शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदल्यांची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:43 IST

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आलेली शिक्षक बदलीची कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे बदल्यांच्या बाबतीत काही काळ का होईना निश्चिंत असणाऱ्या शिक्षकांमध्ये पुन्हा बदलीची धाकधूक सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे२० मेपर्यंत बदलीपात्र शिक्षक व रिक्त जागांची यादी जाहीर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आलेली शिक्षकबदलीची कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे बदल्यांच्या बाबतीत काही काळ का होईना निश्चिंत असणाऱ्या शिक्षकांमध्ये पुन्हा बदलीची धाकधूक सुरू झाली आहे.ग्राम विकास विभागाच्या बहुचर्चित २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार मागील वर्षी जि.प.शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याच शासन निर्णयानुसार यावर्षीसुद्धा बदली प्रक्रियेची कार्यवाही मार्च महिन्यात सुरू करण्यात आली होती. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने बदली प्रक्रियेच्या सुरू असलेल्या कार्यवाहीला राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. परंतु सोमवार, १३ मे रोजी ग्राम विकास विभागाकडून एक आदेश निर्गमित करून दिनांक १३ ते २० मे दरम्यान बदली प्रक्रियेची प्राथमिक कार्यवाही पूर्ण करावी असे आदेश कोकण विभाग वगळता राज्यातील सर्व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.अवघड व सर्वसाधारण क्षेत्राची यादी घोषित करणे, महिलांसाठी अवघड गावांची यादी घोषित करणे, बदलीपात्र शिक्षकांच्या नावांची शाळानिहाय यादी जाहीर करणे, समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या रिक्त जागांची यादी शक्यतो कोणताही बदल न करता मागील वर्षीप्रमाणेच जाहीर करणे तसेच शाळानिहाय निव्वळ रिक्त जागा घोषित करणे इत्यादी बाबींची कार्यवाही जि.प.स्तरावर १३ ते २० मे या कालावधीत पूर्ण करण्याबाबतच्या सूचना आदेशात आहे.२३ मे नंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर शिक्षकांची बदली प्रक्रिया राज्य स्तरावरून मागील वर्षीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बदलीपात्र शिक्षकांमध्ये मात्र धाकधूक वाढली आहे.न्यायालयाच्या निर्देशानंतरही शिक्षकांवर अन्यायगेल्यावर्षीच्या बदल्यांमध्ये पतीपत्नी एकत्रीकरणांतर्गत अनेक शिक्षकांचे विभक्तीकरण झाल्याने बदली प्रक्रियेला जिल्ह्यातील शिक्षकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यासंदर्भात न्यायालयाने एप्रिल, मे व जून २०१९ मध्ये अथवा सत्र संपल्यानंतर संबंधित शिक्षकांना मागणी केल्याप्रमाणे पदस्थापना देण्याचे जि.प. प्रशासनाला आदेशित केले होते. न्यायालयाच्या निर्देशानंतरही प्रशासनाने यावर प्रधान सचिवाला मार्गदर्शन मागितले. त्यामुळे या शिक्षकांवर अन्याय झाला आहे. आता नव्याने होणाऱ्या बदली प्रक्रियेत त्यांचा समावेश करण्यात येईल, अशी भीती शिक्षकांना आहे.अवघडची यादी नव्याने जाहीर करामागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या अवघड क्षेत्रातून अनेक अवघड गावं सुटलेली आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये कार्यरत असणाऱ्या गावातील शिक्षकांवर बदलीत अन्याय झाला होता. शिक्षकांनी अवघड गावाबाबत पुन्हा सर्वेक्षण करून नव्याने गावाची यादी जाहीर करावी, अशी मागणी केली होती. परंतु जि.प. प्रशासनाने त्यावर प्रधान सचिवांकडे मार्गदर्शन मागितले होते. जि.प. प्रशासनाने आपल्या पातळीवर सर्वेक्षण करून अवघड असणाºया गावांची नव्याने यादी जाहीर करावी.लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा नागपूर

 

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली