शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
6
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
7
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
8
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
9
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
10
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
11
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
14
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
15
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
17
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
18
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
19
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
20
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग

किशोरीतार्इंनी गाण्यात भावना ओतली

By admin | Updated: April 11, 2017 02:23 IST

संगीतातील लय आणि ताल तोलून-मापून वापरणे हे जयपूर घराण्याचे वैशिष्ट्य आहे. अभिजात कलांमध्ये भावनेत वाहून जाण्याला मनाई आहे.

महेश एलकुंचवार : स्वरार्थमणी दृकश्राव्य कार्यक्रमाचे सादरीकरणनागपूर : संगीतातील लय आणि ताल तोलून-मापून वापरणे हे जयपूर घराण्याचे वैशिष्ट्य आहे. अभिजात कलांमध्ये भावनेत वाहून जाण्याला मनाई आहे. ती कला बुद्धिप्रामाण्य असण्यावरच अनेकांचा भर असतो. मात्र किशोरीतार्इंनी जुन्या संकल्पना मोडित काढून गाण्यांमध्ये भावना आणली. भावना म्हणजे कळ काढणे किंवा रडणे नाही तर रागांचा अंत:स्वभाव समजणे होय. किशोरीतार्इंनी आयुष्यभर हा प्रयत्न केला. ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार महेश एलकुंचवार यांनी एका कार्यक्रमात हे मनोगत व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विदर्भ प्रांताच्यावतीने गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे जीवन व योगदान यावर आधारित ‘स्वरार्थमणी’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे सादरीकरण राष्ट्रभाषा संकुलच्या धनवटे सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी महेश एलकुंचवार यांनी किशोरीतार्इंविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्या मूर्तिमंत देवस्वरूप होत्या. पु. ल. देशपांडे यांनी एकदा किशोरीतार्इंना बंडखोर म्हणून संबोधले होते. तेव्हापासून महाराष्ट्रात त्यांच्याविषयी त्याच भावनेतून विचार केला गेला. किशोरीतार्इंना बंडखोर समजणे योग्य नाही. त्यांनी जयपूर घराण्याची तालीम सोडली नाही, किंबहुना संगीताची परंपरा अधिकच समृद्ध केली. त्यांच्या गाण्यांचे खोलवर जाऊन विश्लेषण करणे आवश्यक आहे, मात्र तसा श्रोता आता राहिला नाही. कलावंत कितीही अभिजात असला तरी त्याची कला समजणारे श्रोतेही तेवढेच समजदार असले पाहिजेत. आपले गाणे समजणारे किती, ही खंत किशोरीतार्इंनीच व्यक्त केली होती.त्यामुळे त्यांच्या गाण्याचे स्वरूप समजून घेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना एलकुंचवार यांनी व्यक्त केली.यावेळी डॉ. चित्रा मोडक म्हणाल्या, किशोरीतार्इंनी रियाज, चिंतन, मनन व कल्पकतेचे सातत्य राखले. त्यांच्या गाण्यात गहनता, अलौकिकता होती. त्यांनी अंतर्मुख करणारे आणि आत्मानंदासाठी गाणे सादर केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आशाताई बगे यांनी किशोरीतार्इंचे गाणे आकाराकडून निराकाराकडे नेणारे असल्याचे सांगितले. खोकर, बहादुरी तोडी, यमन, सावनी असे कितीतरी राग ऐकताना आकाश कमी पडेल अशी अवस्था होते. त्यांनी एका कलावंताची अप्रतिम आर्तता व अस्वस्थता दिली आणि सोबतच सृजनाचा आनंद आमच्या व पुढच्या पिढीला दिला. गाण जसं त्यांच्या हातात होते तसा मृत्यूही त्यांच्या हातात होता व त्यांनीच मृत्यूला स्वत:चा देह दिला, अशी भावना आशाताई यांनी व्यक्त केली.यावेळी पडद्यावर किशोरीतार्इंच्या काही मुलाखती व आठवणीतील गाणी ऐकविण्यात आली. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध गायिका साधना शिलेदार यांची होती. त्यांनी किशोरीतार्इंनी गायिलेली काही आठवणीतील सुमधूर गाणी यावेळी सादर करून श्रोत्यांना भावविभोर केले. राग रागेश्री, पंचम, बहादूर तोडीतील गाणी आलापात सादर करीत साधना शिलेदार यांनी किशोरीतार्इंच्या आठवणी जाग्या केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी तर माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)