शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

केंद्राचे पथक अचानक नागपूरची पाहणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 01:14 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील शहरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. केंद्रीय पथक विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून, १० जानेवारीनंतर पथक नागपूर शहराची अचानक पाहणी करणार आहे. पाहणीसाठी पथक आपल्या मर्जीनुसार शहरातील स्थळांना भेटी देणार असल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१९ : १० तारखेनंतर पथक तपासणीसाठी येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील शहरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. केंद्रीय पथक विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून, १० जानेवारीनंतर पथक नागपूर शहराची अचानक पाहणी करणार आहे. पाहणीसाठी पथक आपल्या मर्जीनुसार शहरातील स्थळांना भेटी देणार असल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.केंद्रीय पथकाचा दौरा गुप्त स्वरूपाचा राहणार आहे. महापालिका प्रशासनाला माहिती न देता पथक अचानक शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी येणार आहे तसेच शहरातील कुठल्या स्थळाची पाहणी करावयाची, हे पथकच ठरविणार आहे. त्यामुळे पथकाच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी ४ हजार गुण निश्चित करण्यात आले होते. २०१९ मध्ये ही स्पर्धा ५ हजार गुणांची आहे. यात शहरातील नागरिकांचा अभिप्राय, सेवा पातळी, प्रत्यक्ष निरीक्षण व केंद्रीयकरण यासाठी प्रत्येकी १२५० गुण ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेबाबतचा डेटा ऑनलाईन अपलोड केला आहे. त्यानुसार पथक आपल्या मर्जीनुसार शहरातातील स्थळांची निवड करून पाहणी करणार आहे.स्वच्छ सर्वेक्षणात ४३४ शहरात नागपूर १३७ व्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी स्वच्छतेच्या बाबतीत इंदूर शहराला प्रथम क्रमांक मिळाला होता. नागपूर शहराला स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक मिळाला नव्हता. परंतु ‘इनोव्हेशन अ‍ॅन्ड बेस्ट प्रॅक्टिस’ श्रेणीतील भारतातील सर्वोत्तम शहरात प्रथम स्थान मिळाले होते. स्पर्धेची तयारी केल्यानंतरही स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरला पहिल्या १० शहरात स्थान मिळाले नव्हते. याचा विचार करता यावेळी प्रशासनाने तयारी केली आहे. परंतु केंद्रीय पथकाच्या सर्वेक्षणात नेमका कोणता अभिप्राय मिळतो, यावर क्रमांक ठरणार आहे.पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाची तयारीमहापालिका प्रशासनाने स्वच्छता सर्वेक्षणात आघाडी घेण्यासाठी शहरभर स्वागत कमानी, होर्डिंग्ज आणि गॅस बलून्स लावले आहेत. मात्र मुख्य रस्त्यांसह वस्त्यांची अस्वच्छतेची समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेली नाही. गेल्या वर्षी प्रशासनाने तयारी केल्यानंतरही स्वच्छता सर्वेक्षणात शहर माघारले होते. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या दहाही झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना दुकानदार व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यात आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच दैनंदिन कचरा उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर