शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

दिल्ली-आग्रा येथील तरुणी सापडल्या : ‘संबंधा’ला विरोध झाल्याने पळून आल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:07 IST

‘संबंधा’ला घरच्यांचा तीव्र विरोध झाल्यामुळे दिल्लीतील दोन आणि आग्रा येथील एक अशा तीन तरुणी नागपुरात पळून आल्या. त्यांना सदर पोलिसांनी मोहननगरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देसदर पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘संबंधा’ला घरच्यांचा तीव्र विरोध झाल्यामुळे दिल्लीतील दोन आणि आग्रा येथील एक अशा तीन तरुणी नागपुरात पळून आल्या. त्यांना सदर पोलिसांनी मोहननगरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.या तिघींचे वय २०, २२ आणि २५ वर्षे आहे. त्यातील २२ आणि २५ वर्षे वयाच्या तरुणी सख्ख्या मावसबहिणी आहेत. त्यांची आणि २० वर्षीय तरुणीची काही वर्षांपूर्वी शिकत असताना ओळख झाली, नंतर २० आणि २५ वयाच्या तरुणीमध्ये घट्ट नाते निर्माण झाले. त्या दोघी एकत्र राहू लागल्या. खाणे, पिणे, उठणे, बसणे, फिरायला जाणे, असे सर्वच त्यांचे एकत्र होते. त्यांच्यातील ‘संबंधा’ची घरच्यांना कल्पना येताच घरच्यांनी २५ वर्षीय तरुणीचे लग्न लावून दिले. मात्र, ती पतीसोबत जास्त दिवस राहू शकली नाही. ती आपल्या जीवलग सखीकडे परतली. तिने पतीला आपल्या संबंधाची कल्पना दिली. त्यामुळे पतीनेही तिला जवळ करण्याचे टाळले. दरम्यान, रूम पार्टनर म्हणून राहणाऱ्या या दोघी लाईफ पार्टनरसारख्या राहत असल्याने दोघींच्याही नातेवाईकांनी त्यांना तीव्र विरोध केला. सारखे वेगळे करण्याचे प्रयत्न होत असल्याने २८ जूनला त्यांनी दिल्लीतून पळ काढला. या दोघींसोबत २२ वर्षीय तरुणीही निघाली. त्या तिघी नागपुरात पळून आल्या. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहननगरात त्यांनी एका गर्ल्स होस्टेलमध्ये आश्रय घेतला. आम्हाला येथे नोकरी करण्यासोबतच बीपीएड करायचे आहे, असे सांगून त्यांनी होस्टेलमध्ये प्रवेश मिळवला होता. दरम्यान, एकसाथ तिघी तरुणी बेपत्ता झाल्याने एकीच्या पालकाने आग्रा येथे तर दोघींच्या पालकांनी २८ जूनला दिल्लीत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांची शोधाशोध केली. तरुणींचे कॉल लोकेशन नागपुरात दिसत असल्यामुळे दिल्ली पोलिसांनी स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बेपत्ता तरुणींचा शोध लावण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.व्यक्तिस्वातंत्र्याची विचारणामंगळवारी सकाळी तरुणींचे पालक सदर पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी मोहननगरातील होस्टेल शोधून काढत तिघींना ताब्यात घेतले. त्यांना ठाण्यात आणून पालकांच्या स्वाधीन केले. यावेळी तरुणींनी पालकांसोबत पोलिसांवरही नाराजी व्यक्त केली. आम्ही सज्ञान आहोत. या देशात व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :WomenमहिलाPolice Stationपोलीस ठाणे