शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दिल्ली-आग्रा येथील तरुणी सापडल्या : ‘संबंधा’ला विरोध झाल्याने पळून आल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:07 IST

‘संबंधा’ला घरच्यांचा तीव्र विरोध झाल्यामुळे दिल्लीतील दोन आणि आग्रा येथील एक अशा तीन तरुणी नागपुरात पळून आल्या. त्यांना सदर पोलिसांनी मोहननगरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देसदर पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘संबंधा’ला घरच्यांचा तीव्र विरोध झाल्यामुळे दिल्लीतील दोन आणि आग्रा येथील एक अशा तीन तरुणी नागपुरात पळून आल्या. त्यांना सदर पोलिसांनी मोहननगरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.या तिघींचे वय २०, २२ आणि २५ वर्षे आहे. त्यातील २२ आणि २५ वर्षे वयाच्या तरुणी सख्ख्या मावसबहिणी आहेत. त्यांची आणि २० वर्षीय तरुणीची काही वर्षांपूर्वी शिकत असताना ओळख झाली, नंतर २० आणि २५ वयाच्या तरुणीमध्ये घट्ट नाते निर्माण झाले. त्या दोघी एकत्र राहू लागल्या. खाणे, पिणे, उठणे, बसणे, फिरायला जाणे, असे सर्वच त्यांचे एकत्र होते. त्यांच्यातील ‘संबंधा’ची घरच्यांना कल्पना येताच घरच्यांनी २५ वर्षीय तरुणीचे लग्न लावून दिले. मात्र, ती पतीसोबत जास्त दिवस राहू शकली नाही. ती आपल्या जीवलग सखीकडे परतली. तिने पतीला आपल्या संबंधाची कल्पना दिली. त्यामुळे पतीनेही तिला जवळ करण्याचे टाळले. दरम्यान, रूम पार्टनर म्हणून राहणाऱ्या या दोघी लाईफ पार्टनरसारख्या राहत असल्याने दोघींच्याही नातेवाईकांनी त्यांना तीव्र विरोध केला. सारखे वेगळे करण्याचे प्रयत्न होत असल्याने २८ जूनला त्यांनी दिल्लीतून पळ काढला. या दोघींसोबत २२ वर्षीय तरुणीही निघाली. त्या तिघी नागपुरात पळून आल्या. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहननगरात त्यांनी एका गर्ल्स होस्टेलमध्ये आश्रय घेतला. आम्हाला येथे नोकरी करण्यासोबतच बीपीएड करायचे आहे, असे सांगून त्यांनी होस्टेलमध्ये प्रवेश मिळवला होता. दरम्यान, एकसाथ तिघी तरुणी बेपत्ता झाल्याने एकीच्या पालकाने आग्रा येथे तर दोघींच्या पालकांनी २८ जूनला दिल्लीत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांची शोधाशोध केली. तरुणींचे कॉल लोकेशन नागपुरात दिसत असल्यामुळे दिल्ली पोलिसांनी स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बेपत्ता तरुणींचा शोध लावण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.व्यक्तिस्वातंत्र्याची विचारणामंगळवारी सकाळी तरुणींचे पालक सदर पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी मोहननगरातील होस्टेल शोधून काढत तिघींना ताब्यात घेतले. त्यांना ठाण्यात आणून पालकांच्या स्वाधीन केले. यावेळी तरुणींनी पालकांसोबत पोलिसांवरही नाराजी व्यक्त केली. आम्ही सज्ञान आहोत. या देशात व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :WomenमहिलाPolice Stationपोलीस ठाणे