शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

तरुणाई हे शहरी नक्षलवाद्यांचे ‘टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 10:56 IST

सद्यस्थितीत शहरी नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका मानण्यात येत आहे. देशातील एकात्मदर्शनवादाची मूळ विचारधारा बदलण्यासाठी या लोकांचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी तरुणाईचे ‘ब्रेनवॉश’ करण्यावर त्यांचा भर आहे.

ठळक मुद्दे राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी महोत्सव साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीत शहरी नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका मानण्यात येत आहे. देशातील एकात्मदर्शनवादाची मूळ विचारधारा बदलण्यासाठी या लोकांचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी तरुणाईचे ‘ब्रेनवॉश’ करण्यावर त्यांचा भर आहे. या बौद्धिक लढाईचा समाजाने एकत्रित होऊन सामना करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा रविवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या.माधवनगर येथील मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेती भारोत्तोलनपटू मीराबाई चानू ही होती. शहरी नक्षलवाद हा केवळ देशासाठीच नव्हे तर आपल्या मूळ विचारधारेसाठी मोठा धोका आहे. तरुणांना चुकीच्या मार्गावर नेण्याचे कार्य ते लोक करत आहेत. या लोकांना सामान्यातून असामान्यत्व मिळविलेल्या लोकांच्या प्रेरणेतून उत्तर देता येईल. यासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी लहानपणापासूनच तसे संस्कार देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने जागरूक नागरिक झाले पाहिजे व यात महिलांची मोठी भूमिका आहे, असे शांताक्का म्हणाल्या. आपल्या देशातील मुलींमध्ये प्रचंड क्षमता आहे. स्वत:ला सिद्ध करण्याचा त्यांच्यात विश्वास आहे. मात्र त्यांना कुटुंबामधून तसे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले पाहिजे असे मत यावेळी मीराबाई चानूने व्यक्त केले.राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमीच्या सोहळ््याला नागपुरातील निरनिराळ््या शाखांमधील सेविकांची उपस्थिती होती.शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंतचा समावेश असलेल्या सेविकांच्या पथकाने योगासने, घोष, लेझिम यांची निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. त्याचबरोबर सेविकांनी दाखविलेल्या दंडाच्या प्रात्यक्षिकांनी तर उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. या कार्यक्रमाला समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे, महापौर नंदा जिचकार महानगर कार्यवाहिका करुणा साठे या उपस्थित होत्या.

मानवाधिकार संघटनांवर टीकास्त्रशहरी नक्षलवादामध्ये गुंतलेल्या प्राध्यापकांना अटक झाल्यानंतर अनेक जण त्यांच्या समर्थनार्थ समोर आले. या लोकांनी काय योग्य, अयोग्य याचा सारासार विचार करायला हवा. मानवाधिकार संघटनांना तर देशाच्या विरोधात कार्य करणाऱ्यांचा पुळका आला होता. मात्र याच संघटनांना बंगालमध्ये उर्दू शिक्षणाच्या नावाखाली बंगाली बांधवांवर होणारा अन्याय दिसत नाही का, असा प्रश्न शांताक्का यांनी उपस्थित केला.

बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्यावाआजच्या काळात प्रत्येकाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी नेहमी राष्ट्रीय दृष्टीने विचार केला व देशाला सर्वात जास्त प्राधान्य दिले. त्यांनी जो संकल्प केला, त्याच्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले, असे प्रतिपादन शांताक्का यांनी केले.

टॅग्स :Dasaraदसरा