शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नंदनपवार ज्ञानासोबत मूल्याधिष्ठित व्यक्ती निर्माण करणारे शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:08 IST

भारतीय मूल्याधारीत जीवनपद्धती ही जगात श्रेष्ठ म्हणून मानली जाते. ही मूल्ये शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांमध्ये रुजविण्याचे काम बाबा नंदनपवार यांनी केले.

ठळक मुद्देनितीन गडकरी : बाबा नंदनपवार यांचा अमृत महोत्सवी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय मूल्याधारीत जीवनपद्धती ही जगात श्रेष्ठ म्हणून मानली जाते. ही मूल्ये शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांमध्ये रुजविण्याचे काम बाबा नंदनपवार यांनी केले. एक प्रयोगशील शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. ज्ञानासोबत ही मूल्ये रुजविण्याचे काम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी जाणले. त्यानुसार वेगवेगळ्या प्रयोगातून विद्यार्थीच नाही तर त्यांचे पालक आणि शिक्षकांनाही घडविण्याचे काम त्यांनी केले, असे मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले.डॉ. बाबा नंदनपवार यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विदर्भ गौरव प्रतिष्ठान व कै. म. ल. मानकर शैक्षणिक विकास व सेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले. साई सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमात कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी, अ‍ॅड. प्रकाश सोमलवार, डॉ. गिरीश गांधी, अशोक मानकर, सत्यनारायण नुवाल, प्रियंका ठाकूर, बंडू राऊत व नंदनपवार यांच्या पत्नी सुवर्णा नंदनपवार प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी ४५ वर्षाचा परिचय असल्याचे नमूद करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नंदनपवार संघ आणि जनसंघाचे कार्यकर्ते म्हणून काम करीत असताना त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचा आग्रह करण्यात आला, मात्र त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी नम्रपणे ती संधी नाकारल्याचे ना. गडकरी यांनी नमूद केले. नवयुग शाळेत शिकविताना नंदनपवार चौकटीबाहेरचा विचार करणारे शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पुरातन काळातील गुरुकुलाची परंपरा नव्याने रुजविण्याचे काम केले. विद्यार्थ्यांसोबत पालक व शिक्षकांना प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याने त्यांनी पालकांसोबत शिक्षकांची व मुख्याध्यापकांच्या शाळेचाही उपक्रम राबविला. संघाचे संस्कार स्वीकारलेल्या नंदनपवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सर्व स्तरातील माणसांपर्यंत चांगले शिक्षण पोहचविण्याचा प्रयत्न केल्याचे मनोगत व्यक्त केले.यावेळी वेदप्रकाश मिश्रा यांनी, पुरातन काळात असलेल्या ऋषिंच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत, मात्र बाबा नंदनपवार हे आपण पाहिलेले आधुनिक ऋषी असल्याचे मनोगत व्यक्त केले. नंदनपवार हे अहंकार व अपेक्षेच्या दु:खापासून मुक्त आहेत. देशाचे भविष्य हे शाळेच्या वर्गखोल्यात निर्माण होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर हे विधान सत्य वाटत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले.