होती. त्यांनी अंतर्मुख करणारे आणि आत्मानंदासाठी गाणे सादर केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आशाताई बगे यांनी किशोरीतार्इंचे गाणे आकाराकडून निराकाराकडे नेणारे असल्याचे सांगितले. खोकर, बहादुरी तोडी, यमन, सावनी असे कितीतरी राग ऐकताना आकाश कमी पडेल अशी अवस्था होते. त्यांनी एका कलावंताची अप्रतिम आर्तता व अस्वस्थता दिली आणि सोबतच सृजनाचा आनंद आमच्या व पुढच्या पिढीला दिला. गाण जसं त्यांच्या हातात होते तसा मृत्यूही त्यांच्या हातात होता व त्यांनीच मृत्यूला स्वत:चा देह दिला, अशी भावना आशाताई यांनी व्यक्त केली.यावेळी पडद्यावर किशोरीतार्इंच्या काही मुलाखती व आठवणीतील गाणी ऐकविण्यात आली. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध गायिका साधना शिलेदार यांची होती. त्यांनी किशोरीतार्इंनी गायिलेली काही आठवणीतील सुमधूर गाणी यावेळी सादर करून श्रोत्यांना भावविभोर केले. राग रागेश्री, पंचम, बहादूर तोडीतील गाणी आलापात सादर करीत साधना शिलेदार यांनी किशोरीतार्इंच्या आठवणी जाग्या केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी तर माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)