शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबीयांचा शोध घेताहेत शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 20:27 IST

सरकारी धोरणानुसार रेशनकार्ड व आधारकार्ड नसलेल्या गरजू व्यक्तींनादेखील अन्नधान्य द्यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी धोरणानुसार रेशनकार्ड व आधारकार्ड नसलेल्या गरजू व्यक्तींनादेखील अन्नधान्य द्यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार शिक्षकांनी शनिवारी सर्वेक्षणाचे आदेश प्रशासनाकडून घेतले आणि शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे.अ. भा. ग्राहक पंचायतने यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत हातावर पोट असणाऱ्या सर्व नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात रेशनकार्ड असलेले व नसलेल्यांचाही समावेश आहे. रेशनकार्ड नसलेल्यांना धान्य देण्यास नकार दिला जात आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने प्रत्येक गरजू व्यक्तीला ताबडतोब अन्नधान्याची किट वाटप करण्यात यावी, असे आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शिधापत्रिका नसलेल्यांचा शोध घेणे सुरू केले आहे. शनिवारपासून या सर्वेक्षणाला शहरातील दहाही महापालिका झोनमध्ये सुरूवात झाली आहे. यासंदर्भातील मेसेज शिक्षकांना सकाळी मोबाईलवर मिळाले. त्यानंतर प्रत्येक झोनमधून त्यांना ऑर्डर मिळाली. त्यानुसार शिक्षकांनी सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.त्यासाठी शिक्षकांना एक फॉरमॅट दिला आहे. त्यात रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबीयांचे नाव, त्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांचे नाव व आधार क्रमांक लिहायचा आहे. त्याच्या घरच्या परिस्थितीचे अवलोकन करायचे आहे. त्या कुटुंबाला अन्नधान्याची गरज आहे का? असा अभिप्राय शिक्षक देणार आहे. हे काम शिक्षकांना दोन दिवसात करायचे आहे.

 शिधापत्रिका नसलेल्यांची खरी माहिती पुढे येईलतसे अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशनकार्ड व आधारकार्ड नसलेल्या जिल्ह्यातील ३९,७३५ कुटुंबीयांची माहिती न्यायालयात सादर केली आहे. यात शहरात ६,६१३ कुटुंबांचा समावेश आहे. पण या सर्वेक्षणानंतर रेशनकार्ड नसलेल्यांना खरेच रेशनची गरज आहे का? ही वस्तुस्थिती पुढे येणार आहे. त्यामुळे प्रशासनाला प्रत्यक्ष गरजूंना मदत करता येणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक