शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

अन्यायकारक शासन निर्णयाचा शिक्षक संघटनांकडून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

नागपूर : राज्य सरकारने शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे व्यपगत करण्याचा निर्णय घेतला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या बदल्यात ...

नागपूर : राज्य सरकारने शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे व्यपगत करण्याचा निर्णय घेतला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या बदल्यात शाळांना भत्ते देणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. शासन बेरोजगारीला चालना देत आहे. त्यामुळे शाळेच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याचा संघटनांचा आरोप आहे.

राज्यातील शाळेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतिबंध लागू करण्यासंदर्भात एका कमिटीची स्थापना केली होती. या समितीचा अहवाल अद्यापही आलेला नाही. या कमिटीतील सदस्यांकडून संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिप्राय घेण्यात आले नाही. व्यवस्थापनेतील शिक्षकेतर कर्मचारी हा महत्वाचा दुवा आहे. सर्व अशैक्षणिक कामे हे शिक्षकेतर कर्मचारी वर्गच करीत असल्याने शाळा प्रशासनावर त्याचा परिणाम होणार आहे.

- शिक्षणक्षेत्रात वेठबिगारी आणणारा शासननिर्णय रद्द करावा अन्यथा फार मोठ्या प्रमाणात शिक्षक परिषदेच्यावतीने आंदोलन छेडले जाईल याची शासनाने दखल घ्यावी. अशा स्वरूपात शासनाने कर्मचाऱ्यांचे अस्तित्व संपवण्याचाच घाईघाईने निर्णय घेतला आहे.

योगेश बन, विभागीय कार्यवाह, महा. राज्य शिक्षक परिषद

- कंत्राटीपद्धतीने कर्मचारी नेमणे अन्यायकारक असून हा निर्णय रोजगाराची संधी नाकारणारा आहे. शिक्षणावर खर्च व गुंतवणूक करण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही.अनुदानित शिक्षण बंद करून शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचा प्रयत्न आहे.

प्रा.सपन नेहरोत्रा, सरचिटणीस, शिक्षक भारती संघटना

- राज्य सरकारचा हा निर्णय अनुदानित शिक्षण व्यवस्था बंद करण्याचा डाव आहे. शिपाई व प्रयोगशाळा परिचर ही खूप महत्त्वाची पदे आहेत. महागाईच्या काळात ५ हजाराच्या तुटपुंज्या भत्यावर शिपायाने घर कसे चालवावे याचे नियोजन आधी शिक्षणमंत्र्यांनी करून द्यावे.

अनिल शिवणकर,संयोजक, भाजप शिक्षक आघाडी