शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

केंद्राचे पथक अचानक नागपूरची पाहणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 01:14 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील शहरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. केंद्रीय पथक विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून, १० जानेवारीनंतर पथक नागपूर शहराची अचानक पाहणी करणार आहे. पाहणीसाठी पथक आपल्या मर्जीनुसार शहरातील स्थळांना भेटी देणार असल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१९ : १० तारखेनंतर पथक तपासणीसाठी येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील शहरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. केंद्रीय पथक विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून, १० जानेवारीनंतर पथक नागपूर शहराची अचानक पाहणी करणार आहे. पाहणीसाठी पथक आपल्या मर्जीनुसार शहरातील स्थळांना भेटी देणार असल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.केंद्रीय पथकाचा दौरा गुप्त स्वरूपाचा राहणार आहे. महापालिका प्रशासनाला माहिती न देता पथक अचानक शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी येणार आहे तसेच शहरातील कुठल्या स्थळाची पाहणी करावयाची, हे पथकच ठरविणार आहे. त्यामुळे पथकाच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी ४ हजार गुण निश्चित करण्यात आले होते. २०१९ मध्ये ही स्पर्धा ५ हजार गुणांची आहे. यात शहरातील नागरिकांचा अभिप्राय, सेवा पातळी, प्रत्यक्ष निरीक्षण व केंद्रीयकरण यासाठी प्रत्येकी १२५० गुण ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेबाबतचा डेटा ऑनलाईन अपलोड केला आहे. त्यानुसार पथक आपल्या मर्जीनुसार शहरातातील स्थळांची निवड करून पाहणी करणार आहे.स्वच्छ सर्वेक्षणात ४३४ शहरात नागपूर १३७ व्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी स्वच्छतेच्या बाबतीत इंदूर शहराला प्रथम क्रमांक मिळाला होता. नागपूर शहराला स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक मिळाला नव्हता. परंतु ‘इनोव्हेशन अ‍ॅन्ड बेस्ट प्रॅक्टिस’ श्रेणीतील भारतातील सर्वोत्तम शहरात प्रथम स्थान मिळाले होते. स्पर्धेची तयारी केल्यानंतरही स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरला पहिल्या १० शहरात स्थान मिळाले नव्हते. याचा विचार करता यावेळी प्रशासनाने तयारी केली आहे. परंतु केंद्रीय पथकाच्या सर्वेक्षणात नेमका कोणता अभिप्राय मिळतो, यावर क्रमांक ठरणार आहे.पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाची तयारीमहापालिका प्रशासनाने स्वच्छता सर्वेक्षणात आघाडी घेण्यासाठी शहरभर स्वागत कमानी, होर्डिंग्ज आणि गॅस बलून्स लावले आहेत. मात्र मुख्य रस्त्यांसह वस्त्यांची अस्वच्छतेची समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेली नाही. गेल्या वर्षी प्रशासनाने तयारी केल्यानंतरही स्वच्छता सर्वेक्षणात शहर माघारले होते. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या दहाही झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना दुकानदार व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यात आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच दैनंदिन कचरा उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर