शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शिक्षकांच्या प्रशिक्षण संस्थेला प्राचार्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:41 IST

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था (डीआयईसीपीडी) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आहे. जि.प.चा १५०० च्या वर शाळांचा कारभार असलेल्या या संस्थेला प्राचार्य नाही.

ठळक मुद्देअधिव्याख्याते स्वत:ची गुणवत्ता वाढविण्यात व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासोबतच शाळांना याबाबत मार्गदर्शन करून शंभरटक्के शाळा विद्यार्थी गुणवत्तापूर्ण प्रगत करण्यासाठी शासनाने दोन संस्थांची नेमणूक केली आहे. यामध्ये जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था (डीआयईसीपीडी) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आहे. जि.प.चा १५०० च्या वर शाळांचा कारभार असलेल्या या संस्थेला प्राचार्य नाही. त्यामुळे दोन्ही संस्था शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी उपयुक्त असे कार्य करीत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी दिवसें्दिवस शाळांची गुणवत्ता खालवत चालली आहे.सदरच्या दोन्ही संस्थांमध्ये राज्य शासनाचे वर्ग-१ व वर्ग-२ या पदावरील अधिव्याख्याता कार्यरत आहेत. सदर अधिव्याख्यात्यांकडे जिल्ह्यातील जि.प.च्या शाळेची गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्रम राबविणे, शाळांना मार्गदर्शन करून शंभर टक्के शाळा विद्यार्थी गुणवत्तापूर्ण प्रगत करणे अशी महत्त्वाची कामे आहेत. जि.प.च्या १५३८ वर शाळांतील ८० हजारावर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीची जबाबदारी या संस्थांतील अधिव्याख्यात्यांच्या खांद्यावर आहे. पण ते आपले अपेक्षित कर्तव्य बजावत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांच्याच समकक्ष असलेल्या एका अधिव्याख्याताकडे येथे प्राचार्य पदाचा कार्यभार आहे. अधिव्याख्याते स्वत:ची गुणवत्ता वाढविण्याकडे लक्ष देत असून सर्व ‘पीएचडी’ होत आहेत. अशातच अधिव्याख्यातांना काम असूनही काम दिसत नाही, म्हणून की काय शिक्षकांनाही या संस्थेत प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले आहे. हे सर्व शिक्षक या अधिव्याख्यात्यांच्या सेवेत आहेत. ते त्या अधिव्याख्यात्यांनी सांगितलेली कामे करतात. अशाप्रकारे जिल्ह्यातील गुणवत्ता वाढविण्यासाठी असलेल्या यंत्रणेवर शासन कोट्यवधीचा खर्च करते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र