शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टीबी रुग्णांचे पोषण लटकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:09 IST

सुमेध वाघमारे नागपूर : क्षयरोग म्हणजे टीबीच्या आजारातून बरे होण्यासाठी शरीराला आवश्यक पौष्टिक आहाराची गरज असते. यासाठी ‘निक्षय पोषण’ ...

सुमेध वाघमारे

नागपूर : क्षयरोग म्हणजे टीबीच्या आजारातून बरे होण्यासाठी शरीराला आवश्यक पौष्टिक आहाराची गरज असते. यासाठी ‘निक्षय पोषण’ योजनेतून रुग्णाच्या खात्यात थेट दरमहा ५०० रुपये जमा होतात. परंतु, अनेक रुग्ण आपली ओळख लपवण्यिासाठी बँके खाते क्रमांकच देत नाही. जानेवारी ते जुलै या दरम्यान शहर आणि ग्रामीण मिळून ३९२५ नवे रुग्ण आढळून आले. यातील ५१ टक्के म्हणजे, २०१७ रुग्णांनीच खाते क्रमांक दिले. यामुळे टीबी रुग्णांचे पोषण लटकल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम २००३ पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग तसेच एमडीआर, एक्सडीआर रोगनिदानासह संपूर्ण औषधोपचाराच्या सोयी-सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या शिवाय, टीबीमुळे अशक्त झालेल्या रुग्णाचे पोषण होऊन त्याची मानसिक व शारीरिक क्रयशक्त वाढविण्यासाठी सरकारने ‘निक्षय पोषण’ योजना सुरू केली आहे. यात रुग्णांचा उपचार पूर्ण होईपर्यंत पोषण आहारासाठी ५०० रुपये आर्थिक मदत रुग्णाच्या खात्यात जमा केली जाते. परंतु, क्षयरोगाच्या रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजात अद्यापही बदललेला नसल्याने अनेक जण आपली ओळख लपविण्यासाठी बँक खाते क्रमांक देत नसल्याचे वास्तव आहे. ज्यांच्याकडे खातेच नाही, त्यांना या योजनेचा लाभच मिळत नाही.

-शहरात खाते क्रमांक न देणाऱ्यांची संख्या अधिक

ग्रामीणच्या तुलनेत शहरातील अधिक रुग्ण आपली ओळख लपविण्यासाठी बँक खाते क्रमांक देत नसल्याचे पुढे आले आहे. ग्रामीणमध्ये जानेवारी ते जुलै या दरम्यान १०८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. यातील ८२ टक्के म्हणजे, ८९२ रुग्णांनी आपले बँक खाते क्रमांक दिले, तर शहरात खासगी आणि महानगरपालिकेकडे नोंद झालेल्या एकूण २८४१ पैकी ३९ टक्के म्हणजे ११२५ लोकांनीच आपले खाते क्रमांक दिले आहेत.

::जिल्ह्यातील क्षयरोगी - ३९२५

::भत्ता किती जणांना मिळतो - २०१७

:: न मिळणाऱ्यांचे प्रमाण -४९ टक्के

-टीबीची लक्षणे

अधिक किंवा कमी ताप, सतत खोकला, वजन कमी होणे, थुंकीतून रक्त येणे, छातीत दुखणे, वारंवार अतिसार, पोटात दुखणे, पोट फुगणे, नेहमी डोकेदुखी, मान दुखणे आणि ‘डबल व्हिजन’ ही टीबीची लक्षणे असू शकतात. शरीरावर कोणत्या भागात टीबी आहे यावरही लक्षणे अवलंबून असतात. केस आणि नखे वगळता शरीराच्या कोणत्याही भागात टीबी होऊ शकतो.

-ही आहे टीबीवरील उपचार प्रणाली

टीबीच्या सुरुवातीच्या टप्प्यात चार अ‍ॅण्टिबायोटिक्स घ्यावी लागते. हा उपचार कमीत कमी सहा महिने चालतो. हाडे आणि सांध्याच्या टीबीसाठी एक वर्षापर्यंत औषधी घ्यावी लागू शकते. ‘एमडीआर-टीबी’च्या रुग्णांवर १८ ते २४ महिन्यांपर्यंत उपचार चालू शकतो.

कोट...

ग्रामीण भागात क्षयरोगाचे रुग्ण ओळखून त्यांना उपचाराखाली आणले जात आहे. ‘निक्षय पोषण’ आहाराचा फायदा देण्यासाठी त्यांच्या बँक खाते क्रमांक ‘निक्षय अ‍ॅप’शी जोडून त्यांना आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत ८० टक्के रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे.

-डॉ. ममता सोनसरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी

कोट..

काही रुग्ण आपली ओळख लपविण्यासाठी, तर काही बँक खात्याच्या सुरक्षेसाठी खाते क्रमांक देत नाहीत. विशेषत: खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्या अशा रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे खासगी डॉक्टरांकडेही आता खाते क्रमांक देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

-डॉ. शैलेजा जिचकार, क्षयरोग अधिकारी, मनपा